शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:04 IST

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीनसह इतरही पिकांना कोंब फुटून हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ...

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीनसह इतरही पिकांना कोंब फुटून हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर केले होते. त्यामधून लोणार तालुका वगळण्यात आला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. चुकीचे सर्वेक्षण केल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागले. लोणार तालुक्यामध्ये सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होता. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे लोणार तालुक्यातील मूग, उडीद ही पिके हातची गेली. तर सोयाबीनच्या उभ्या पिकांमधील शेंगांना कोंब फुटले. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व मंडळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लोणार तालुक्यातील मंडळात अतिवृष्टी होऊनही शासनदरबारी योग्य ते पंचनामे सादर केले नाहीत. लोणार तालुक्यात अतिवृष्टी झाली नसल्याची चुकीची नोंद महसूल दफ्तरी झाल्यामुळे लोणार तालुक्यातील हजारो शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या या समस्येकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन त्यांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा लोणार तालुक्यातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा निवेदनाद्वारे भुमराळा येथील शेतकरी देवानंद सानप यांच्यासह शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्या मेलवर केली आहे.