शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दूषित पाण्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात आजार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:24 IST

बुलडाणा : मार्च महिन्याच्या सुरुवातीस हवामानात बदल होऊन सूर्याचे किरण लखलखू लागतात आणि उन्हाळ्याचे आगमन होते. बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक गावात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण होते. यावेळी ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणून गरज भागवित असतात. त्यामुळे अशा टंचाईग्रस्त १६६ गावपैकी अनेक गावात विविध आजार वाढले आहेत.

ठळक मुद्देटंचाईग्रस्त १६६ गावपैकी अनेक गावात विविध आजार वाढले आहेत.जिल्ह्यातील १५० गावासाठी १४८ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. काही विहिरी व तलावात अल्प पाणीसाठा असल्यामुळे दूषित पाणी पुरवठा करण्यात येतो.

बुलडाणा : मार्च महिन्याच्या सुरुवातीस हवामानात बदल होऊन सूर्याचे किरण लखलखू लागतात आणि उन्हाळ्याचे आगमन होते. बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक गावात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण होते. यावेळी ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणून गरज भागवित असतात. त्यामुळे अशा टंचाईग्रस्त १६६ गावपैकी अनेक गावात विविध आजार वाढले आहेत. जिल्ह्यात आजरोजी १८ गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू असून त्यात बुलडाणा तालुक्यातील चौथा, चिखला, चिखली तालुक्यातील मेरा, चंदनपूर, रानअंत्री, देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रानंदई, राजनगाव, सरंबा, पाडळी शिंदे, मेहकर तालुक्यातील घाटबोरी, वरंवड, पाडळी, सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगाव, खामगाव तालुक्यातील जळकातेली, लांजूळ, खामगाव ग्रामीण, शेगाव तालुक्यातील चिंचोली व मोताळा तालुक्यातील गुगळी, कोल्ही गोल्हार या गावांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील १५० गावासाठी १४८ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. ज्या टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो, अशी टँकर परिसरातील विविध खाजगी विहिरी किंवा तलावातून पाणी भरून पुरवठा करतात. काही विहिरी व तलावात अल्प पाणीसाठा असल्यामुळे दूषित पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थ नाईलान्वये सदर दुषित पाणी पितात. तर ज्या गावासाठी विहिरी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. त्या विहिरीतून नियमित पाण्याचा उपसा होत असते. त्यामुळे अनेक विहिरीत परिसरातील नाल्याचे पाणी, कारखान्यातून निघालेली पाणी झिरपत या विहिरीत येत असते. याशिवाय विहिरीतील पाणी खोल गेल्यामुळे अनेक विहिरीत जमिनीखालील विविध रसायन असलेले पाणी झिरपत असते. असे पाणी ग्रामस्थ पित असल्यामुळे उन्हाळ्यात अपचन, उलट्या, जुलाब, डिसेन्ट्री आदी कारणामुळे पोटाच्या विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात शुध्द पिण्याचे पाणी मिळेल, अशी व्यवस्था करणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी