शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपये खर्च करुनही बांधात नाही पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 15:30 IST

प्रकल्पामध्ये पिण्याचे पाणी आरक्षीत ठेवण्यात आले. त्यामुळे शेतीला रब्बी हंगामासाठी पाणी मिळू शकले नाही.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एकाही प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या बांधावर अद्याप पाणी पोहचले नसल्याचे वास्तव आहे. त्यात कालवा दुरुस्तीच्या नावावर मात्र लाखोची बिले काढल्या गेली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व प्रकाराची वरिष्ठांनी चौकशी करणे गरजेचे आहे.बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा, नळगंगा, मन, पेनटाकळी, मस, तोरणा, ज्ञानगंगा, गोराळा असे सिंचन प्रकल्प प्रामुख्याने आहेत. गत दोन वर्षापासून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडला. प्रकल्पामध्ये पिण्याचे पाणी आरक्षीत ठेवण्यात आले. त्यामुळे शेतीला रब्बी हंगामासाठी पाणी मिळू शकले नाही. लाखो हेक्टरवरील पिके कोमजली. शेतकºयांची मोठी हानी झाली. शेतकरी संघटनांनी हाहाकार केला. मात्र सिंचन विभागाच्या अधिकारी सोडा पण जिल्हा प्रशासनाला सुद्धा शेतकºयांची हाक ऐकू आली नाही. त्यामुळे पाणी मिळत नाही अशी शेतकºयांची धारणा झाली. अनेकांनी आपल्या शेतातून गेलेले पाट नांगराने फोडून काढले. जमीन भूईसपाट केली. विशेष म्हणजे सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कालव्याची मोठ्या प्रमाणात तुटफूट झाली आहे. खडकपूर्णा, नळगंगा, मन, मस प्रकल्पातून शेतीला पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे. मात्र कालव्याची दुरुस्ती अद्याप होवू शकली नाही. त्यामुळे पाणी सोडण्यात अडथळा निर्माण झाला आहे. कित्येक वर्षापासून पाटातून पाणी वाहिले नसल्याने पाटाची नासधूस झाली आहे.पाणी वापर संस्थांचीही दिशाभूलसिंचन प्रकल्पातून शेतकºयांना पाणी वाटप करण्यासाठी प्रत्येक गाव शिवारात एक पाणी वापर समिती कार्यान्वीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनात पाणीवापर समितीची बैठकही घेण्यात आली. मात्र सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी चूकीची माहिती दिल्याने पाणी वाटपास विलंब होत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.आधीच शेतकरी हतबल झाला आहे. सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी पाणी वाटपाचे कुठलेही नियोजन अद्याप केलेले दिसत नाही. आधीच शेतकरी आर्थीक संकटात आहे. याची जाणिव प्रशासनाने ठेवावी.

- कैलास फाटे,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनाकालव्याच्या दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आली आहेत. काही ठिकाणी महामार्गाचा अडथळा आला आहे. त्यासंदर्भात आम्ही महामार्ग प्राधिकरणाला पत्रव्यवहार केला आहे.- अनिल कन्नाअभियंता,जलसंपदा विभाग, बुलडाणा

टॅग्स :khamgaonखामगावDamधरण