शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

 दुष्काळात जगविलेली कपाशी वेधतेय लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 17:35 IST

पाण्याचे नियोजन करत जगविलेली कपाशी खामगाव ते भेंडवळ मार्गाने येणाºया-जाणाºया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सध्या सगळीकडे दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने यावर्षी बागायती कपाशीची लागवड नसल्यातच जमा आहे. परंतु अशाही परिस्थितीत माटरगाव परिसरात एका शेतकºयाच्या शेतात कपाशीची रोपे डौलाने उभी आहेत. एकीकडे या परिसरात कोणत्याही शेतात पिक दिसत नसताना ठिबकच्या साह्याने पाण्याचे नियोजन करत जगविलेली कपाशी खामगाव ते भेंडवळ मार्गाने येणाºया-जाणाºया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. गत चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण सातत्याने घटत आहे. गतवर्षीची परिस्थती तर अतिशय बिकट होती. अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात ओल झाली नाही. परिणामी संपूर्ण खरीप हंगाम हातचा गेला. पिके आली नाहीत, सगळीकडे दुष्काळ पडला. नदी-नाल्यांना पूर गेले नसल्याने जलाशये आटली. विहिरी, बोअरवेलला पाणी नाही. याचा परिणाम रब्बी हंगामावरही झाला. सध्याची परिस्थिती तर अतिशय भीषण आहे.  सगळीकडेच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. गावा-गावात प्यायला पाणी नाही. जिथे प्यायलाच पाणी नाही; तिथे पिकांचे तर बोलायलाच नको. त्यामुळेच यावर्षी बागायती कपाशीची लागवड नसल्यातच जमा आहे. जिकडे पाहावे तिकडे नांगरलेली शेती दिसून येते. सर्वच जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्यांच्या विहिरींना थोडे-बहूत पाणी आहे, त्यांनीही बागायती कपाशीची लागवड करण्याची हिंम्मत केलेली नाही. बोटावर मोजण्या एवढ्या शेतकºयांनी कपाशी लागवडीचा प्रयोग केलाही असेल; तरीही अद्याप कोण्याच्याही शेतात डोलणारी कपाशीची रोपे, हे चित्र निदान घाटाखाली तरी दुर्मिळच म्हणावे लागेल. असे असले, तरी शेगाव तालुक्यातील माटरगाव ते भास्तन दरम्यान  एका शेतात कपाशीची रोपे डौलाने उभी असल्याचे दिसून येते. माटरगाव येथील गणेश सपकाळ यांच्या शेतातील हे दृष्य असून तब्बल ५ एकर क्षेत्रावर ‘ताशी’ लागलेली ही कपाशी रोडने येणाºया-जाणाºयांचे लक्ष वेधून घेत आहे.

 विहिरीला आहे भरपूर पाणी!एकीकडे अनेक गावांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना, माटरगाव येथील गणेश सपकाळ यांच्या विहिरीला सध्याही भरपूर पाणी आहे. त्यांच्या ५ एकर शेतातील कपाशी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असली, तरी त्यांनी तब्बल १० एकरावर कपाशीची लागवड केली आहे. विहिरीला भरपूर पाणी असल्यानेच हे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे या परिसरात हरणांचा प्रचंड त्रास आहे. संपूर्ण शेतशिवार खाली असताना एकाच शेतात कपाशीची रोपे दिसत असल्याने हरणांचे कळप कपाशी फस्त करतात. त्यामुळे रात्रंदिवस शेतात जागून कपाशी जपावी लागते, असे गणेश सपकाळ सांगतात.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी