शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

बुलडाणा जिल्ह्यातील तणावग्रस्त शेतकर्‍यांना दुग्ध व्यवसायाचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:55 IST

सातत्याने निर्माण होणारी अवर्षणसदृश स्थिती, बदलते हवामान,  यामुळे कृषी जगतासमोर मोठय़ा समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अशा स्थितीत  शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असून, असंख्य शेतकरी तणावात आले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ३0१ लाभार्थी शेतकर्‍यांना दिले ६२ लाखांचे अनुदान

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सातत्याने निर्माण होणारी अवर्षणसदृश स्थिती, बदलते हवामान,  यामुळे कृषी जगतासमोर मोठय़ा समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अशा स्थितीत  शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असून, असंख्य शेतकरी तणावात आले आहेत. अशा शेतकर्‍यांना शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून अर्थार्जनासाठी हा तभार लागावा, यासाठी दुग्धोत्पादनाला शासनातर्फे चालना दिली जात असून,  पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ३0१ लाभार्थी शेतकर्‍यांना दुधाळ  जनावरे घेण्यासाठी ६२  लाख ११ हजार ६२४ रुपये निधी देण्यात आला  आहे. त्यामुळे तणावग्रस्त शेतकर्‍यांच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे.निसर्गातील अनियमिततेचा शेती व्यवसायाला मोठा फटका बसून उत्पादनात  घट होत आहे. त्यात बाजारपेठेत शेतमालास भाव मिळत नसल्यामुळे शे तकर्‍यांवरील कर्ज वाढून त्यांच्या आत्महत्याही दिवसेंदिवस वाढत आहे.  त्यामुळे अशा तणावग्रस्त शेतकर्‍यांना आधार मिळावा, शेतकरी आत्महत्येचे  प्रमाण कमी व्हावे, यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे त. अशा उपक्रमापैकी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे तणावग्रस्त शे तकर्‍यांना दुधाळ जनावरांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. जिल्हा  परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे  विशेष घटक योजना व ओटीएसपी योजनां तर्गत ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे, शेळीचे वाटप करण्यात आले.  यावर्षी २0१६-१७ या आर्थिक वर्षात ३१६ लाभार्थींना दुधाळ जनावरे, २७८  लाभार्थींना शेळीसाठी अनुदान देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी  १५८ लाभार्थींना दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी ६३ हजार ७९६ रुपयांप्रमाणे १0  लाख ७९ हजार ७६८ रुपये अनुदान, तसेच १४३ लाभार्थींना शेळ्यांसाठी प्र त्येकी ३५ हजार ८८६ रुपयेप्रमाणे ५१ लाख ३२ हजार ६९८ रुपये अनुदान  देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील काही तणावग्रस्त शेतकर्‍यांना दुग्ध  व्यवसायाचा आधार मिळाला असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत  आहेत.

आर्थिकदृष्ट्या परवडणारा व्यवसायशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत  आलेला महत्त्वाचा व्यवसाय असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडणारा आहे.  आहारामध्ये प्रत्येकाला प्रतिदिनी ३00 मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या  लोकसंख्येसाठी दुधाचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. आपल्याकडे गाईपासून  ४५ टक्के तर म्हशीकडून ५२ टक्के दूध मिळते; पण यात सध्या उलटे चित्र आहे.  दुधामध्ये पाणी, कबरेदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात  असल्याने दूध हे पूर्णान्न आहे. गाईच्या एक लीटर दुधातून ६00 किलो  कॅलरीज, तर म्हशींच्या एक लीटर दुधापासून १000 किलो कॅलरीज मिळता त.

टॅग्स :Farmerशेतकरी