शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

लाखो रुपये खर्च करुनही बांधात नाही पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 15:30 IST

प्रकल्पामध्ये पिण्याचे पाणी आरक्षीत ठेवण्यात आले. त्यामुळे शेतीला रब्बी हंगामासाठी पाणी मिळू शकले नाही.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एकाही प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या बांधावर अद्याप पाणी पोहचले नसल्याचे वास्तव आहे. त्यात कालवा दुरुस्तीच्या नावावर मात्र लाखोची बिले काढल्या गेली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व प्रकाराची वरिष्ठांनी चौकशी करणे गरजेचे आहे.बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा, नळगंगा, मन, पेनटाकळी, मस, तोरणा, ज्ञानगंगा, गोराळा असे सिंचन प्रकल्प प्रामुख्याने आहेत. गत दोन वर्षापासून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडला. प्रकल्पामध्ये पिण्याचे पाणी आरक्षीत ठेवण्यात आले. त्यामुळे शेतीला रब्बी हंगामासाठी पाणी मिळू शकले नाही. लाखो हेक्टरवरील पिके कोमजली. शेतकºयांची मोठी हानी झाली. शेतकरी संघटनांनी हाहाकार केला. मात्र सिंचन विभागाच्या अधिकारी सोडा पण जिल्हा प्रशासनाला सुद्धा शेतकºयांची हाक ऐकू आली नाही. त्यामुळे पाणी मिळत नाही अशी शेतकºयांची धारणा झाली. अनेकांनी आपल्या शेतातून गेलेले पाट नांगराने फोडून काढले. जमीन भूईसपाट केली. विशेष म्हणजे सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कालव्याची मोठ्या प्रमाणात तुटफूट झाली आहे. खडकपूर्णा, नळगंगा, मन, मस प्रकल्पातून शेतीला पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे. मात्र कालव्याची दुरुस्ती अद्याप होवू शकली नाही. त्यामुळे पाणी सोडण्यात अडथळा निर्माण झाला आहे. कित्येक वर्षापासून पाटातून पाणी वाहिले नसल्याने पाटाची नासधूस झाली आहे.पाणी वापर संस्थांचीही दिशाभूलसिंचन प्रकल्पातून शेतकºयांना पाणी वाटप करण्यासाठी प्रत्येक गाव शिवारात एक पाणी वापर समिती कार्यान्वीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनात पाणीवापर समितीची बैठकही घेण्यात आली. मात्र सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी चूकीची माहिती दिल्याने पाणी वाटपास विलंब होत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.आधीच शेतकरी हतबल झाला आहे. सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी पाणी वाटपाचे कुठलेही नियोजन अद्याप केलेले दिसत नाही. आधीच शेतकरी आर्थीक संकटात आहे. याची जाणिव प्रशासनाने ठेवावी.

- कैलास फाटे,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनाकालव्याच्या दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आली आहेत. काही ठिकाणी महामार्गाचा अडथळा आला आहे. त्यासंदर्भात आम्ही महामार्ग प्राधिकरणाला पत्रव्यवहार केला आहे.- अनिल कन्नाअभियंता,जलसंपदा विभाग, बुलडाणा

टॅग्स :khamgaonखामगावDamधरण