शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शेतात पऱ्हाटीचे सरण रचून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:37 IST

श्रीकृष्ण लांडे (  ७५) व सईबाई लांडे ( ७० )असे मृत दाम्पत्याची नावे आहेत.  

खामगाव : शेतात पऱ्हाटीचे सरण रचून एका वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना शुक्रवारी उजेडात आली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.जयपूर लांडे येथील श्रीकृष्ण लांडे (७५) व त्यांची पत्नी सईबाई लांडे (७०) हे दोघे गुरुवारी सकाळी गावाजवळच असलेल्या त्यांच्या शेतात नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी गेले होते; परंतु दोघेही उशिरापर्यंत घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा भानुदास लांडे आणि पुतण्या हे दोघे रात्री त्यांना पाहण्यासाठी शेतात गेले. शेतात ते दोघेही कोठेही आढळून आले नाही; मात्र त्याठिकाणी दोघांचेही मृतदेह पºहाटीच्या गंजीत जळालेल्या अवस्थेत दिसून आले.हा प्रकार पाहून दोघेही भयभीत झाले. यावेळी भानुदास लांडे यांनी नातेवाईकांना माहिती दिली. त्याचबरोबर शहर पोलिसांनाही घटनेबाबत त्वरित माहिती देण्यात आली. घटनेचे गांभिर्य पाहता शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील अंबुलकर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी दोन्ही वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. यावेळी घटनास्थळीच दोन्ही पार्थिवांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली.याप्रकरणी मृत दाम्पत्याचा मुलगा भानुदास लांडे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या दाम्पत्याचा घरात कोणताही वाद नसताना त्यांनी टोकाचा निर्णय का घेतला? याचे गुढ मात्र कायम आहे.दुसरीकडे या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याच्या घटनेला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी दुजोरा दिला आहे.१२ जून रोजी सकाळी गाव परिसरात हा संपूर्ण प्रकार उघड झाल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत. गंजी पेटवून स्वत:च बसले गंजीवर!शेतात लांडे दाम्पत्याने पेटविलेली पºहाटीची गंजी त्यांनी स्वत:च रचली होती. या गंजीला कडब्याच्या साहाय्याने एका बाजूने पेटविले. तर दुसºया बाजूने त्या गंजीवर जाऊन बसले. यावेळी दोघांनीही कोणताही आरडा-ओरडा केला नाही. त्यामुळे हा प्रकार कुणाच्याही निदर्शनास आला नाही.दरम्यान, या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या का केली? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या वृद्ध शेतकरी दाम्पत्याने कुठल्या अन्य कारणावरून तर आत्महत्या केली नसावी, अशीही चर्चा आहे; मात्र कुठलाही वाद नसताना या वृद्ध दांपत्याने आत्महत्या केल्यामुळे त्या मागील नेमके कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा विचार करता गत पाच महिन्यात ९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या मे महिन्यात झाल्याची नोंद आहे.

टॅग्स :khamgaonखामगावcottonकापूसAccidentअपघात