शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

डीपी दुरुस्त न करणे भोवले : कार्यकारी अभियंत्याकडून साडेसहा लाखांची वसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 01:02 IST

सुनगावातील तीन शेतकर्‍यांनी नागपूर येथील  वीज मंडळाच्या ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. त्याचा निकाल हाती आला  असून, वीज मंडळाच्या मलकापूर येथील कार्यकारी अभियंत्याला साडेसहा  लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागली. एक वर्षाच्या संघर्षानंतर हा न्याय  मिळाला.

ठळक मुद्देग्राहक न्यायालयाचा दणका शेतकर्‍यांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : तालुक्यातील सुनगाव येथील वावडी हरदो येथील रोहित्र डी पी नादुरुस्त झाल्यानंतर तब्बल साडेचार महिने वीज मंडळाने दुरुस्त न केल्याने  शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. सुनगावातील तीन शेतकर्‍यांनी नागपूर येथील  वीज मंडळाच्या ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. त्याचा निकाल हाती आला  असून, वीज मंडळाच्या मलकापूर येथील कार्यकारी अभियंत्याला साडेसहा  लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागली. एक वर्षाच्या संघर्षानंतर हा न्याय  मिळाला.वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी तथा कामकाजातील  अनियमितता नेहमीच होत असल्याची ओरड असते; परंतु याविरुद्ध कोणीही  ग्राहक मंचाकडे  दाद मागत नाही. त्यासंदर्भातील नियमसुद्धा ग्राहकांना माहिती  नसतात; परंतु सुनगाव येथील अरुण गणपतराव धुळे, महादेव सखाराम बार पाटील व आशा महादेव बारपाटील या तीन शेतकर्‍यांनी रोहित्र बंद पडल्याने  शेतीच्या पिकांचे जे नुकसान झाले, त्याबाबतची तक्रार नागपूर येथील वीज  मंडळाच्या ग्राहक मंचाकडे केली. वीज वितरण कंपनीचे अधिकारी ए. जी.  काठोळे आणि या तीन शेतकर्‍यांची बाजू समजून घेतल्यानंतर या मंचच्या  न्यायाधीश चित्रकला झुत्शी यांनी शेतकर्‍यांच्या बाजूने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय  दिला. त्यात वीज मंडळाच्या निष्काळजीपणामुळे रोहित्र जितके दिवस बंद होते,  त्या १३४ दिवसांना प्रतितास ५0 रु.प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.  तसेच अन्य खर्चाची रक्कमसुद्धा त्यामध्ये समावेश करीत शेतकर्‍यांना  मानसिक त्रास झाल्याबद्दल २000 रु.ची नुकसान भरपाईसुद्धा देण्याच्या  निकालात स्पष्ट केले. त्यामुळे  मलकापूर येथील कार्यकारी अभियंता यांना च क्क सहा लाख बावन हजार पाचशे रुपयांचे चार चेक शेतकर्‍यांना द्यावे  लागले. ही रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा झाली असून, या रकमेचे  वसुली वीज वितरण कंपनी दिरंगाई करणार्‍या अभियंत्याच्या पगरातून वसूल  करणार असल्याचे समजते. रोहित्र बंद असण्याचा कालावधी १५ जुलै २0१६  ते २६ नोव्हेंबर २0१६ असा होता. न्यायासाठी शेतकर्‍यांना बुलडाणा, अकोला  व नागपूर येथील ग्राहक मंचात एक वर्ष संघर्ष करावा लागला. ग्राहक मंचातील  तक्रार मागे घ्यावी, यासाठी त्यांच्यावर वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी  काही खोटे चोरीचे आरोपसुद्धा केले होते.  या रोहित्रांतर्गत सुमारे ३0 शे तकर्‍यांनी वीज कनेक्शन घेतले आहे; परंतु इतर शेतकर्‍यांनी तक्रार केली  नव्हती. त्यामुळे  उर्वरित शेतकर्‍यांना या प्रकरणाच्या अनुषंगाने लाभ मिळू शकला  नाही; परंतु आता शेतकरीही सतर्क होत आहेत.

तर मिळाले असते कोट्यवधीसर्व शेतकर्‍यांनी जर तक्रार केली असती, तर वीज वितरण कंपनीच्या  कार्यकारी अभियंत्यांना कोटीच्या घरात नुकसान भरपाई द्यावी लागली असती.  याबाबत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद खंडागळे व  तालुका अध्यक्ष दीपक ताडे यांचे विशेष सहकार्य या शेतकर्‍यांना मिळाले.

वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दिरंगाईमुळे जर आपल्या  शेतमालाचे नुकसान होत असेल, तर शेतकर्‍यांनी व अन्य वीज ग्राहकांनी  तक्रार करून पुराव्यासह व्यवस्थित मुद्दे रेटले तर निश्‍चित न्याय मिळतो.  आम्हाला मिळालेल्या न्यायाचे श्रेय निर्णय देणार्‍या चित्रकला झुत्शी यांना आहे.  -अरुण गणपतराव धुळे, तक्रारकर्ते सुनगाव.       

टॅग्स :buldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणेmahavitaranमहावितरण