शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

३३0 गावांसाठी विकास योजनांचा आराखडा तयार

By admin | Updated: February 28, 2015 01:12 IST

५३८ कोटींचे नियोजन; गावनिहाय आराखड्यांवर दिला भर.

बुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रथम टप्प्याचा प्राथमिक स्वरूपाचा आराखडा २६ फेब्रुवारी रोजी तयार करण्यात आला आहे. यात ५३८ कोटींचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. या आराखड्यानुसार ३३0 गावांमध्ये जलसंधारणाची कामे होणार आहेत. यातून जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होईल.ह्यसर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २0१९ह्ण अंतर्गत जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. या त ३३0 गावांमध्ये नऊ विभागांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी निवड करण्यात आलेल्या गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. यात कृषी, वन, सामाजिक वनीकरण, लघुसिंचन व जलसंधारण, जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग, जलसंपदा, भूजल सर्वेक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा योजना व ग्रामपंचायती आदींचा समावेश आहे. या विभागामार्फत निवड करण्यात आलेल्या गावात कोणत्या योजना राबविल्या जाणार आहेत, याची माहिती नोडल अधिकार्‍यांना द्यावयाची असून, त्यानंतर विकास आराखडा तयार करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवारामध्ये निवडलेल्या गावांचा अभ्यास करून गावनिहाय आराखडा तयार केला आहे. यामध्ये होणार्‍या कामांवर जिल्हास्तरीय समितींचे लक्ष राहणार असून, या कामांमधून सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणाचाही उद्देश सफल होईल व भविष्यातील पाणी टंचाईवर मात करता येईल, अशी आशा जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी व्यक्त केली. *जिल्हास्तरीय समिती गठित टंचाईग्रस्त गावांमध्ये कायमस्वरूपी उपाययोजना होणे अपेक्षित आहे. यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. यात जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्यातील आमदार व खासदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा पातळीवरील अधिकार्‍यांचा समावेश आहे.