शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

अंगणवाड्यात दिला जातो निकृष्ट पोषण आहार

By admin | Updated: November 29, 2014 00:02 IST

चिखली तालुक्यातील प्रकार, चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक.

चिखली (बुलडाणा) : तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये जाणार्‍या बालकांना अत्यंत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिल्या जात असल्याची बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उघडकीस आणली असून पोषण आहार पुरविणार्‍या कंत्राटदाराकडून निष्पाप बालकांच्या आरोग्याशी खेळल्या जात असल्याने हा प्रकार तातडीने रोखण्यात यावा व संबंधीत कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा तालुकाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी दिला आहे.तालुक्यात एकूण ३२३ अंगणवाड्या असून यामध्ये १0 हजार ३९४ बालके दाखल आहेत. या बालकांना पोषण आहार पुरविण्याचे काम कंत्राटी पध्दतीने होत असल्याने कंत्राटदार आ पल्या अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहार बालकांना पुरवित आहे. पोषण आहारातील धान्य अत्यंत हिन दर्जाचे असून तांदूळ, चवळी, मटकी, हरबरा, मसूर दाळ, तूर दाळ, सोयाबीन या कडधान्याला किड लागलेली असते. हे धान्य जनावरेही खाऊ शकणार नाहीत, असे असते. धान्य पुरविणारी एजन्सी व ठेकेदार केवळ नफा कमविण्यात मश्गूल असून संबंधित अधिकारी व ठेकेदाराचे साटेलोटे असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. ठेकेदार मंडळी निष्पाप कोवळ्या मुलांच्या जीवाशी एकप्रकारे खेळत असून त्यांना बालकांच्या आरोग्याशी काहीच देणेघेणे नसल्याने कुपोषण कमी होण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला पोषण आहार बालकांच्या जीवावर उठला आहे.विकास औद्योगीक संस्था खामगाव यांच्याकडून सदरचा पोषण आहार पुरविण्यात आला होता. याबाबत सेविकांकडून किंवा सुपरवायझरकडून कुठल्याही प्रकारची माहिती कार्यालयात पुरविण्यात आली नसल्याची प्रभारी सांख्यीकी विस्तार अधिकारी बी.पी.आंभोरे यांनी दिली.