बुलडाणा : खरीप हंगाम हातून गेल्यावर शेतकर्यांना रब्बी हंगामाची प्रतिक्षा होती मात्र रब्बीच्या हंगामात पीकांवरील अळयांच्या प्रकोपामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्यांनी हरभरा पिकांची पेरणी केली. मात्र अवकाळी पाऊस व ढगाळ वातावराणामुळे हरभार पिकांवर घाटेअळी पडली आहे. त्यामुळे बुलडाणा, मलकापूर, मोताळा, चिखली तालुक्यातील ५२ हजार ३00 हेक्टरवरील हरभरा पिकांना धोका निर्माण झाला आहे.उपविभागीय कृषी अधिकारी,बुलउाणा अंतर्गत येणार्या बुलडाणा, मलकापूर, मोताळा व चिखली तालुक्यात किडरोगाच्या व्यवस्थापनासाठी सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. या चारही तालुक्यातील हरभार पिकांचे सर्वेक्षण केले असता, पिकांवर मुख्यअळी घाटेअळीचा प्रदरुभाव झाल्याचे आढळून आहे.उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी या किड नियंत्रणासाठी एकात्मीक किड व्यवस्थापन कार्यक्रम राबविला जात असल्याचे सांगीतले. गहु, मसुर, मोहरी, कोथींबीर अथवा जवस आंतरपिक घेतल्यास घाटे अळीचा प्रादरुभाव कमी होतो. शेतकर्यांनी जैविक किटक नाशकांची फवारणी करावी, असे त्यांनी सांगीतले.
हरभरा पिकांवर घाटेअळीचा प्रकोप
By admin | Updated: January 30, 2015 01:10 IST