शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा तालुक्यात ठिबक सिंचन क्षेत्र वाढले!

By admin | Updated: March 14, 2016 01:50 IST

शेती सिंचनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; पाण्याच्या बचतीसह उत्पन्नात होतेय वाढ.

मोताळा (जि. बुलडाणा): अत्यल्प पर्जन्यामुळे तालुक्यातील पाण्याची उपलब्धता कमी झालेली आहे. त्या पाण्यात अधिक क्षेत्र सिंचित करण्यासाठी व उत्पादनवाढीसाठी शेतकरी अलीकडे मोठय़ा प्रमाणात तुषार व सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करत असून, मोताळा तालुक्यात ९ हजार २३ हेक्टरवरील शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. यामुळे उत्पादन वाढीसोबत आता पाण्याचीही बचत होत आहे.मोताळा तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत परंपरागत पद्धतीने सिंचन करून धरण, प्रकल्प, विहिरीतील पाणी थेट पाटाद्वारे पिकापर्यंत पोहोचवित होते. यामुळे पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होत होता. मात्र, मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वर्षभर सिंचन करणे शेतकर्‍यांना कठीण होऊन बसले. परिणामी सततच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने तालुक्यातील विहिरी जानेवारीतच तळ गाठतात. मात्र, आता शेतकरी तुषार व ठिबक सिंचन या आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत असल्याने वर्षभर सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकर्‍यांना वर्षभर पाण्याची उपलब्धता होत असल्याने तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन आता ठिबक सिंचनाच्या खाली आली आहे. ठिबक सिंचन अतिशय फायदेशीर ठरू लागल्याने सन २0१५-१६ पर्यंत सद्यस्थितीत तालुक्यातील ठिबक, तुषार, स्प्रिंकलरचे एकूण क्षेत्र ९0२३ हेक्टरपर्यंत गेले आहे. तालुक्यात कृषी क्षेत्र हे ७९ हजार ७२८ हेक्टर असून, यातील खरिपाचे ५३ हजार ५९४ हेक्टर तर रब्बीचे ८ हजार ५२२.४0 हेक्टर आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ६८८.६ मि.मी. आहे. ठिबक, स्प्रिंकलर व तुषारच्या माध्यमातून गहू, मका, हरभरा, भाजीपाला, कापूस, कांदा, पपई, मिरची, टमाटे अशी पिके जेमतेम पाण्याच्या आधारावर घेत आहेत. ठिबक सिंचनासाठी अनेक शेतकर्‍यांनी कृ षी विभागाच्या अनुदान योजनेचाही लाभ घेतला तर अनेकांनी स्वबळावर ठिबक, स्प्रिंकलर, तुषार प्रणाली राबवल्याने सद्यस्थितीत तालुक्यातील क्षेत्र ९ हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे. शेतकरी अल्प पाण्यात शेती करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करीत आहे. परंतु तालुका कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत नाही. अनेक शेतकरी नापिकीमुळे आत्महत्या करीत आहेत. अशा शेतकर्‍यांना सिंचन विहिरी देताना ठिबक सिंचनाचे महत्त्व समजावून सांगणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांना अपेक्षित माहिती मिळत नसल्याने अनेक जण या योजनांपासून वंचित राहत आहेत.