शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

 दुष्काळात जगविलेली कपाशी वेधतेय लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 17:35 IST

पाण्याचे नियोजन करत जगविलेली कपाशी खामगाव ते भेंडवळ मार्गाने येणाºया-जाणाºया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सध्या सगळीकडे दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने यावर्षी बागायती कपाशीची लागवड नसल्यातच जमा आहे. परंतु अशाही परिस्थितीत माटरगाव परिसरात एका शेतकºयाच्या शेतात कपाशीची रोपे डौलाने उभी आहेत. एकीकडे या परिसरात कोणत्याही शेतात पिक दिसत नसताना ठिबकच्या साह्याने पाण्याचे नियोजन करत जगविलेली कपाशी खामगाव ते भेंडवळ मार्गाने येणाºया-जाणाºया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. गत चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण सातत्याने घटत आहे. गतवर्षीची परिस्थती तर अतिशय बिकट होती. अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात ओल झाली नाही. परिणामी संपूर्ण खरीप हंगाम हातचा गेला. पिके आली नाहीत, सगळीकडे दुष्काळ पडला. नदी-नाल्यांना पूर गेले नसल्याने जलाशये आटली. विहिरी, बोअरवेलला पाणी नाही. याचा परिणाम रब्बी हंगामावरही झाला. सध्याची परिस्थिती तर अतिशय भीषण आहे.  सगळीकडेच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. गावा-गावात प्यायला पाणी नाही. जिथे प्यायलाच पाणी नाही; तिथे पिकांचे तर बोलायलाच नको. त्यामुळेच यावर्षी बागायती कपाशीची लागवड नसल्यातच जमा आहे. जिकडे पाहावे तिकडे नांगरलेली शेती दिसून येते. सर्वच जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्यांच्या विहिरींना थोडे-बहूत पाणी आहे, त्यांनीही बागायती कपाशीची लागवड करण्याची हिंम्मत केलेली नाही. बोटावर मोजण्या एवढ्या शेतकºयांनी कपाशी लागवडीचा प्रयोग केलाही असेल; तरीही अद्याप कोण्याच्याही शेतात डोलणारी कपाशीची रोपे, हे चित्र निदान घाटाखाली तरी दुर्मिळच म्हणावे लागेल. असे असले, तरी शेगाव तालुक्यातील माटरगाव ते भास्तन दरम्यान  एका शेतात कपाशीची रोपे डौलाने उभी असल्याचे दिसून येते. माटरगाव येथील गणेश सपकाळ यांच्या शेतातील हे दृष्य असून तब्बल ५ एकर क्षेत्रावर ‘ताशी’ लागलेली ही कपाशी रोडने येणाºया-जाणाºयांचे लक्ष वेधून घेत आहे.

 विहिरीला आहे भरपूर पाणी!एकीकडे अनेक गावांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना, माटरगाव येथील गणेश सपकाळ यांच्या विहिरीला सध्याही भरपूर पाणी आहे. त्यांच्या ५ एकर शेतातील कपाशी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असली, तरी त्यांनी तब्बल १० एकरावर कपाशीची लागवड केली आहे. विहिरीला भरपूर पाणी असल्यानेच हे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे या परिसरात हरणांचा प्रचंड त्रास आहे. संपूर्ण शेतशिवार खाली असताना एकाच शेतात कपाशीची रोपे दिसत असल्याने हरणांचे कळप कपाशी फस्त करतात. त्यामुळे रात्रंदिवस शेतात जागून कपाशी जपावी लागते, असे गणेश सपकाळ सांगतात.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी