शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कापूस, सोयाबीन पिकांच्या उत्पादनात घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:16 IST

संग्रामपूर: तालुक्यातील एकलारा बानोदा, बावनबीर व एकलारा  या गावात सन २0१७-१८ या खरीप हंगामात अनियमित पाऊस  व कीड रोगराईमुळे सोयाबीन व कापूस या पिकात कमालीची  घट झाली.

ठळक मुद्देपैसेवारी कमी करण्यात यावी शेतकर्‍यांची तहसीलदारांकडे  मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील एकलारा बानोदा, बावनबीर व एकलारा  या गावात सन २0१७-१८ या खरीप हंगामात अनियमित पाऊस  व कीड रोगराईमुळे सोयाबीन व कापूस या पिकात कमालीची  घट झाली. त्यामुळे संबंधित विभागाकडून आणेवारी कमी  करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन एकलारा, बावनबीर व  उमरा गावातील शेतकर्‍यांनी तहसीलदार राठोड यांच्याकडे ३0  ऑक्टोबर रोजी दिले.सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, सोयाबीन व कापूस  िपकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली असून, सोयाबीन प्रति  एकर १ ते २ क्विंटल व कापूस प्रति एकर २ ते ४ क्विंटल एवढे  कमी उत्पादन होत आहे. या पिकाला शेतकर्‍यांना भला मोठा  खर्च आला आहे. कापसाला ३ हजार ते ३ हजार ५00 रुपये व  सोयाबीनला १,५00 ते २,३00 रुपये भाव मिळत आहे. शे तकर्‍यांचा झालेला खर्चसुद्धा वसूल न होण्याची स्थिती निर्माण  झालेली आहे. सदर उत्पादनात झालेल्या घटीमुळे शेतकर्‍यांसमोर फार मोठे  संकट उभे झाले आहे. सोयाबीन सोंगणी १,५00 ते २,000  एकरी व कापूस ७ रुपये ते १0 रुपये प्रतिकिलो अशी मजुरी  द्यावी लागत आहे. सोयाबीन या पिकाचा काढणी खर्चसुद्धा  वसूल होत नसून, शेतकर्‍यांनी पिकात ट्रॅक्टर घातले आहे.  त्यामुळे संबंधित विभागाकडून आणेवारी कमी करण्यात यावी व  सदर पिकांचा सर्व्हे करून शेतकर्‍यांना पीक विम्याची नुकसान  भरपाईची शिफारस करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे. 

शेतकर्‍यांना मदत द्या तालुक्यात सोयाबीन व कापूस या पिकांचे उत्पादन कमी झाले  असून, भावसुद्धा मिळेनासा झाला आहे. कमी भावापेक्षा कमी  भावाने खरेदी होत असल्याने शेतकरी पुरता नागवला गेला आहे.  त्यामुळे शासनाने याबाबत सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शे तकर्‍यांना आर्थिक मदतीचा हात देणे गरजेचे बनले आहे. तरी  संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन सदर बाबीसाठी  शासनदरबारी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी