शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

 दुष्काळात जगविलेली कपाशी वेधतेय लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 17:35 IST

पाण्याचे नियोजन करत जगविलेली कपाशी खामगाव ते भेंडवळ मार्गाने येणाºया-जाणाºया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सध्या सगळीकडे दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने यावर्षी बागायती कपाशीची लागवड नसल्यातच जमा आहे. परंतु अशाही परिस्थितीत माटरगाव परिसरात एका शेतकºयाच्या शेतात कपाशीची रोपे डौलाने उभी आहेत. एकीकडे या परिसरात कोणत्याही शेतात पिक दिसत नसताना ठिबकच्या साह्याने पाण्याचे नियोजन करत जगविलेली कपाशी खामगाव ते भेंडवळ मार्गाने येणाºया-जाणाºया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. गत चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण सातत्याने घटत आहे. गतवर्षीची परिस्थती तर अतिशय बिकट होती. अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात ओल झाली नाही. परिणामी संपूर्ण खरीप हंगाम हातचा गेला. पिके आली नाहीत, सगळीकडे दुष्काळ पडला. नदी-नाल्यांना पूर गेले नसल्याने जलाशये आटली. विहिरी, बोअरवेलला पाणी नाही. याचा परिणाम रब्बी हंगामावरही झाला. सध्याची परिस्थिती तर अतिशय भीषण आहे.  सगळीकडेच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. गावा-गावात प्यायला पाणी नाही. जिथे प्यायलाच पाणी नाही; तिथे पिकांचे तर बोलायलाच नको. त्यामुळेच यावर्षी बागायती कपाशीची लागवड नसल्यातच जमा आहे. जिकडे पाहावे तिकडे नांगरलेली शेती दिसून येते. सर्वच जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्यांच्या विहिरींना थोडे-बहूत पाणी आहे, त्यांनीही बागायती कपाशीची लागवड करण्याची हिंम्मत केलेली नाही. बोटावर मोजण्या एवढ्या शेतकºयांनी कपाशी लागवडीचा प्रयोग केलाही असेल; तरीही अद्याप कोण्याच्याही शेतात डोलणारी कपाशीची रोपे, हे चित्र निदान घाटाखाली तरी दुर्मिळच म्हणावे लागेल. असे असले, तरी शेगाव तालुक्यातील माटरगाव ते भास्तन दरम्यान  एका शेतात कपाशीची रोपे डौलाने उभी असल्याचे दिसून येते. माटरगाव येथील गणेश सपकाळ यांच्या शेतातील हे दृष्य असून तब्बल ५ एकर क्षेत्रावर ‘ताशी’ लागलेली ही कपाशी रोडने येणाºया-जाणाºयांचे लक्ष वेधून घेत आहे.

 विहिरीला आहे भरपूर पाणी!एकीकडे अनेक गावांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना, माटरगाव येथील गणेश सपकाळ यांच्या विहिरीला सध्याही भरपूर पाणी आहे. त्यांच्या ५ एकर शेतातील कपाशी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असली, तरी त्यांनी तब्बल १० एकरावर कपाशीची लागवड केली आहे. विहिरीला भरपूर पाणी असल्यानेच हे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे या परिसरात हरणांचा प्रचंड त्रास आहे. संपूर्ण शेतशिवार खाली असताना एकाच शेतात कपाशीची रोपे दिसत असल्याने हरणांचे कळप कपाशी फस्त करतात. त्यामुळे रात्रंदिवस शेतात जागून कपाशी जपावी लागते, असे गणेश सपकाळ सांगतात.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी