शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, पोट सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST

नगरपालिका प्रशासनाने शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जलजन्य आजाराविषयी जनजागृती सुरू केली आहे. पावसाळा संपेपर्यंत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे ...

नगरपालिका प्रशासनाने शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जलजन्य आजाराविषयी जनजागृती सुरू केली आहे. पावसाळा संपेपर्यंत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. हॉटेलमधील खाद्यपदार्थांमुळेही पोटाचे विकार वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी शक्यतो बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी. प्रकृती बिघडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पावसाळ्यात हे खायला हवे

घरी बनविलेले खाद्यपदार्थच खाण्यास पसंती द्यावी.

तुळस, आलं, पुदिना, हळद, हिंग, जिरे, कढीपत्ता यांचा आहारात समावेश असावा.

मेथीदाणे, कारले यांचा आहारात समावेश असावा.

व्हिटॅमीन सीयुक्त फळांचा आहारात समावेश असावा.

उकडलेले व भाजलेले अन्न खावे.

रस्त्यावरील अन्न नकोच

पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावरील वडापाव, भजी, चहा, छोले पुरी व इतर खाद्यपदार्थ खाऊ नयेत. या व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवली जात नाही. दूषित पाणी वापरले जाण्याची शक्यता आहे. तेल व इतर पदार्थाचा दर्जाही चांगला नसतो. यामुळे उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊच नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आहार तज्ज्ञ काय म्हणतात...

नगरपालिका प्रशासनाने अतिसार व जलजन्य आजारांविषयी जनजागृतीही सुरू केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पोटाचे आजार बळावतात. यामुळे नागरिकांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पचण्यास जड असणाऱ्या पदार्थांचे सेवन करू नये. शक्यतो घरात तयार केलेले पदार्थ खावे. बाहेरील विशेषत: रोडवरील खाद्यपदार्थ खाऊ नयेत, असे आवाहन उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील आहारतज्ज्ञांच्यावतीने करण्यात आले आहे.

पावसाळ्यात हे खाऊ नये

कच्चे तळलेले, आंबवलेले पदार्थ खाणे टाळावे.

मिठाई, पनीर, मांसाहार शक्यतो टाळावा.

उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नये.

हॉटेलमधील खाद्यपदार्थही जास्त खाऊ नये.

स्वॉॅफ्ट ड्रिंक, थंड पेये, चायनीज पदार्थ खाऊ नयेत.