शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

कापूस, सोयाबीन पिकांच्या उत्पादनात घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:16 IST

संग्रामपूर: तालुक्यातील एकलारा बानोदा, बावनबीर व एकलारा  या गावात सन २0१७-१८ या खरीप हंगामात अनियमित पाऊस  व कीड रोगराईमुळे सोयाबीन व कापूस या पिकात कमालीची  घट झाली.

ठळक मुद्देपैसेवारी कमी करण्यात यावी शेतकर्‍यांची तहसीलदारांकडे  मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील एकलारा बानोदा, बावनबीर व एकलारा  या गावात सन २0१७-१८ या खरीप हंगामात अनियमित पाऊस  व कीड रोगराईमुळे सोयाबीन व कापूस या पिकात कमालीची  घट झाली. त्यामुळे संबंधित विभागाकडून आणेवारी कमी  करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन एकलारा, बावनबीर व  उमरा गावातील शेतकर्‍यांनी तहसीलदार राठोड यांच्याकडे ३0  ऑक्टोबर रोजी दिले.सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, सोयाबीन व कापूस  िपकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली असून, सोयाबीन प्रति  एकर १ ते २ क्विंटल व कापूस प्रति एकर २ ते ४ क्विंटल एवढे  कमी उत्पादन होत आहे. या पिकाला शेतकर्‍यांना भला मोठा  खर्च आला आहे. कापसाला ३ हजार ते ३ हजार ५00 रुपये व  सोयाबीनला १,५00 ते २,३00 रुपये भाव मिळत आहे. शे तकर्‍यांचा झालेला खर्चसुद्धा वसूल न होण्याची स्थिती निर्माण  झालेली आहे. सदर उत्पादनात झालेल्या घटीमुळे शेतकर्‍यांसमोर फार मोठे  संकट उभे झाले आहे. सोयाबीन सोंगणी १,५00 ते २,000  एकरी व कापूस ७ रुपये ते १0 रुपये प्रतिकिलो अशी मजुरी  द्यावी लागत आहे. सोयाबीन या पिकाचा काढणी खर्चसुद्धा  वसूल होत नसून, शेतकर्‍यांनी पिकात ट्रॅक्टर घातले आहे.  त्यामुळे संबंधित विभागाकडून आणेवारी कमी करण्यात यावी व  सदर पिकांचा सर्व्हे करून शेतकर्‍यांना पीक विम्याची नुकसान  भरपाईची शिफारस करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे. 

शेतकर्‍यांना मदत द्या तालुक्यात सोयाबीन व कापूस या पिकांचे उत्पादन कमी झाले  असून, भावसुद्धा मिळेनासा झाला आहे. कमी भावापेक्षा कमी  भावाने खरेदी होत असल्याने शेतकरी पुरता नागवला गेला आहे.  त्यामुळे शासनाने याबाबत सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शे तकर्‍यांना आर्थिक मदतीचा हात देणे गरजेचे बनले आहे. तरी  संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन सदर बाबीसाठी  शासनदरबारी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी