शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:08 IST

खामगाव: गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी किमान ५0 हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा गारपीटग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

ठळक मुद्देगहू,हरभरा, कांदा पिकाला हेक्टरी ५0 हजार रुपये मदतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी किमान ५0 हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा गारपीटग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचा योग्य मोबदला द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर पंचायत समितीवर भव्य मोर्चा शनिवारी दुपारी काढला. यावेळी ते बोलत होते.  रविकांत तुपकर यांनी बैलगाडी मोर्चाचे नेतृत्व केले. यापुढे सरकारच्या चुकीच्या धोरणावर तुपकर यांनी कडाडून टीका केली. एकीकडे माल्ल्या हजारो कोटींचा डल्ला मारून परदेशात पळून गेला. आता नीरव मोदीने आमच्या बँकावर डाका टाकून तोही फरार झाला. शेतकरी मात्र हजार-दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी सरकारपुढे हात पसरवत आहे. काय चाललंय या देशात, ‘सब का साथ, सबका विकास’ म्हणणार्‍या मोदीने कोणाचा विकास केला? असा सवाल उपस्थित करून देश विकायला काढणार्‍या या सरकारला आता घरी पाठविण्यासाठी शेतकर्‍यांनो सज्ज व्हा, असे आवाहन तुपकर यांनी केले.      बोंडअळीच्या अनुदानाचे काय झाले? सोयाबीनने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. आता पुन्हा नैसर्गिक आपत्तीने शेतकरी कोलमडून पडला. गारपिटीने शेतकर्‍यांचा गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष ही पिके उद्ध्वस्त झाली. त्यामुळे या अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी सापडला असताना त्याला मदतीचा हात देण्याऐवजी सरकार आता वीमा कंपन्यांकडे बोट दाखवत आहे. अनेक शेतकर्‍यांना विमा भरता आला नाही. मग अशा शेतकर्‍यांना तुम्ही वार्‍यावर सोडणार काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे नुकसानग्रस्तांचे पंचनामे करताना प्रशासन दुजाभाव करीत आहे. गावपुढारी पटवार्‍यांना हाताशी धरून आपल्या जवळच्या लोकांचे पंचनामे करून घेत आहे. त्यामुळे सामान्य शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. ही हुकूमशाही वेळीच बंद न झाल्यास व सर्वांना समान न्याय न मिळाल्यास अधिकार्‍यांना झोडपून काढा, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.  या मोर्चामध्ये स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, मोहन पाटील, उज्ज्वल चोपडे, रोषण देशमुख, संतोष दाने, विलास तराळे,  ज्ञानेश्‍वर हागे सहभागी झाले होते. 

तोंड पाहून पंचनामे करू नका!शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा, तोंड पाहून पंचनामे करणे बंद करा व ज्यांचे खरेच नुकसान झाले त्यांना मदत द्या अन्यथा शेतकरी हातात रुम्हणे घेऊन ठोकून काढतील, असा सूचक इशाराही तुपकर यांनी दिला.

 

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkhamgaonखामगाव