शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘बीजेएस’मुळे बुलडाणा जिल्ह्यातील हजारो विहिरींना फुटला पाझर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 17:55 IST

बुलडाणा : भारतीय जैन संघटनेने (बीजेएस)प्रशासनाच्या सहकार्याने उन्हाळ््यात केलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ मोहिमेंतर्गत झालेल्या दर्जेदार कामामुळे जिल्ह्यातील २८० ठिकाणी लहान-मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वाढला असून हजारो विहिरींना पाझर फुटला आहे

ठळक मुद्दे‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही मोहीम भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा हे जिल्हा प्रशासनाच्या मदतीने बुलडाणा जिल्ह्यात राबवित आहेत. बीजेएस व जिल्हा प्रशासनाने १२० जेसीबी व १४ पोकलॅण्डच्या सहाय्याने ७ मार्च २०१८ रोजी जिल्ह्यात या मोहिमेला सुरूवात केली. जिल्ह्यातील धरण, गाव तलाव, नाला खोलीकरण आदी २८० पेक्षा जास्त ठिकाणी गाळ काढण्यात आला.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : भारतीय जैन संघटनेने (बीजेएस)प्रशासनाच्या सहकार्याने उन्हाळ््यात केलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ मोहिमेंतर्गत झालेल्या दर्जेदार कामामुळे जिल्ह्यातील २८० ठिकाणी लहान-मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वाढला असून हजारो विहिरींना पाझर फुटला आहे. यामुळे वर्षाेनुवर्षे गाळ साचून पाणीसाठा कमी झालेल्या प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढण्यात सुरूवात झाली असून विहिरींना पाणी आल्यामुळे जिल्ह्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.दुष्काळ ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत आहे. दुष्काळाचा फटका सर्वाधिक शेतकरी कुटूंबाना बसत असून, राज्यात सर्वाधिक आत्महत्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचाही समावेश आहे. याच दुष्काळावर मात करण्यासाठी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही मोहीम भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा हे जिल्हा प्रशासनाच्या मदतीने बुलडाणा जिल्ह्यात राबवित आहेत. धरणातील गाळ उपसा करून धरणाची पाणी पातळी वाढविणे आणि तोच गाळ शेतात टाकल्यानंतर शेताची सुपिकता वाढविणे या उद्देशाने बीजेएस व जिल्हा प्रशासनाने १२० जेसीबी व १४ पोकलॅण्डच्या सहाय्याने ७ मार्च २०१८ रोजी जिल्ह्यात या मोहिमेला सुरूवात केली. त्यानंतर ३० जून २०१८ पर्यंत जवळपास ३ महिन्याच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील धरण, गाव तलाव, नाला खोलीकरण आदी २८० पेक्षा जास्त ठिकाणी गाळ काढण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकºयांनी आपली जमीन सुपीक करण्यासाठी गाळ आपल्या शेतात टाकून या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे. यावेळी काही समाजिक कार्यकर्त्यांनी अल्पभूधारक शेतकºयांना शेतात गाळ टाकण्यासाठी मोफत टॅक्टर उपलब्ध करून दिले.नाला खोलीकरणामुळे शेतीला फायदाखामगाव तालुक्यातील कदमापूर येथील अल्पभूधारक शेतकरी रविंद्र तेलगोटे यांनी पाणी साचल्यामुळे शेती चिभडत होती. त्यामुळे शेती करणे कठिण झाले होते. याबाबत प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्यानंतरही तेलगोटे यांची कोणीही दखल घेत नव्हते. शेवटी भारतीय जैन संघटनेच्या जिल्हा कार्यालयात आल्यानंतर त्यांनी आपली अटचण सांगितली. याबाबत निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ या मोहिमेअंतर्गंत तेलगोठे यांच्या शेताजवळ जवळपास ३ किलो मिटर नाला खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे तेलगोठे यांच्या शेतीसह परिसरातील शेतकºयांची शेतीही चिभडण्यापासून वाचली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी