शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात आजार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:24 IST

बुलडाणा : मार्च महिन्याच्या सुरुवातीस हवामानात बदल होऊन सूर्याचे किरण लखलखू लागतात आणि उन्हाळ्याचे आगमन होते. बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक गावात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण होते. यावेळी ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणून गरज भागवित असतात. त्यामुळे अशा टंचाईग्रस्त १६६ गावपैकी अनेक गावात विविध आजार वाढले आहेत.

ठळक मुद्देटंचाईग्रस्त १६६ गावपैकी अनेक गावात विविध आजार वाढले आहेत.जिल्ह्यातील १५० गावासाठी १४८ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. काही विहिरी व तलावात अल्प पाणीसाठा असल्यामुळे दूषित पाणी पुरवठा करण्यात येतो.

बुलडाणा : मार्च महिन्याच्या सुरुवातीस हवामानात बदल होऊन सूर्याचे किरण लखलखू लागतात आणि उन्हाळ्याचे आगमन होते. बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक गावात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण होते. यावेळी ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणून गरज भागवित असतात. त्यामुळे अशा टंचाईग्रस्त १६६ गावपैकी अनेक गावात विविध आजार वाढले आहेत. जिल्ह्यात आजरोजी १८ गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू असून त्यात बुलडाणा तालुक्यातील चौथा, चिखला, चिखली तालुक्यातील मेरा, चंदनपूर, रानअंत्री, देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रानंदई, राजनगाव, सरंबा, पाडळी शिंदे, मेहकर तालुक्यातील घाटबोरी, वरंवड, पाडळी, सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगाव, खामगाव तालुक्यातील जळकातेली, लांजूळ, खामगाव ग्रामीण, शेगाव तालुक्यातील चिंचोली व मोताळा तालुक्यातील गुगळी, कोल्ही गोल्हार या गावांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील १५० गावासाठी १४८ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. ज्या टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो, अशी टँकर परिसरातील विविध खाजगी विहिरी किंवा तलावातून पाणी भरून पुरवठा करतात. काही विहिरी व तलावात अल्प पाणीसाठा असल्यामुळे दूषित पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थ नाईलान्वये सदर दुषित पाणी पितात. तर ज्या गावासाठी विहिरी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. त्या विहिरीतून नियमित पाण्याचा उपसा होत असते. त्यामुळे अनेक विहिरीत परिसरातील नाल्याचे पाणी, कारखान्यातून निघालेली पाणी झिरपत या विहिरीत येत असते. याशिवाय विहिरीतील पाणी खोल गेल्यामुळे अनेक विहिरीत जमिनीखालील विविध रसायन असलेले पाणी झिरपत असते. असे पाणी ग्रामस्थ पित असल्यामुळे उन्हाळ्यात अपचन, उलट्या, जुलाब, डिसेन्ट्री आदी कारणामुळे पोटाच्या विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात शुध्द पिण्याचे पाणी मिळेल, अशी व्यवस्था करणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी