शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील बसफेरीला विलंब; संतप्त विद्यार्थ्यांची एसटी आगारात धडक

By अनिल गवई | Updated: October 10, 2023 15:25 IST

शाळा सुटल्यानंतर बराच वेळ बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.

खामगाव: स्थानिक बसस्थानकावरून ग्रामीण भागातील बसेस नियमित सोडल्या जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागते. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी खामगाव बस स्थानक ते आगारापर्यंत पायदळ मोर्चा काढला. आपल्या संतप्त भावनांचे आगार प्रमुखांना निवेदन सादर केले.

याबाबत सविस्तर असे की, अपुऱ्या बसेसमुळे गत काही दिवसांपासूनखामगाव आगरातील एसटी बसचे नियोजन कोलमडले आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसह सामान्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, मंगळवारी खामगाव स्थानकातून खामगाव ते नागापूर मार्गे  किन्ही महादेव, आणि  आवार ते विहीगाव करीता बस वेळेवर सोडण्यासाठी विद्यार्थ्यी संतप्त झाले होते. शाळा सुटल्यानंतर बराच वेळ बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.

त्याचवेळी अहिल्यादेवी होळकर विद्यालयातील मुख्याध्यापक संजय कोकरे यांनी आगार प्रमुखांना मंगळवारी  निळेगाव, विहिगाव, किन्ही महादेव, नागापूर अशा वेगवेगळ्या गावातील ५६ विद्यार्थी  सकाळी १०:३० वाजेपर्यंत शाळेत पोहोचतील. आणि सायंकाळी ४:४५ वाजता सर्व बसेस विहिगाव येथे पोहोचतील. शनिवारी सकाळी ७:३० तर शाळा सुटल्यानंतर ११ वाजता विहिगाव येथे पोहोचतील अशा सोयीने  व्यवस्था करण्याची मागणी निवेदनातून केली. त्याचवेळी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी  किन्ही महादेव ते नागापूर, विहिगाव पर्यंत बसेस सुरू करावी अशी मागणीही यावेळी विद्यार्थ्यांनी केली. माजी सभापती सुरेश तोमर यांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा दिला. आगार व्यवस्थापकांच्यावतीने सहा. वाहतूक निरिक्षक सरला तिजारे यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले. विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

पायी पोहोचले विद्यार्थी

मंगळवारी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी बस उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचू शकले नाही. संतप्त विद्यार्थ्यांनी बसस्थानक ते आगारापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाद्वारे निवेदन सादर केले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाStudentविद्यार्थी