शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जिगावसाठी ४,९०६ कोटींच्या विशेष निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 12:00 IST

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांच्याकडे ४,९०६ कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी करणारा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्यपालांच्या निधी वाटपाच्या सुत्राच्या बाहेर जावून जिगाव प्रकल्प त्वरित मार्गी लागावा यासाठी सहा आॅगस्टच्या मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतील निर्णयानुसार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांच्याकडे ४,९०६ कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी करणारा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.जिगाव प्रकल्पावर मार्च २०२० अखेर पर्यंत ४,०९९ कोटी रुपयांचा खर्च झाला असून त्यापैकी भूसंपादन व पुनर्वसनाच्या कामावर २००३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. सोबतच पुर्नवसनाच्या उर्वरित कामासाठी ४,९०६ कोटी रुपयांची अवश्यकता आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पास गती देण्यासोबतच भूसंपादन व पुनर्वसनाच्या कामासाठी पुढील तीन वर्षासाठी राज्यपालांच्या निधी वाटपाच्या सुत्राच्या पलिकडे जावून विशेष बाब म्हणून हा निधी उपलब्ध करण्याची मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली असल्याची माहिती मलकापूरचे काँग्रेसचे आ. राजेश एकडे यांनी दिली. सिंचन अनुशेष निर्मुलन कार्यक्रमातंर्गत हा निधी उपलब्ध करण्यासाठी सध्या जलसंपदा विभागातंर्गत प्रयत्न सुरू आहे. प्रामुख्याने प्रकल्पाचा पहिला टप्पा पुर्णत्वास जावा, यासाठी हा रेटा वाढविण्यात आला आहे. २०२३ पर्यंत हा पहिला टप्पा पुर्ण करून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना प्रकल्पाचा लाभ उपलब्ध करण्याची ही भूमिका यात आहे. त्यानुषंगानेच सहा आॅगस्ट रोजी मुंबई मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत प्रामुख्याने असा प्रस्ताव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुषंगाने २० आॅगस्ट रोजीच हा प्रस्ताव राज्यपालांकडे देण्यात आला आहे. प्रकल्पास विशेष बाब म्हणून हा निधी उपलब्ध झाला तर अमरावती विभागाचा सिंचन अनुशेष दुूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर तथा राजकीय वर्तुळात याकडे सकारात्मक दृष्टीने बघितल्या जात आहे.

यंदा २७९.७० कोटी खर्चचालू आर्थिक वर्षासाठी जिगाव प्रकल्पाच्या कामासाठी ६९० कोटी ८१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी २७९.७० कोटी रुपयांचा खर्च आतापर्यंत प्रकल्पाच्या कामावर करण्यात आला आहे. दरवर्षी विभागास उपलब्ध होणाºया निधीची तरतूद पाहता याच वेगाने निधी उपलब्ध झाल्यास प्रकल्पाची कामे व अनुशेष निर्मूलन कालमर्यादेत होणे अवघड होवून बसणार आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प