शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

खरीप हंगामासाठी दीड लाख क्विंटल बियाण्यांची मागणी

By admin | Updated: April 19, 2017 01:59 IST

बुलडाणा- कृषी विभागाच्या बियाणे पुरवठा व विक्री अहवालानुसार खरीप हंगामात यंदा १ लाख ३६ हजार क्विंटल विविध बियाण्यांची मागणी आहे.

कृषी विभागाचा बियाणे पुरवठा, विक्री अहवालबुलडाणा : सततची नापिकी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, शेतमालाला कमी भाव आदी समस्यांनी जिल्ह्यातील शेतकरी भरडून निघाला आहे. कृषी विभागाच्या बियाणे पुरवठा व विक्री अहवालानुसार खरीप हंगामात यंदा १ लाख ३६ हजार क्विंटल विविध बियाण्यांची मागणी आहे. जिल्ह्यात २०१७-१८ या खरीप हंगामात ७ लाख ४७ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट असून, १०० टक्के पेरणीची उद्दिष्टपूर्ती डोळ्यापुढे ठेवून कृषी विभागाकडून बियाणे व खतांचे प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची कमतरता भासणार नाही, असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिला. सध्या शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी सुरु झाली नसली, तरी हंगामाच्या नियोजनानुसार, कृषी विभागाकडे बियाण्यांची पुरेशी उपलब्धता ठेवणे आवश्यक आहे; मात्र कृषी विभागाकडून तयार करण्यात आलेल्या खरीप पेरणी अहवालानुसार, जिल्ह्यातील तेराही तालुक्यासाठी चौदा पीक प्रकाराच्या बियाण्यांसाठी १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटलची मागणी दर्शविण्यात आली आहे. यात सार्वजनिक ३८ हजार ५८० क्विंटल आणि खासगी स्वरुपात ९७ हजार ९५९ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे; मात्र यावर्षी सोयाबीन व इतर काही पेरणी क्षेत्रामध्ये वाढ करण्यात आली आहे. लवकरच शेतात बियाणे पेरण्याचे काम चालू होणार आहे. पेरणी क्षेत्र घटले, पीक क्षेत्र वाढले!जिल्ह्यात २०१६-१७ या खरीप हंगामात ७ लाख ४९ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते; मात्र यंदा २०१७-१८ या वर्षात पेरणी क्षेत्रात १ हजार ७२२ हेक्टरने घट करण्यात आली असून, ७ लाख ४७ हजार ५७८ हेक्टरचे नियोजन आहे, तर जिल्ह्यात सोयाबीन पिकांचे २ लाख ८ हजार ३०० हेक्टर क्षेत्र निर्धारित असताना पीक क्षेत्रात वाढ करुन ३ लाख ८५ हजार ३०० हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीन व कापूस या व्यतिरिक्त तूर उत्पादक शेतकरी जास्त असल्यामुळे तुरीचे क्षेत्र ६५ हजार हेक्टर निर्धारित असताना ८५ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे उपलब्ध बियाण्यांची कमतरता भासू शकते.