शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

अतिवृष्टीमुळे १४ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 10:49 IST

सहा तालुक्यातील ११९ गावातील १४ हजार ३११ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील आठ मंडळामध्ये बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ११९ गावातील १४ हजार ३११ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान २०० हेक्टर शेत जमीन खरडून गेली आहे.यात प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकांना फटका बसला आहे. बुधवारी सर्वाधिक पाऊस हा शेगाव तालुक्यात झाला असून त्याची नोंद १०८ मिमी ऐवढी आहे. तालुक्यातील पाचही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेगाव मंडळात १०५ मिमी, मनसगावमध्ये ७८, माटरगावमध्ये १०८, जलंबमध्ये ८७ आणि जवळ बुद्रूक मंडळामध्ये १६६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे नदी काठची शेती काही ठिकाणी खरडून गेली होती तर काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याने जीवनोपयोगी वस्तुंचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीनंतर महसूल विभागाची पथके शेगाव तालुक्यातील पाचही मंडळामध्ये गेली होती. तेथे नुकसानाचा प्राथमिक अंदाज त्यांनी घेतला होता. त्यामध्ये तालुक्यात १२ हजार ४१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. खामगाव तालुक्यातही एक हजार २४० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुके १५ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे प्रभावीत झालेले आहेत. यात मलकापूर, खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांचा समावेश आहे. दरम्यान, हा प्राथमिक अंदाज असला तरी अंतिम नुकसानाचा अहवाल येत्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे, असे सुत्रांनी सांगितले. शेगाव तालुक्यात अधिक नुकसान आहे.

२०० हेक्टरवरील जमीन खरडलीजिल्ह्यातील दोन तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २०० हेक्टर जमीन खरडून गेल्याचा अंदाज असून नेमकी कोणत्या तालुक्यातील ही शेत जमीन खरडून गेली आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही मात्र शेगाव तालुक्यात या पावसामुळे सर्वाधिक नुकसान केले आहे. त्यामुळे या तालुक्यातच हे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. एकट्या शेगाव तालुक्यातील ७७ गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान जाले असून मलकापूरमध्ये १३, नांदुऱ्यात सात, जळगाव जामोदमध्ये चार, संग्रामपूर तालुक्यात पाच गावांमध्ये नुकसान झाले आहे.या तालुक्यांतही झाले नुकसानबुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे. बोगस सोयाबीन बियाण्यामुळे शेतकरी त्रस्त असताना घाटाखालील तालुक्यांना अतिवृष्टीचा हा फटका बसला आहे. मलकापूर तालुक्यात ३०० हेक्टर, खामगाव तालुक्यात १२४० हेक्टर, नांदुरा तालुक्यात ३०० हेक्टर, जळगाव जामोद तालुक्यात २७, संग्रामपूर तालुक्यात ३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस