शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

अतिवृष्टीमुळे १४ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 10:49 IST

सहा तालुक्यातील ११९ गावातील १४ हजार ३११ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील आठ मंडळामध्ये बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ११९ गावातील १४ हजार ३११ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान २०० हेक्टर शेत जमीन खरडून गेली आहे.यात प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकांना फटका बसला आहे. बुधवारी सर्वाधिक पाऊस हा शेगाव तालुक्यात झाला असून त्याची नोंद १०८ मिमी ऐवढी आहे. तालुक्यातील पाचही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेगाव मंडळात १०५ मिमी, मनसगावमध्ये ७८, माटरगावमध्ये १०८, जलंबमध्ये ८७ आणि जवळ बुद्रूक मंडळामध्ये १६६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे नदी काठची शेती काही ठिकाणी खरडून गेली होती तर काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याने जीवनोपयोगी वस्तुंचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीनंतर महसूल विभागाची पथके शेगाव तालुक्यातील पाचही मंडळामध्ये गेली होती. तेथे नुकसानाचा प्राथमिक अंदाज त्यांनी घेतला होता. त्यामध्ये तालुक्यात १२ हजार ४१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. खामगाव तालुक्यातही एक हजार २४० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुके १५ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे प्रभावीत झालेले आहेत. यात मलकापूर, खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांचा समावेश आहे. दरम्यान, हा प्राथमिक अंदाज असला तरी अंतिम नुकसानाचा अहवाल येत्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे, असे सुत्रांनी सांगितले. शेगाव तालुक्यात अधिक नुकसान आहे.

२०० हेक्टरवरील जमीन खरडलीजिल्ह्यातील दोन तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २०० हेक्टर जमीन खरडून गेल्याचा अंदाज असून नेमकी कोणत्या तालुक्यातील ही शेत जमीन खरडून गेली आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही मात्र शेगाव तालुक्यात या पावसामुळे सर्वाधिक नुकसान केले आहे. त्यामुळे या तालुक्यातच हे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. एकट्या शेगाव तालुक्यातील ७७ गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान जाले असून मलकापूरमध्ये १३, नांदुऱ्यात सात, जळगाव जामोदमध्ये चार, संग्रामपूर तालुक्यात पाच गावांमध्ये नुकसान झाले आहे.या तालुक्यांतही झाले नुकसानबुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे. बोगस सोयाबीन बियाण्यामुळे शेतकरी त्रस्त असताना घाटाखालील तालुक्यांना अतिवृष्टीचा हा फटका बसला आहे. मलकापूर तालुक्यात ३०० हेक्टर, खामगाव तालुक्यात १२४० हेक्टर, नांदुरा तालुक्यात ३०० हेक्टर, जळगाव जामोद तालुक्यात २७, संग्रामपूर तालुक्यात ३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस