शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

देव्हारीचे पुनर्वसन रखडले

By admin | Updated: October 2, 2015 02:18 IST

निधीची तरतूद झाल्याशिवाय पुनर्वसन शक्य नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्टीकरण; पुनर्वसनास ३0 कोटींचा निधी लागणार.

सिद्धार्थ आराख / बुलडाणा : राज्यातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्याच्या अंतर्गत क्षेत्रातील गावांचे त्याच्याबाहेर पुनर्वसन करण्याकरिता तत्कालीन आघाडी सरकारने १0 कोटी ७५ लाख रुपयांची भरीव तरतूद केली होती. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी गावाचा समावेश होता. तथापि, देव्हारी येथील गावकर्‍यांनी जमिनीच्या मोबदल्यात जमीन देण्याची मागणी लावून धरल्यामुळे आणि शासनाजवळ ३६0 एकर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जमीन उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे पुनर्वसन लांबणीवर गेले आहे. दरम्यान, देव्हारी गावाच्या पुनर्वसनासाठी ३0 कोटी रुपयांचा निधी लागणार असून, निधीची तरतूद झाल्याशिवाय पुनर्वसन होऊ शकत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, बुलडाणा, चिखली व मोताळा तालुक्यात ज्ञानगंगा अभयारण्य पसरले आहे. समृद्ध वनसंपदा व वन्यजिवांचे आश्रयस्थान असलेल्या हे जंगल १९९७ साली अभयारण्य घोषित झाले. याच अभयारण्यातून बुलडाणा-बोथा- खामगाव हा राज्य मार्ग गेला आहे. अभयारण्य घोषित झाल्यानंतर या जंगलाच्या मध्यभागी असलेल्या देव्हारी, बोराळासह खामगाव तालुक्यातील माटरगाव, बोथा, गेरू, कोंटी, गोंधनखेड या सात गावांच्या पुनर्वसनाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने देव्हारी हे गाव जंगलाच्या मध्यभागी असल्यामुळे त्याचे पुनर्वसन प्राधान्याने करण्याचे शासनाने ठरविले होते. त्यासाठी वन विभाग व वन्यजीव विभागाने वेळोवेळी देव्हारी गावात जाऊन ग्रामस्थांची बैठक घेत तशा सूचना केल्या होत्या. पुनर्वसनाच्या मोबदल्यात गावकर्‍यांच्या नेमक्या कोणत्या मागण्या आहेत, यावर चर्चा करून तसा अहवाल एकदा नव्हे, तर अनेकदा शासनाकडे पाठविला होता. गावकर्‍यांनी २२ एप्रिल २0१३ ला ग्रामपंचायतीचा ठराव आणि शेतीचे सात-बारा शासनाकडे पाठविले आहेत. विशेष म्हणजे, तत्कालीन आघाडी सरकारने अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य क्षेत्रासाठी १0 कोटी ७५ लाख रुपये एवढी भरीव तरतूदसुद्धा करून दिली होती. तरी देखील देव्हारी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील १८ वर्षांपासून प्रलंबित आहे. रात्री १0 ते सकाळी ६ वाजेपर्यंत हा मार्ग रहदारीला बंद करण्यात आल्याने गावकर्‍यांच्या समस्येत वाढ झाली आहे.