शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

मोताळा तालुक्यात ठिबक सिंचन क्षेत्र वाढले!

By admin | Updated: March 14, 2016 01:50 IST

शेती सिंचनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; पाण्याच्या बचतीसह उत्पन्नात होतेय वाढ.

मोताळा (जि. बुलडाणा): अत्यल्प पर्जन्यामुळे तालुक्यातील पाण्याची उपलब्धता कमी झालेली आहे. त्या पाण्यात अधिक क्षेत्र सिंचित करण्यासाठी व उत्पादनवाढीसाठी शेतकरी अलीकडे मोठय़ा प्रमाणात तुषार व सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करत असून, मोताळा तालुक्यात ९ हजार २३ हेक्टरवरील शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. यामुळे उत्पादन वाढीसोबत आता पाण्याचीही बचत होत आहे.मोताळा तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत परंपरागत पद्धतीने सिंचन करून धरण, प्रकल्प, विहिरीतील पाणी थेट पाटाद्वारे पिकापर्यंत पोहोचवित होते. यामुळे पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होत होता. मात्र, मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वर्षभर सिंचन करणे शेतकर्‍यांना कठीण होऊन बसले. परिणामी सततच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने तालुक्यातील विहिरी जानेवारीतच तळ गाठतात. मात्र, आता शेतकरी तुषार व ठिबक सिंचन या आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत असल्याने वर्षभर सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकर्‍यांना वर्षभर पाण्याची उपलब्धता होत असल्याने तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन आता ठिबक सिंचनाच्या खाली आली आहे. ठिबक सिंचन अतिशय फायदेशीर ठरू लागल्याने सन २0१५-१६ पर्यंत सद्यस्थितीत तालुक्यातील ठिबक, तुषार, स्प्रिंकलरचे एकूण क्षेत्र ९0२३ हेक्टरपर्यंत गेले आहे. तालुक्यात कृषी क्षेत्र हे ७९ हजार ७२८ हेक्टर असून, यातील खरिपाचे ५३ हजार ५९४ हेक्टर तर रब्बीचे ८ हजार ५२२.४0 हेक्टर आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ६८८.६ मि.मी. आहे. ठिबक, स्प्रिंकलर व तुषारच्या माध्यमातून गहू, मका, हरभरा, भाजीपाला, कापूस, कांदा, पपई, मिरची, टमाटे अशी पिके जेमतेम पाण्याच्या आधारावर घेत आहेत. ठिबक सिंचनासाठी अनेक शेतकर्‍यांनी कृ षी विभागाच्या अनुदान योजनेचाही लाभ घेतला तर अनेकांनी स्वबळावर ठिबक, स्प्रिंकलर, तुषार प्रणाली राबवल्याने सद्यस्थितीत तालुक्यातील क्षेत्र ९ हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे. शेतकरी अल्प पाण्यात शेती करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करीत आहे. परंतु तालुका कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत नाही. अनेक शेतकरी नापिकीमुळे आत्महत्या करीत आहेत. अशा शेतकर्‍यांना सिंचन विहिरी देताना ठिबक सिंचनाचे महत्त्व समजावून सांगणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांना अपेक्षित माहिती मिळत नसल्याने अनेक जण या योजनांपासून वंचित राहत आहेत.