शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

गोठ्याला आग, दोन लाखांचे नुकसान, दोनजण जखमी: शेतीच्या साहित्यासह गुरांचा चारा जळून खाक

By ब्रह्मानंद जाधव | Updated: March 16, 2023 17:35 IST

Buldhana News: बुलढाणा तालुक्यात धामणगाव मासरूळ ते वरुड रस्त्यावरील गोठ्याला आग लागून दोन लाख रुपयांच्यावर नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीदरम्यान घडली.

- ब्रह्मानंद जाधव

मासरूळ : बुलढाणा तालुक्यात धामणगाव मासरूळ ते वरुड रस्त्यावरील गोठ्याला आग लागून दोन लाख रुपयांच्यावर नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीदरम्यान घडली. यामध्ये दोनजण जखमी झाले आहेत. तसेच शेतीसाठी लागणारे अवजारे, ठिबक सिंचन, एक वर्ष पुरेल एवढा चारा असून या गोठ्यावरील टिन जळून खाक झालेली आहे.

आग विझवताना शेतकरी व त्याच्या मुलाला दुखापत झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मासरूळ येथील गंगाराम पायघन यांचा त्यांच्या घराजवळ गोठा आहे. गोठ्याला बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या दरम्यान आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय या आगीत गोठ्यामध्ये ठेवलेले शेती साहित्यही जळून खाक झाले. गोठ्याला घर लागून असल्याने रामफळ, लिंबाचे झाड, शेतातील मका काढून वाळू घातलेली असून तिचा ढीग सुद्धा थोडाफार जळून नुकसान झाले आहे. यामध्ये जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे. गोठ्याला आग लागल्याची माहिती कळताच मासरूळ येथील माजी सरपंच शेषराव सावळे, मधुकर महाले, पोलीस पाटील देविदास पवार, तलाठी कानडजे, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप शिनकर, ग्रामपंचायत सदस्य किरण उगले, नंदकिशोर देशमुख, संभाजीराव देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करून अहवाल शासनस्तरावर पाठविला.

घरातील कुटुंबाची तारांबळमध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमुळे पायघन कुटुंबाची तारांबळ उडाली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी गंगाराम पायघन यांचे मुले व पत्नी, सुना आणी त्यांचा मुलगा सर्व कुटूंबांनी धडपड केली. दरम्यान, आगीच्या या रौद्र रूपात दोनजण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी आजूबाजूचे शेतकरी धावून शेतातील मोटर पंप चालू करून आग आटोक्यात आणली. या घटनेत शेतकऱ्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तातडीने पीडित शेतकऱ्याला मदतीची मागणी केली जात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग