शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

सरपंच पदाचे आरक्षण नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 12:11 IST

Gram Panchayat Election News निवडणूक झाल्यानंतर आरक्षण काढण्याचा निर्णय घेतल्याने हे सर्व प्रयोग सरपंचाच्या बाबतीत का?  असा प्रश्न सरपंचांमधून उपस्थित होत आहे.   

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर सरपंचाचे आरक्षण काढण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा जिल्ह्यातील सरपंचांमधूननही विरोध होत आहे. यामुळे निवडणुकीनंतर सदस्यांना विकत घेण्यासारखे गैरप्रकार वाढण्याचा धोका अधिक आहे. २५ वर्षांपासून निवडणुकीपूर्वी आरक्षण काढले जात असताना अचानक सरकार ते रद्द करून निवडणूक झाल्यानंतर आरक्षण काढण्याचा निर्णय घेतल्याने हे सर्व प्रयोग सरपंचाच्या बाबतीत का?  असा प्रश्न सरपंचांमधून उपस्थित होत आहे.   जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारीमध्ये होऊ घातल्या आहेत.  २०२० ते २०२५ दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता आरक्षण सोडत ७ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती, तर जिल्ह्यातील एकूण ८७० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदापैकी ४३७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे महिलांसाठी राखीव आरक्षण १० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले होते. आरक्षण जाहीर झाल्यापासून सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवार कामाला लागले होते. अनेकांनी सर्वत्र जोरदार तयारी सुरू केलेली असताना  राज्य शासनाने सरपंच पदाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता निवडणूक झाल्यानंतर आरक्षण जाहीर होणार असल्याने सरपंचांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारचा अजब कारभार ! सरपंचाला कधी अपत्याची अट, कधी शिक्षणाची अट, एक सरकार जनतेतून थेट सरपंच निवडण्याचा निर्णय घेते, दुसरे सरकार त्याला रद्द करते. सरकारचा हा अजब कारभार असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. 

सरपंच परिषदेचे काय म्हणणे?  जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षण जाहीर केले आहे, एकदा आरक्षण सुटले, त्यानंतर पुन्हा आरक्षण बदलले तर गावातील वातावरणही खराब होऊ शकते.  निवडणुकीवर लागणारा पैसा वाचविण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलले जात असेल, तर यातून पैसा वाचण्याऐवजी जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. 

आरक्षणावर विश्वास राहणार नाही !जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षण जाहीर केलेले आहे. निवडणुकीनंतर या आरक्षणात बदल झाला, तर नागरिकांचा या आरक्षणावरच विश्वास राहणार नाही. या नवीन निर्णयामुळे निवडणुकीतील घोडेबाजाराच वाढण्याची शक्यता जास्त आहे.- उज्ज्वला दळवी, सरपंच.

निर्णयावरून नागरिकांमध्ये संभ्रम २५ वर्षांपासून ज्या नियमाने आरक्षण काढल्या जात होते, त्या नियमामध्ये अचानक बदल करण्यात आले, या निर्णयावरून नागरिकांमध्येही संभ्रमावस्था आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविताना पॅनलला सर्वप्रथम आरक्षणानुसार सरपंचपदाचे नेतृत्व निवडावे लागते. - गोपाल देशमुख, सरपंच

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliticsराजकारणgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsarpanchसरपंच