शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ग्रामीण भागातील बसफेरीला विलंब; संतप्त विद्यार्थ्यांची एसटी आगारात धडक

By अनिल गवई | Updated: October 10, 2023 15:25 IST

शाळा सुटल्यानंतर बराच वेळ बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.

खामगाव: स्थानिक बसस्थानकावरून ग्रामीण भागातील बसेस नियमित सोडल्या जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागते. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी खामगाव बस स्थानक ते आगारापर्यंत पायदळ मोर्चा काढला. आपल्या संतप्त भावनांचे आगार प्रमुखांना निवेदन सादर केले.

याबाबत सविस्तर असे की, अपुऱ्या बसेसमुळे गत काही दिवसांपासूनखामगाव आगरातील एसटी बसचे नियोजन कोलमडले आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसह सामान्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, मंगळवारी खामगाव स्थानकातून खामगाव ते नागापूर मार्गे  किन्ही महादेव, आणि  आवार ते विहीगाव करीता बस वेळेवर सोडण्यासाठी विद्यार्थ्यी संतप्त झाले होते. शाळा सुटल्यानंतर बराच वेळ बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.

त्याचवेळी अहिल्यादेवी होळकर विद्यालयातील मुख्याध्यापक संजय कोकरे यांनी आगार प्रमुखांना मंगळवारी  निळेगाव, विहिगाव, किन्ही महादेव, नागापूर अशा वेगवेगळ्या गावातील ५६ विद्यार्थी  सकाळी १०:३० वाजेपर्यंत शाळेत पोहोचतील. आणि सायंकाळी ४:४५ वाजता सर्व बसेस विहिगाव येथे पोहोचतील. शनिवारी सकाळी ७:३० तर शाळा सुटल्यानंतर ११ वाजता विहिगाव येथे पोहोचतील अशा सोयीने  व्यवस्था करण्याची मागणी निवेदनातून केली. त्याचवेळी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी  किन्ही महादेव ते नागापूर, विहिगाव पर्यंत बसेस सुरू करावी अशी मागणीही यावेळी विद्यार्थ्यांनी केली. माजी सभापती सुरेश तोमर यांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा दिला. आगार व्यवस्थापकांच्यावतीने सहा. वाहतूक निरिक्षक सरला तिजारे यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले. विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

पायी पोहोचले विद्यार्थी

मंगळवारी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी बस उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचू शकले नाही. संतप्त विद्यार्थ्यांनी बसस्थानक ते आगारापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाद्वारे निवेदन सादर केले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाStudentविद्यार्थी