शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कमी दराने माल विकू नका - पणन मंत्री सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:32 IST

राज्य शासनाने शासकीय हमी भावाने शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गतवर्षी तूर, या वर्षी सोयाबीन, मूग, उडीद आणि आता या हंगामापासून पुन्हा तूर खरेदी करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी कमी दराने शेतमालाची विक्री करू नये, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देसहकार मंत्र्यांचे शेगावात आवाहनतूर खरेदीला शेगावात प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शेतकर्‍यांना चांगला भाव देऊन त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हमी भावापेक्षा कमी दराने खासगी व्यापारी शेतमाल खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राज्य शासनाने शासकीय हमी भावाने शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गतवर्षी तूर, या वर्षी सोयाबीन, मूग, उडीद आणि आता या हंगामापासून पुन्हा तूर खरेदी करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी कमी दराने शेतमालाची विक्री करू नये, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी केले.शेगाव बाजार समितीमध्ये शासकीय तूर खरेदी केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, जि.प अध्यक्ष उमाताई तायडे, आमदार आकाश फुंडकर, सभापती गोविंद मिरगे, माजी आमदार धृपतराव सावळे, नगराध्यक्ष श्रीमती शकुंतला बूच, सहनिबंधक आर. जे. डाबेराव, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक खरात उपस्थित होते.   शेतमाल तारण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करीत सहकार मंत्री  देशमुख म्हणाले की, शेतमाल तारण योजनेत कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकर्‍यांना सहभागी करून घ्यावे. या योजनेनुसार तारण शेतमालावर वार्षिक सहा टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध आहे. पणन मंडळामार्फत  बाजार समित्यांना या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ते म्हणाले की, शासनाने खरेदी केलेल्या तुरीवर प्रक्रिया करून डाळ बनविण्यात येत आहे. ही डाळ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध झालेली आहे. शासनाने ऐतिहासिक कर्जमाफी दिली.  पात्र वंचित शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी बँकेची आणि ऑनलाइन अर्जातील माहितीमध्ये त्रुटी असलेले अर्ज पुन्हा बँकांना पाठविण्यात आलेले आहे. एकही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित न राहू देण्याचा यामागील उद्देश आहे. शेतकर्‍यांचा  शेतमाल खरेदी व्यवहार पारदर्शक करण्यासाठी ई- नाम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतमालाची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे, तसेच शेतमाल खरेदी केल्यानंतर खरेदीची रक्कम शेतकर्‍याच्या खात्यावर टाकण्यात येणार आहे. 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुख