शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

दूषित पाण्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात आजार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:24 IST

बुलडाणा : मार्च महिन्याच्या सुरुवातीस हवामानात बदल होऊन सूर्याचे किरण लखलखू लागतात आणि उन्हाळ्याचे आगमन होते. बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक गावात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण होते. यावेळी ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणून गरज भागवित असतात. त्यामुळे अशा टंचाईग्रस्त १६६ गावपैकी अनेक गावात विविध आजार वाढले आहेत.

ठळक मुद्देटंचाईग्रस्त १६६ गावपैकी अनेक गावात विविध आजार वाढले आहेत.जिल्ह्यातील १५० गावासाठी १४८ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. काही विहिरी व तलावात अल्प पाणीसाठा असल्यामुळे दूषित पाणी पुरवठा करण्यात येतो.

बुलडाणा : मार्च महिन्याच्या सुरुवातीस हवामानात बदल होऊन सूर्याचे किरण लखलखू लागतात आणि उन्हाळ्याचे आगमन होते. बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक गावात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण होते. यावेळी ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणून गरज भागवित असतात. त्यामुळे अशा टंचाईग्रस्त १६६ गावपैकी अनेक गावात विविध आजार वाढले आहेत. जिल्ह्यात आजरोजी १८ गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू असून त्यात बुलडाणा तालुक्यातील चौथा, चिखला, चिखली तालुक्यातील मेरा, चंदनपूर, रानअंत्री, देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रानंदई, राजनगाव, सरंबा, पाडळी शिंदे, मेहकर तालुक्यातील घाटबोरी, वरंवड, पाडळी, सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगाव, खामगाव तालुक्यातील जळकातेली, लांजूळ, खामगाव ग्रामीण, शेगाव तालुक्यातील चिंचोली व मोताळा तालुक्यातील गुगळी, कोल्ही गोल्हार या गावांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील १५० गावासाठी १४८ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. ज्या टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो, अशी टँकर परिसरातील विविध खाजगी विहिरी किंवा तलावातून पाणी भरून पुरवठा करतात. काही विहिरी व तलावात अल्प पाणीसाठा असल्यामुळे दूषित पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थ नाईलान्वये सदर दुषित पाणी पितात. तर ज्या गावासाठी विहिरी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. त्या विहिरीतून नियमित पाण्याचा उपसा होत असते. त्यामुळे अनेक विहिरीत परिसरातील नाल्याचे पाणी, कारखान्यातून निघालेली पाणी झिरपत या विहिरीत येत असते. याशिवाय विहिरीतील पाणी खोल गेल्यामुळे अनेक विहिरीत जमिनीखालील विविध रसायन असलेले पाणी झिरपत असते. असे पाणी ग्रामस्थ पित असल्यामुळे उन्हाळ्यात अपचन, उलट्या, जुलाब, डिसेन्ट्री आदी कारणामुळे पोटाच्या विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात शुध्द पिण्याचे पाणी मिळेल, अशी व्यवस्था करणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी