शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

पाण्याचे खासगीकरण नको सामुदायिकरण करा

By admin | Updated: May 25, 2015 02:27 IST

जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांच्याशी संवाद.

बुलडाणा : पंचमहाभूतांपासून निर्माण होणार्‍या व्यवस्थेवर कुणाचीही मालकी नसते; मात्र अलीकडच्या काळात पाण्याचे खासगीकरण करण्यावर भर दिला जात आहे. निसर्गाने दिलेले पाणी बाटलीबंद होऊन कितीतरी पट अधिक किमतीने विकल्या जात आहे. ही प्रक्रिया भविष्यात पाण्याच्या खासगीकरणाकडे होणारी वाटचाल आहे. त्याचा धोका वेळीच ओळखा, पाण्याचे खासगीकरण न होता ते सामुदायिकरण झाले पाहिजे. पाणी हे समाजाच्या मालकीचे असले पाहिजे; परंतु समाजानेही मालक म्हणून जबाबदारीने पाण्याचा उपयोग करणे आवश्यक आहे तरच पाण्याचे संवर्धन होईल व जलक्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात येईल, अशा शब्दात भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.प्रश्न : पाण्याविषयी लोकांमध्ये जागृती का वाढत नाही ?आहे, लोकांमध्ये जागृती आहे; मात्र लोकांमधील जागृती ही एकसंघपणे समोर दिसत नाही. वैयक्तिकरित्या पाण्याची बचत करणारे अनेक लोक आहेत; मात्र जोपर्यंंत समाज एकसंघपणे असा विचार करीत नाही तोपर्यंत त्याचे फलित आपल्या समोर येत नाही. येणार्‍या काळात समाजातील प्रत्येक घटकाने अधिक जबाबदारीने पाण्याविषयी जागृत होणे गरजेचे आहे.

प्रश्न : राजस्थानसारखा जलप्रयोग महाराष्ट्रात का होत नाही ?राजस्थानपेक्षाही महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या संवर्धनाबाबत अधिक वेगाने व दर्जेदार असे प्रयोग होऊ शकतात; मात्र दुर्दैवाने येथील नागरिकांमध्ये पाणी वापरण्याबाबत ह्यशिस्तह्ण नाही. सरासरी ६00 ते ७00 मिमी. पाऊस या प्रदेशात पडत असल्याने पावसाचे महत्त्व गांभीर्याने घेतले गेले नाही. स्वतंत्र भारतामध्ये जेवढी धरणे झाली त्यापैकी तब्बल ४४ टक्के धरणे ही महाराष्ट्रात झाली. तरी पाण्यासाठी महाराष्ट्र का भटकतो, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.

प्रश्न : महाराष्ट्रातील धरणांचा उपयोग झाला नाही, असे वाटते का ?निश्‍चितच धरणांचा उपयोग झाला आहे; मात्र ज्या उद्देशांसाठी धरणे किंवा जलसंधारणाची कामे होतात त्यापेक्षा इतर कामांसाठीच याचा उपयोग अधिक होतो. जलपुनर्भरण, जलसंवर्धन हे प्रयोग केल्या गेले तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निश्‍चितच कमी होईल व धरणातील पाणी हे सिंचनासाठी वापरता येईल. या दृष्टीने अधिक विचार केला पाहिजे.

प्रश्न : पाणी या विषयावर आगामी काळात काय केले पाहिजे ? मी सुरुवातीलाच सांगितले, शिस्त पाळा. पाण्याचा वापर शिस्तीने करा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजसत्ता व समाज यांनी एकत्र येऊन पाण्याच्या विषयावर काम केले पाहिजे. सर्वकाही सरकार करेल, ही भावना आता बंद करा. लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. लोकांनी अधिक जबाबदार झाले पाहिजे. माझे गाव माझे पाणी ही भावना जोपर्यंंत निर्माण होत नाही तोपर्यंंत पाण्याबाबत गांभीर्याने विचार होणार नाही.

प्रश्न : ग्रीन युरिन संदर्भात सद्या देश पातळीवर चर्चा सुरू आहे. त्याबाबत काय वाटते ? यात नवीन काही नाही. मलमूत्रामध्ये असलेल्या रासायनिक घटकांचा वापर करून जगाच्या पाठीवर अनेक प्रयोग झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानानंतर ही चर्चा सुरू झाली; मात्र असे प्रयोग प्रत्यक्षात आले तरच त्याचा उपयोग होईल. त्यांनी फक्त बोलून थांबू नये तर करून दाखवावे. निश्‍चितच त्याचा फायदा होईल.

प्रश्न : महाराष्ट्रासाठी कुठले मॉडेल सुचवू इच्छिता ? महाराष्ट्रच देशासमोर मॉडेल उभा करण्याची क्षमता ठेवणारा प्रदेश आहे. सध्या जलयुक्त शिवार हे अभियान सुरू आहे. ते प्रामाणिकपणे व लोकांचा सहभाग घेऊन राबविले तर हेच मॉडेल देशासाठी अधिक चांगल्या पद्धतीने देता येईल फक्त यामधील कामे दर्जेदार व्हावी, लोकांचा सहभाग वाढावा व ही कामे योग्य अशा तांत्रिक दृष्टीने उपयुक्त असणे गरजेचे आहे.