शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

तुरीसाठी जिल्हाभर आंदोलन पेटणार!

By admin | Updated: June 29, 2017 00:05 IST

शेतकरी, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत तीव्र आंदोलनाचा एकमुखी निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : बाजार समितीकडे नोंदणी झालेली तूर खरेदी अद्याप बाकी असल्याने तातडीने शासकीय तूर खरेदी सुरू करण्यात यावी व नोंदणी झालेल्या तुरीच्या खरेदीची हमी देण्यात यावी, या मागणीसाठी चिखलीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. यानुषंगाने बाजार समितीत २८ जून रोजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत तीव्र आंदोलनाची मोट बांधण्यात आली आहे. या बैठकीपश्चात चिखली तहसीलदार व सहायक निबंधकांना निवेदन देऊन तातडीने तूर खरेदी व चुकारे देण्याची मागणी करण्यात आली आहे.शासकीय आधारभूत हमीभाव दराने विक्रीसाठी शेतकऱ्यांनी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आपल्याकडील तुरीची नोंदणी केलेली असताना, तूर खरेदी बंद करण्यात आल्याने तुरीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची बैठक बाजार समितीच्या शेतकरी भवनमध्ये आ.राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मोठ्या संख्येने तूर उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.राहुल बोंद्रे म्हणाले, की मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या घरातील तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र, त्यांनी दिलेला शब्द न पाळता ३१ मे ही शेवटची तारीख धरून तूर खरेदी बंद केलेली आहे, तर स्थानिक भाजपा नेते शेतकऱ्यांकडे तूर शिल्लकच नसल्याने खरेदी कशाची करायची, असा कांगावा करीत आहेत. वस्तुत: आजरोजी बाजार समितीकडे नोंदणी झालेल्या सुमारे ७० हजार क्विंटल तुरीचे मोजमाप बाकी असल्याने शेतकऱ्यांनी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून पुणतांबा येथील शेतकरी ज्याप्रमाणे संघटित होऊन कर्जमुक्तीसाठी लढले, त्याच धर्तीवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संघटित होऊन वणवा पेटविणे गरजेचे असल्याचे मत आ.बोंद्रे यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, या बैठकीत बाजार समितीकडे नोंदणी झालेल्या तुरीची तातडीने खरेदी करण्यात यावी व खरेदी झालेल्या तुरीचे चुकारे मिळावेत, यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष पांडुरंग पाटील खेडेकर, शिवसेनेचे नीलेश अंजनकर, काँग्रेसचे विष्णू पाटील कुळसुंदर, राकाँचे संजय गाडेकर, स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनीसुद्धा सरकारच्या दुटप्पी धोरणावर टीका करून आंदोलनाचे समर्थन केले. प्रास्ताविकात बैठकीचे आयोजक बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी बैठकीची भूमिका विशद केली. या बैठकीला दासा पाटील कणखर, गजानन वायाळ, संजय पांढरे, अशोकराव पडघान, भगवानराव मोरे, एकनाथराव थुट्टे, कपिल खेडेकर, सुधाकरराव धमक, शिवनारायण म्हस्के, राजीव जावळे, विजय शेजोळ, अशोक मगर, ईश्वर इंगळे, ज्ञानेश्वर सुरूशे, जगन्नाथ पाटील, नितीन राजपूत, भगवानराव काळे, दिलीप पाटील, प्रल्हाद इंगळे, सिद्धेश्वर परिहार, सत्तार पटेल, डॉ.इसरार, डॉ.विकास मिसाळ, प्रमोद पाटील, विनोद खरपास, श्रीकिसन धोंडगे, लक्ष्मणराव अंभोरे, साहेबराव अंभोरे, तानाजी चिकने, प्रशांत ढोरे आदींसह तूर उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सुधीर पडघान, तर आभार रूपराव पाटील यांनी मानले. तहसीलदारांना निवेदनचिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने नोंदणी केलेल्या सुमारे ५ हजार शेतकऱ्यांकडील ७० हजार क्विंटल तूर अद्यापही मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, खरेदी बंद असल्याने हे शेतकरी अडचणी सापडले असून, बाजारात तुरीचे भाव आणखी खाली आले आहेत. त्यानुषंगाने बाजार समितीमध्ये तूर उत्पादक शेतकरी व सर्वपक्षीय नेत्यांची बैठक डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी आयोजित केली होती. या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी आ. बोंद्रे व सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय व सहायक निबंधक कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले. दरम्यान, बाजार समितीकडे नोंदणी झालेल्या तुरीचे मोजमाप होण्यासाठी सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठविला असून, त्याबाबत पाठपुरावादेखील सुरू असल्याचे तहसीलदार मनीष गायकवाड यांनी यावेळी सांगितले.