शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सद्याचे सरकार भांडवलदारांचो हित जोपासणारे आणि थापाडे - रघुनाथदादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:41 IST

सत्तास्थानी असलेले प्रत्येक राज्यकर्ते हे भांडवलदारांचे हित जोपासत  असून, सद्यस्थितीतील सरकार हे तर थापाडे सरकार आहे. अशी घणाघाती टीका  शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी २0 नोव्हेंबर रोजी स्थानिक  विश्राम भवनावर आयोजित पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देराज्यकर्ते भांडवलदारांचे जोपासतात हितसरसगट कर्जमाफी देण्याची अँड. मोरेंची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : सत्तास्थानी असलेले प्रत्येक राज्यकर्ते हे भांडवलदारांचे हित जोपासत  असून, सद्यस्थितीतील सरकार हे तर थापाडे सरकार आहे. अशी घणाघाती टीका  शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी २0 नोव्हेंबर रोजी स्थानिक  विश्राम भवनावर आयोजित पत्रकार परिषदेत केली.याप्रसंगी सत्यशोधक शेतकरी संघाचे किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे विदर्भ  प्रमुख दिनकर दाभाडे, बळीराजा शेतकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष गणेशकाका जगताप,  नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष उमाकांत पाटील, सुकाणू समिती राज्य अध्यक्ष कैलास  खांडबहाले व शेतकरी नेते अँड. साहेबराव मोरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.  वर्तमान स्थितीत शेतकर्‍यांना भयावह त्रास उद्भवत आहे. शासनाकडून तर शे तकर्‍यांची क्रुर थट्टा केल्या जात आहे. कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकर्‍यांची  फसवणूक होत आहे. या धर्तीवर शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेण्याकरिता अभ्यास  दौर्‍याची ही चळवळ उभारली असून, त्या अनुषंगाने सबंध राज्यभर या चळवळीद्वारे  शेतकर्‍यांशी संवाद साधल्या जाणार आहे व त्यानंतरच पुढील लढा उभारल्या  जाईल, अशी माहिती रघुनाथदादा पाटील यांनी दिली. दरम्यान, उपस्थित शेतकरी  नेत्यांनीसुद्धा सरकारच्या चुकीच्या धोरणांवर अभ्यासपूर्णरीत्या ताशेरे ओढले.   अँड. साहेबराव मोरे यांनी कर्जमुक्ती योजना ही फसवी असून, या योजनेला देण्यात  आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वगळण्यात यावे,  अथवा सरसकट  कर्जमुक्ती द्यावी, जेणे करून छत्रपतींचा अनादर होणार नाही, असे मत मांडले. या प्रसंगी भाई अशांत वानखेडे, श्याम राठी, हितेश पाटील, मंगला पाटील, एस.पी.  संबारे, नवृत्ती तांबे, दिनकर पाटील, संगीता गांगुर्डे,  सुरेश पाटील, प्रल्हाद ढोले,  कैलास काळे, ज्ञानदेव तायडे उपस्थित होते.