शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

चालकाच्या प्रसंगावधानानं मोठा अपघात टळला, ब्रेक फेल  होताच गाडी केली नियंत्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:28 IST

राज्य परिवहन मंडळाचे डम्पिंग ग्राउंड म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगाव जामोद आगारात बऱ्याच जुनाट व भंगार बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यातच मागील  दीड वर्षांपासून कोरोणामुळे अनेक बसेस उभ्या होत्या.

नांदुरा - राज्य परिवहन मंडळाचा  जळगाव जामोद आगारची बस २२ जुलैच्या दुपारी एकच्या सुमारास नांदुरा ते जळगाव रस्त्यादरम्यान मानेगाव नंतर पूर्णा नदी पुलाजवळ जात होती. त्यावेळी बसचे ब्रेक लागत नसल्याची बाब चालकाच्या लक्षात आली. यानंतर त्याने बस नियंत्रित केली आणि बसमधील सुमारे पन्नास प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. (The driver's foresight averted a major accident)

राज्य परिवहन मंडळाचे डम्पिंग ग्राउंड म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगाव जामोद आगारात बऱ्याच जुनाट व भंगार बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यातच मागील  दीड वर्षांपासून कोरोणामुळे अनेक बसेस उभ्या होत्या. जळगाव जामोद आगाराची बस क्रमांक एम. एच. ४० ए क्यू  ६३३८ ही सुमारे पन्नास प्रवासी घेऊन दुपारी बारा वाजता जळगाव जामोद वरून नांदुर्‍याकडे निघाली होती. मानेगाववरून पुढे निघाल्यानंतर पूर्णा नदीवरील पुलाकडे जात असताना बसचे ब्रेक पूर्णपणे काम करीत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. मात्र त्याने प्रसंगावधान राखत गाडी पुला पूर्वीच नियंत्रित करून रस्त्याच्या बाजूला सुरक्षित उभी केली.  

याबाबतची माहिती प्रवाशांना मिळताच त्यांनी सुटकेचा श्वास सोडला व चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचा  जीव वाचल्याचा भावना व्यक्त केल्या. चालकाने याबाबतची माहिती जळगाव जामोद आगारातील अधिकाऱ्यांना दिली व त्यानंतर प्रवाशांना इतर बसमधून पाठविण्यात आले. बस चालकाचा प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. जळगाव जामोद आगारात आगारातील भंगार बसेसचा प्रश्न यामुळे पुन्हा चर्चिला जात असून  एकेकाळी राज्यात सर्वात जास्त महसुली उत्पन्न देणार्या या आगाराला राज्य परिवहन मंडळाने नवीन बसेस पुरविण्याची मागणी सुद्धा होत आहे.

नांदुरा-जळगाव जामोद आगाराची बस ही बस पूर्णा नदीवरील पुलाकडे जात असताना तिचे ब्रेक फेल झाले. प्रसंगावधान राखत आरडा ओरड न करता चालकाने पूर्णपणे बस नियंत्रित केली व रस्त्याच्या कडेला उभी केली नंतर याबाबतची माहिती बसमधील  वाहक व प्रवाशांना दिली  . त्यामुळे सर्व प्रवासी सुरक्षितपणे बसमधून उतरून दुसऱ्या बस व वाहनांनी त्यांच्या घराकडे निघून गेले. यापूर्वी पूर्णा नदीच्या खिरोडा येथील पुलावरुन राज्य परिवहन मंडळाची बस नदीपात्रात कोसळून यामधील काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Nanduraनांदूराbuldhanaबुलडाणाpassengerप्रवासी