शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

बुलडाणा जिल्ह्यात ८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 11:24 IST

आठ हजार ५१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून १५९ गावातील शेतजमीन बाधीत झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या संतधार पावसानंतर १७ आॅगस्ट रोजी झालेल्या दमदार पावसादरम्यान सहा तालुक्यातील आठ हजार ५१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून १५९ गावातील शेतजमीन बाधीत झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.जुलै महिन्यात १५ ते १६ आॅगस्ट दरम्यान शेगाव व खामगाव तालुक्यातील आठ मंडळात झालेल्या अतिवृष्टीत १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते तर २०० हेक्टरवरील शेत जमीन खरडून गेली होती. त्यानंतरचे यंदाच्या पावसाळ््यातील दुसरे मोठे नुकसान आहे. १७ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसादरम्यान बुलडाणा, चिखली, संग्रामपूर, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा या सहा तालुक्यात प्रामुख्याने आठ हजार ५१ हेक्टरवरील पिकांचे हे नुकसान झाले आहे. बुलडाणा तालुक्यात चार हजार ११८ हेक्टर, चिखली तालुक्यात १,९४४ हेक्टर, संग्रामपूर तालुक्यात ८५, मेहकर तालुक्यात १५०, लोणार तालुक्यात ३२१, देऊळगाव राजा तालुक्यात ५१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.महसूल विभागने नुकसानाचे पंचनामे सुरू केले आहे. धाड व म्हसला मंडळामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून एकट्या बुलडाणा तालुक्यातील ८६० हेक्टरवरील जमीन खरडली असून नदी काठावरील पिकांना फटका बसला.

९१६ हेक्टरवरील जमीन खरडलीएकट्या बुलडाणा तालुक्यात ९१६ हेक्टरवरील शेत जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही शेत जमीन पुन्हा पुर्ववत कसण्या योग्य करण्यासाठी बराच कालावधी जावा लागणार असल्याचे चित्र आहे. जुलै महिन्यात शेगाव व खामगाव तालुक्यातील आठ मंडळामधील २०० हेक्टर जमीनही अशीच खरडून गेली होती. त्यामुळे आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात १,०१६ हेक्टरवरील शेत जमीन खरडून गेल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीRainपाऊस