शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, पोट सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST

नगरपालिका प्रशासनाने शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जलजन्य आजाराविषयी जनजागृती सुरू केली आहे. पावसाळा संपेपर्यंत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे ...

नगरपालिका प्रशासनाने शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जलजन्य आजाराविषयी जनजागृती सुरू केली आहे. पावसाळा संपेपर्यंत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. हॉटेलमधील खाद्यपदार्थांमुळेही पोटाचे विकार वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी शक्यतो बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी. प्रकृती बिघडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पावसाळ्यात हे खायला हवे

घरी बनविलेले खाद्यपदार्थच खाण्यास पसंती द्यावी.

तुळस, आलं, पुदिना, हळद, हिंग, जिरे, कढीपत्ता यांचा आहारात समावेश असावा.

मेथीदाणे, कारले यांचा आहारात समावेश असावा.

व्हिटॅमीन सीयुक्त फळांचा आहारात समावेश असावा.

उकडलेले व भाजलेले अन्न खावे.

रस्त्यावरील अन्न नकोच

पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावरील वडापाव, भजी, चहा, छोले पुरी व इतर खाद्यपदार्थ खाऊ नयेत. या व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवली जात नाही. दूषित पाणी वापरले जाण्याची शक्यता आहे. तेल व इतर पदार्थाचा दर्जाही चांगला नसतो. यामुळे उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊच नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आहार तज्ज्ञ काय म्हणतात...

नगरपालिका प्रशासनाने अतिसार व जलजन्य आजारांविषयी जनजागृतीही सुरू केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पोटाचे आजार बळावतात. यामुळे नागरिकांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पचण्यास जड असणाऱ्या पदार्थांचे सेवन करू नये. शक्यतो घरात तयार केलेले पदार्थ खावे. बाहेरील विशेषत: रोडवरील खाद्यपदार्थ खाऊ नयेत, असे आवाहन उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील आहारतज्ज्ञांच्यावतीने करण्यात आले आहे.

पावसाळ्यात हे खाऊ नये

कच्चे तळलेले, आंबवलेले पदार्थ खाणे टाळावे.

मिठाई, पनीर, मांसाहार शक्यतो टाळावा.

उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नये.

हॉटेलमधील खाद्यपदार्थही जास्त खाऊ नये.

स्वॉॅफ्ट ड्रिंक, थंड पेये, चायनीज पदार्थ खाऊ नयेत.