शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:08 IST

खामगाव: गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी किमान ५0 हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा गारपीटग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

ठळक मुद्देगहू,हरभरा, कांदा पिकाला हेक्टरी ५0 हजार रुपये मदतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी किमान ५0 हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा गारपीटग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचा योग्य मोबदला द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर पंचायत समितीवर भव्य मोर्चा शनिवारी दुपारी काढला. यावेळी ते बोलत होते.  रविकांत तुपकर यांनी बैलगाडी मोर्चाचे नेतृत्व केले. यापुढे सरकारच्या चुकीच्या धोरणावर तुपकर यांनी कडाडून टीका केली. एकीकडे माल्ल्या हजारो कोटींचा डल्ला मारून परदेशात पळून गेला. आता नीरव मोदीने आमच्या बँकावर डाका टाकून तोही फरार झाला. शेतकरी मात्र हजार-दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी सरकारपुढे हात पसरवत आहे. काय चाललंय या देशात, ‘सब का साथ, सबका विकास’ म्हणणार्‍या मोदीने कोणाचा विकास केला? असा सवाल उपस्थित करून देश विकायला काढणार्‍या या सरकारला आता घरी पाठविण्यासाठी शेतकर्‍यांनो सज्ज व्हा, असे आवाहन तुपकर यांनी केले.      बोंडअळीच्या अनुदानाचे काय झाले? सोयाबीनने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. आता पुन्हा नैसर्गिक आपत्तीने शेतकरी कोलमडून पडला. गारपिटीने शेतकर्‍यांचा गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष ही पिके उद्ध्वस्त झाली. त्यामुळे या अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी सापडला असताना त्याला मदतीचा हात देण्याऐवजी सरकार आता वीमा कंपन्यांकडे बोट दाखवत आहे. अनेक शेतकर्‍यांना विमा भरता आला नाही. मग अशा शेतकर्‍यांना तुम्ही वार्‍यावर सोडणार काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे नुकसानग्रस्तांचे पंचनामे करताना प्रशासन दुजाभाव करीत आहे. गावपुढारी पटवार्‍यांना हाताशी धरून आपल्या जवळच्या लोकांचे पंचनामे करून घेत आहे. त्यामुळे सामान्य शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. ही हुकूमशाही वेळीच बंद न झाल्यास व सर्वांना समान न्याय न मिळाल्यास अधिकार्‍यांना झोडपून काढा, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.  या मोर्चामध्ये स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, मोहन पाटील, उज्ज्वल चोपडे, रोषण देशमुख, संतोष दाने, विलास तराळे,  ज्ञानेश्‍वर हागे सहभागी झाले होते. 

तोंड पाहून पंचनामे करू नका!शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा, तोंड पाहून पंचनामे करणे बंद करा व ज्यांचे खरेच नुकसान झाले त्यांना मदत द्या अन्यथा शेतकरी हातात रुम्हणे घेऊन ठोकून काढतील, असा सूचक इशाराही तुपकर यांनी दिला.

 

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkhamgaonखामगाव