शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ग्रामीण भागातील बसफेरीला विलंब; संतप्त विद्यार्थ्यांची एसटी आगारात धडक

By अनिल गवई | Updated: October 10, 2023 15:25 IST

शाळा सुटल्यानंतर बराच वेळ बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.

खामगाव: स्थानिक बसस्थानकावरून ग्रामीण भागातील बसेस नियमित सोडल्या जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागते. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी खामगाव बस स्थानक ते आगारापर्यंत पायदळ मोर्चा काढला. आपल्या संतप्त भावनांचे आगार प्रमुखांना निवेदन सादर केले.

याबाबत सविस्तर असे की, अपुऱ्या बसेसमुळे गत काही दिवसांपासूनखामगाव आगरातील एसटी बसचे नियोजन कोलमडले आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसह सामान्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, मंगळवारी खामगाव स्थानकातून खामगाव ते नागापूर मार्गे  किन्ही महादेव, आणि  आवार ते विहीगाव करीता बस वेळेवर सोडण्यासाठी विद्यार्थ्यी संतप्त झाले होते. शाळा सुटल्यानंतर बराच वेळ बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.

त्याचवेळी अहिल्यादेवी होळकर विद्यालयातील मुख्याध्यापक संजय कोकरे यांनी आगार प्रमुखांना मंगळवारी  निळेगाव, विहिगाव, किन्ही महादेव, नागापूर अशा वेगवेगळ्या गावातील ५६ विद्यार्थी  सकाळी १०:३० वाजेपर्यंत शाळेत पोहोचतील. आणि सायंकाळी ४:४५ वाजता सर्व बसेस विहिगाव येथे पोहोचतील. शनिवारी सकाळी ७:३० तर शाळा सुटल्यानंतर ११ वाजता विहिगाव येथे पोहोचतील अशा सोयीने  व्यवस्था करण्याची मागणी निवेदनातून केली. त्याचवेळी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी  किन्ही महादेव ते नागापूर, विहिगाव पर्यंत बसेस सुरू करावी अशी मागणीही यावेळी विद्यार्थ्यांनी केली. माजी सभापती सुरेश तोमर यांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा दिला. आगार व्यवस्थापकांच्यावतीने सहा. वाहतूक निरिक्षक सरला तिजारे यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले. विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

पायी पोहोचले विद्यार्थी

मंगळवारी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी बस उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचू शकले नाही. संतप्त विद्यार्थ्यांनी बसस्थानक ते आगारापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाद्वारे निवेदन सादर केले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाStudentविद्यार्थी