शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

अतिवृष्टीमुळे १४ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 10:49 IST

सहा तालुक्यातील ११९ गावातील १४ हजार ३११ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील आठ मंडळामध्ये बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ११९ गावातील १४ हजार ३११ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान २०० हेक्टर शेत जमीन खरडून गेली आहे.यात प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकांना फटका बसला आहे. बुधवारी सर्वाधिक पाऊस हा शेगाव तालुक्यात झाला असून त्याची नोंद १०८ मिमी ऐवढी आहे. तालुक्यातील पाचही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेगाव मंडळात १०५ मिमी, मनसगावमध्ये ७८, माटरगावमध्ये १०८, जलंबमध्ये ८७ आणि जवळ बुद्रूक मंडळामध्ये १६६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे नदी काठची शेती काही ठिकाणी खरडून गेली होती तर काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याने जीवनोपयोगी वस्तुंचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीनंतर महसूल विभागाची पथके शेगाव तालुक्यातील पाचही मंडळामध्ये गेली होती. तेथे नुकसानाचा प्राथमिक अंदाज त्यांनी घेतला होता. त्यामध्ये तालुक्यात १२ हजार ४१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. खामगाव तालुक्यातही एक हजार २४० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुके १५ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे प्रभावीत झालेले आहेत. यात मलकापूर, खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांचा समावेश आहे. दरम्यान, हा प्राथमिक अंदाज असला तरी अंतिम नुकसानाचा अहवाल येत्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे, असे सुत्रांनी सांगितले. शेगाव तालुक्यात अधिक नुकसान आहे.

२०० हेक्टरवरील जमीन खरडलीजिल्ह्यातील दोन तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २०० हेक्टर जमीन खरडून गेल्याचा अंदाज असून नेमकी कोणत्या तालुक्यातील ही शेत जमीन खरडून गेली आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही मात्र शेगाव तालुक्यात या पावसामुळे सर्वाधिक नुकसान केले आहे. त्यामुळे या तालुक्यातच हे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. एकट्या शेगाव तालुक्यातील ७७ गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान जाले असून मलकापूरमध्ये १३, नांदुऱ्यात सात, जळगाव जामोदमध्ये चार, संग्रामपूर तालुक्यात पाच गावांमध्ये नुकसान झाले आहे.या तालुक्यांतही झाले नुकसानबुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे. बोगस सोयाबीन बियाण्यामुळे शेतकरी त्रस्त असताना घाटाखालील तालुक्यांना अतिवृष्टीचा हा फटका बसला आहे. मलकापूर तालुक्यात ३०० हेक्टर, खामगाव तालुक्यात १२४० हेक्टर, नांदुरा तालुक्यात ३०० हेक्टर, जळगाव जामोद तालुक्यात २७, संग्रामपूर तालुक्यात ३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस