शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चालकाच्या प्रसंगावधानानं मोठा अपघात टळला, ब्रेक फेल  होताच गाडी केली नियंत्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:28 IST

राज्य परिवहन मंडळाचे डम्पिंग ग्राउंड म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगाव जामोद आगारात बऱ्याच जुनाट व भंगार बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यातच मागील  दीड वर्षांपासून कोरोणामुळे अनेक बसेस उभ्या होत्या.

नांदुरा - राज्य परिवहन मंडळाचा  जळगाव जामोद आगारची बस २२ जुलैच्या दुपारी एकच्या सुमारास नांदुरा ते जळगाव रस्त्यादरम्यान मानेगाव नंतर पूर्णा नदी पुलाजवळ जात होती. त्यावेळी बसचे ब्रेक लागत नसल्याची बाब चालकाच्या लक्षात आली. यानंतर त्याने बस नियंत्रित केली आणि बसमधील सुमारे पन्नास प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. (The driver's foresight averted a major accident)

राज्य परिवहन मंडळाचे डम्पिंग ग्राउंड म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगाव जामोद आगारात बऱ्याच जुनाट व भंगार बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यातच मागील  दीड वर्षांपासून कोरोणामुळे अनेक बसेस उभ्या होत्या. जळगाव जामोद आगाराची बस क्रमांक एम. एच. ४० ए क्यू  ६३३८ ही सुमारे पन्नास प्रवासी घेऊन दुपारी बारा वाजता जळगाव जामोद वरून नांदुर्‍याकडे निघाली होती. मानेगाववरून पुढे निघाल्यानंतर पूर्णा नदीवरील पुलाकडे जात असताना बसचे ब्रेक पूर्णपणे काम करीत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. मात्र त्याने प्रसंगावधान राखत गाडी पुला पूर्वीच नियंत्रित करून रस्त्याच्या बाजूला सुरक्षित उभी केली.  

याबाबतची माहिती प्रवाशांना मिळताच त्यांनी सुटकेचा श्वास सोडला व चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचा  जीव वाचल्याचा भावना व्यक्त केल्या. चालकाने याबाबतची माहिती जळगाव जामोद आगारातील अधिकाऱ्यांना दिली व त्यानंतर प्रवाशांना इतर बसमधून पाठविण्यात आले. बस चालकाचा प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. जळगाव जामोद आगारात आगारातील भंगार बसेसचा प्रश्न यामुळे पुन्हा चर्चिला जात असून  एकेकाळी राज्यात सर्वात जास्त महसुली उत्पन्न देणार्या या आगाराला राज्य परिवहन मंडळाने नवीन बसेस पुरविण्याची मागणी सुद्धा होत आहे.

नांदुरा-जळगाव जामोद आगाराची बस ही बस पूर्णा नदीवरील पुलाकडे जात असताना तिचे ब्रेक फेल झाले. प्रसंगावधान राखत आरडा ओरड न करता चालकाने पूर्णपणे बस नियंत्रित केली व रस्त्याच्या कडेला उभी केली नंतर याबाबतची माहिती बसमधील  वाहक व प्रवाशांना दिली  . त्यामुळे सर्व प्रवासी सुरक्षितपणे बसमधून उतरून दुसऱ्या बस व वाहनांनी त्यांच्या घराकडे निघून गेले. यापूर्वी पूर्णा नदीच्या खिरोडा येथील पुलावरुन राज्य परिवहन मंडळाची बस नदीपात्रात कोसळून यामधील काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Nanduraनांदूराbuldhanaबुलडाणाpassengerप्रवासी