शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सामंजस्य करारास मुदतवाढ देण्याची मागणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:45 IST

बुलडाणा : खस्ता हालतीतून जिल्हा बँक आता आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करीत असून, जिल्हा बँकेची तरलता १३६ कोटींवर पोहोचली असून, बँकेचे उणे १४ असणारे सीआरएआरचे प्रमाण संपलेल्या आर्थिक वर्षात १९.१५ टक्क्यांवर आले आहे. त्यातच केंद्र, राज्य शासन आणि नाबार्डचा बँकेसंदर्भात झालेला एमओयूलाही (सामंजस्य करार) आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्याची मागणी जिल्हा बँकेतर्फे करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देजिल्हा बँकेची आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल ‘सीआरएआर’ १९.१५ टक्क्यांवर!

नीलेश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खस्ता हालतीतून जिल्हा बँक आता आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करीत असून, जिल्हा बँकेची तरलता १३६ कोटींवर पोहोचली असून, बँकेचे उणे १४ असणारे सीआरएआरचे प्रमाण संपलेल्या आर्थिक वर्षात १९.१५ टक्क्यांवर आले आहे. त्यातच केंद्र, राज्य शासन आणि नाबार्डचा बँकेसंदर्भात झालेला एमओयूलाही (सामंजस्य करार) आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्याची मागणी जिल्हा बँकेतर्फे करण्यात आली आहे. दुसरीकडे नागपूर आणि वर्धा बँकांच्या आर्थिक स्थितीशी तुलना करता जिल्हा बँकेची स्थिती तुलनेने समाधानकारक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परिणामी, बँक ही नाबार्डच्या रिफायनान्ससाठी पुन्हा पात्र ठरण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.सध्या बँकेचे अंतर्गत आॅडिट (लेखापरीक्षण) सुरू असून, अल्पावधीतच नाबार्डमार्फतही आॅडिट करण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष बँकेचा आर्थिक डोलारा स्पष्ट होणार आहे. अकृषक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आलेले कर्ज पाहता जिल्हा बँकेची अनुत्पादक जिंदगी वाढली होती. त्यामुळे जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आली होती. त्यामुळे बँकेचा बँकिंग परवानाच आरबीआयने रद्द केला होता. किमान नऊ टक्के सीआरएआरचे प्रमाण ठेवणे आवश्यक असताना बँकेचे हे प्रमाण उणे १४ वर गेले होते. त्यामुळे आरबीआयला कडक पावले उचलावी लागली होती. नागपूर खंडपीठातही त्यामुळे बराच काळ प्रकरण गाजले होते. त्यानंतर अडचणीतील बँकांना मदत करण्याचे केंद्र शासनाचे धोरण पाहता जिल्हा बँकेला केंद्र ४० टक्के, राज्य शासन ५० टक्के आणि नाबार्डने १० टक्के अशी मदत अटी व शर्तीच्या अधीन राहून केली होती. त्यामुळे जिल्हा बँका पूर्वपदावर येण्यास मदत झाली होती. दोन वर्षांत बँकेला एनपीए ५० टक्क्यांच्या आत आणणे आणि सीआरएआरचे प्रमाण नऊ टक्क्यांवर आणण्यासोबतच १५ टक्के ठेवीचे गुणोत्तर वाढविण्याचे निर्देशित केल्या गेल्या होतो. प्राधिकृत त्रिसदस्यीय समितीने गेल्या दोन वर्षांत त्यादृष्टीने प्रयत्न केल्याने आज बँकेची तरलता ही १३६ कोटींच्या घरात गेली आहे. शेतकरी कर्जमाफीची जी रक्कम बँकेतील शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यामुळे बँकेला उपलब्ध झालेली ही रक्कम बँकेची तरलता वाढविणारी ठरली आहे. त्यामुळे मार्च २०१७ दरम्यान बँकेचे सीआरएआरचे प्रमाण हे ११.११ टक्के होते. त्यात संपलेल्या आर्थिक वर्षात वाढ झाल्याने बँकेच्या आर्थिक सक्षमतेचे एक लक्षण म्हणावे लागले. या सर्व बाबी पाहता बँकेचा नेट एनपीएही १३.१५ टक्क्यांवर आला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नाबार्डच्या रिफायनान्ससाठीही पात्र!बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता बँक आॅडिटनंतर नाबार्डच्या रिफायनान्ससाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. हा बँकेसाठी मोठा दिलासा असला, तरी अद्यापही प्रशसाकीय मंडळाच्याच ताब्यात ही बँक राहणार आहे. पीक कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना आरबीआयच्या निर्देशानुसार तथा तिच्या निर्धारणानुसार कार्य करावे लागते; मात्र सहकारी बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक बहुतांश बाबतीत (शेती व शेतीपूरक) नाबार्डवर अवलंबून आहेत. परिणामी, रिफायनान्ससाठी जिल्हा बँक प्रत्यक्ष पात्र ठरली तर जिल्ह्यातील जवळपास ३० हजार शेतकºयांच्या पीक कर्जाचा प्रश्न बहुतांशी सुटण्यास मदत होईल. दरम्यान, असे असले तरी ठेवीचे गुणोत्तर १५ टक्के वाढविण्यासोबतच अनेक काही मुद्दे हे बँकेच्या दृष्टीने नकारात्मक आहे. ते कशा पद्धतीने हाताळले जातात, यावर पुढील भवितव्य अवलंबून आहे.

पुनर्गठनासाठी २७ हजार शेतकरी पात्रबँकेची ग्राहक संख्या ७४ हजार ५०० च्या आसपास होती. त्यापैकी २७ हजार ११६ शेतकरी हे पीक कर्जाच्या रिस्ट्रक्टरसाठी पात्र ठरत आहे. त्यातच सध्याची तरलता पाहता बँक जवळपास ३० हजार शेतकºयांना पीक कर्ज देण्याच्या दृष्टीने सक्षम ठरू शकते. त्यामुळे २०११-१२ पासून सातत्याने आर्थिक खस्ता हालत हा बँकेच्या दृष्टीने परवलीचा बनलेला शब्द आता इतिहास जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सामंजस्य करारास मुदतवाढीची शक्यताबँकेसंदर्भात राज्य शासन आणि नाबार्डमध्ये २०१४ च्या मध्यावर झालेला सामंजस्य करारास (एमओयू) आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी जिल्हा बँकेने केलेली आहे. बँकेचे अंतर्गत आॅडिट झाल्यानंतर नाबार्ड आॅडिट करणार आहे. त्यात बँकेचा लेखाजोखा किती खरा उतरतो, त्यावर जिल्हा बँकेच्या दोन वर्षांच्या सामंजस्य करारास एक वर्षाची आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. मार्च २०१९ पर्यंत ही मुदतवाढ मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाbankबँक