शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

कमी दराने माल विकू नका - पणन मंत्री सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:32 IST

राज्य शासनाने शासकीय हमी भावाने शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गतवर्षी तूर, या वर्षी सोयाबीन, मूग, उडीद आणि आता या हंगामापासून पुन्हा तूर खरेदी करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी कमी दराने शेतमालाची विक्री करू नये, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देसहकार मंत्र्यांचे शेगावात आवाहनतूर खरेदीला शेगावात प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शेतकर्‍यांना चांगला भाव देऊन त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हमी भावापेक्षा कमी दराने खासगी व्यापारी शेतमाल खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राज्य शासनाने शासकीय हमी भावाने शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गतवर्षी तूर, या वर्षी सोयाबीन, मूग, उडीद आणि आता या हंगामापासून पुन्हा तूर खरेदी करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी कमी दराने शेतमालाची विक्री करू नये, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी केले.शेगाव बाजार समितीमध्ये शासकीय तूर खरेदी केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, जि.प अध्यक्ष उमाताई तायडे, आमदार आकाश फुंडकर, सभापती गोविंद मिरगे, माजी आमदार धृपतराव सावळे, नगराध्यक्ष श्रीमती शकुंतला बूच, सहनिबंधक आर. जे. डाबेराव, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक खरात उपस्थित होते.   शेतमाल तारण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करीत सहकार मंत्री  देशमुख म्हणाले की, शेतमाल तारण योजनेत कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकर्‍यांना सहभागी करून घ्यावे. या योजनेनुसार तारण शेतमालावर वार्षिक सहा टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध आहे. पणन मंडळामार्फत  बाजार समित्यांना या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ते म्हणाले की, शासनाने खरेदी केलेल्या तुरीवर प्रक्रिया करून डाळ बनविण्यात येत आहे. ही डाळ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध झालेली आहे. शासनाने ऐतिहासिक कर्जमाफी दिली.  पात्र वंचित शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी बँकेची आणि ऑनलाइन अर्जातील माहितीमध्ये त्रुटी असलेले अर्ज पुन्हा बँकांना पाठविण्यात आलेले आहे. एकही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित न राहू देण्याचा यामागील उद्देश आहे. शेतकर्‍यांचा  शेतमाल खरेदी व्यवहार पारदर्शक करण्यासाठी ई- नाम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतमालाची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे, तसेच शेतमाल खरेदी केल्यानंतर खरेदीची रक्कम शेतकर्‍याच्या खात्यावर टाकण्यात येणार आहे. 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुख