शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

डीपी दुरुस्त न करणे भोवले : कार्यकारी अभियंत्याकडून साडेसहा लाखांची वसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 01:02 IST

सुनगावातील तीन शेतकर्‍यांनी नागपूर येथील  वीज मंडळाच्या ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. त्याचा निकाल हाती आला  असून, वीज मंडळाच्या मलकापूर येथील कार्यकारी अभियंत्याला साडेसहा  लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागली. एक वर्षाच्या संघर्षानंतर हा न्याय  मिळाला.

ठळक मुद्देग्राहक न्यायालयाचा दणका शेतकर्‍यांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : तालुक्यातील सुनगाव येथील वावडी हरदो येथील रोहित्र डी पी नादुरुस्त झाल्यानंतर तब्बल साडेचार महिने वीज मंडळाने दुरुस्त न केल्याने  शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. सुनगावातील तीन शेतकर्‍यांनी नागपूर येथील  वीज मंडळाच्या ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. त्याचा निकाल हाती आला  असून, वीज मंडळाच्या मलकापूर येथील कार्यकारी अभियंत्याला साडेसहा  लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागली. एक वर्षाच्या संघर्षानंतर हा न्याय  मिळाला.वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी तथा कामकाजातील  अनियमितता नेहमीच होत असल्याची ओरड असते; परंतु याविरुद्ध कोणीही  ग्राहक मंचाकडे  दाद मागत नाही. त्यासंदर्भातील नियमसुद्धा ग्राहकांना माहिती  नसतात; परंतु सुनगाव येथील अरुण गणपतराव धुळे, महादेव सखाराम बार पाटील व आशा महादेव बारपाटील या तीन शेतकर्‍यांनी रोहित्र बंद पडल्याने  शेतीच्या पिकांचे जे नुकसान झाले, त्याबाबतची तक्रार नागपूर येथील वीज  मंडळाच्या ग्राहक मंचाकडे केली. वीज वितरण कंपनीचे अधिकारी ए. जी.  काठोळे आणि या तीन शेतकर्‍यांची बाजू समजून घेतल्यानंतर या मंचच्या  न्यायाधीश चित्रकला झुत्शी यांनी शेतकर्‍यांच्या बाजूने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय  दिला. त्यात वीज मंडळाच्या निष्काळजीपणामुळे रोहित्र जितके दिवस बंद होते,  त्या १३४ दिवसांना प्रतितास ५0 रु.प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.  तसेच अन्य खर्चाची रक्कमसुद्धा त्यामध्ये समावेश करीत शेतकर्‍यांना  मानसिक त्रास झाल्याबद्दल २000 रु.ची नुकसान भरपाईसुद्धा देण्याच्या  निकालात स्पष्ट केले. त्यामुळे  मलकापूर येथील कार्यकारी अभियंता यांना च क्क सहा लाख बावन हजार पाचशे रुपयांचे चार चेक शेतकर्‍यांना द्यावे  लागले. ही रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा झाली असून, या रकमेचे  वसुली वीज वितरण कंपनी दिरंगाई करणार्‍या अभियंत्याच्या पगरातून वसूल  करणार असल्याचे समजते. रोहित्र बंद असण्याचा कालावधी १५ जुलै २0१६  ते २६ नोव्हेंबर २0१६ असा होता. न्यायासाठी शेतकर्‍यांना बुलडाणा, अकोला  व नागपूर येथील ग्राहक मंचात एक वर्ष संघर्ष करावा लागला. ग्राहक मंचातील  तक्रार मागे घ्यावी, यासाठी त्यांच्यावर वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी  काही खोटे चोरीचे आरोपसुद्धा केले होते.  या रोहित्रांतर्गत सुमारे ३0 शे तकर्‍यांनी वीज कनेक्शन घेतले आहे; परंतु इतर शेतकर्‍यांनी तक्रार केली  नव्हती. त्यामुळे  उर्वरित शेतकर्‍यांना या प्रकरणाच्या अनुषंगाने लाभ मिळू शकला  नाही; परंतु आता शेतकरीही सतर्क होत आहेत.

तर मिळाले असते कोट्यवधीसर्व शेतकर्‍यांनी जर तक्रार केली असती, तर वीज वितरण कंपनीच्या  कार्यकारी अभियंत्यांना कोटीच्या घरात नुकसान भरपाई द्यावी लागली असती.  याबाबत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद खंडागळे व  तालुका अध्यक्ष दीपक ताडे यांचे विशेष सहकार्य या शेतकर्‍यांना मिळाले.

वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दिरंगाईमुळे जर आपल्या  शेतमालाचे नुकसान होत असेल, तर शेतकर्‍यांनी व अन्य वीज ग्राहकांनी  तक्रार करून पुराव्यासह व्यवस्थित मुद्दे रेटले तर निश्‍चित न्याय मिळतो.  आम्हाला मिळालेल्या न्यायाचे श्रेय निर्णय देणार्‍या चित्रकला झुत्शी यांना आहे.  -अरुण गणपतराव धुळे, तक्रारकर्ते सुनगाव.       

टॅग्स :buldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणेmahavitaranमहावितरण