शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

कोरड्या विहिरीत दोन दिवसापासून काळवीटाची मृत्यूशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:54 IST

संग्रामपुर : गेल्या दोन दिवसापासून एका शिवारातील कोरड्या विहिरीत एका काळवीटाची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

- अजहर अली लोकमत न्युज नेटवर्क संग्रामपुर : गेल्या दोन दिवसापासून एका शिवारातील कोरड्या विहिरीत एका काळवीटाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वान शिवारात वडगाव वान दानापूर रस्त्यालगत एका शेतामधील कोरड्या विहिरीत काळवीट पडून असल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले.दोन दिवसापासून हे काळवीट विहिरीत पडले असल्याचे नागरिकांनी सांगितले. पाण्याच्या शोधात वन्यजीव वणवण भटकंती करीत असल्याचा मुद्दा  या निमित्त्याने ऐरणीवर आला आहे.  काळवीट पाण्याच्या शोधात भटकत असताना कोरड्या विहिरीत जाऊन पडले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शेतशिवारांमध्ये वन्यजिवांची भटकंती चिंतेचा विषय असल्याने यावर वनविभागाने तात्ळीने पाऊले उचलण्याची गरज आहे. या घटनेची माहिती जळगाव जामोद येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय यांना देण्यात आली असून दुपारपर्यंत वन विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी काळविटाला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काळविट बाहेर काढण्यात अडथळा येत असल्याचे त्यांनी सांगितले. वनविभागाच्या रेस्क्यु टिमने लवकरात लवकर काळविटाला बाहेर काढण्याची गरज आहे. घटनास्थळावर वन विभागाचा एकही कर्मचारी फिरकला नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. सध्या तरी पडून असलेला काळवीट कोरड्या विहिरी मध्ये मृत्यूशी झुंज देताना दिसत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूरwildlifeवन्यजीव