शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

४५0 गावांमध्ये नळ योजनेत भ्रष्टाचार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:09 IST

खामगाव : जिल्ह्यातील १४२0 गावांपैकी सुमारे ४५0 गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आतापर्यंत आल्या असून, आणखी अनेक गावांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. याबाबत पाठपुरावा करुन भ्रष्ट अधिकार्‍यांना सळो की पळो करुन सोडण्याचा निर्धार शासकीय नळ पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केला आहे, अशी माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

ठळक मुद्देभ्रष्ट अधिकार्‍यांना वठणीवर आणणारसुबोध सावजी यांचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यातील १४२0 गावांपैकी सुमारे ४५0 गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आतापर्यंत आल्या असून, आणखी अनेक गावांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. याबाबत पाठपुरावा करुन भ्रष्ट अधिकार्‍यांना सळो की पळो करुन सोडण्याचा निर्धार शासकीय नळ पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केला आहे, अशी माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी लोकमतशी बोलताना दिली. बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक स्थानिक विश्रामगृहावर बुधवार ९ ऑगस्ट रोजी पार पडली. यावेळी लोकमतशी बोलताना सुबोध सावजी यांनी माहिती दिली की, जिल्ह्यात आतापर्यंत ४५0 गावांमधून नळ योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी समितीकडे आल्या असून, यात आणखी वाढ होणार आहे. शासनाने जनतेची मूलभूत गरज म्हणून नळ योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला; मात्र या योजनांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने नागरिकांना अजूनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या भ्रष्टाचाराची साखळी स्थानिक पातळीपासून मंत्रालयापर्यंत असून, या भ्रष्ट लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. याकरिता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन हा महत्त्वाचा मुद्दा हाती घ्यावा व नळ योजनांमध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा सावजी यांनी व्यक्त केली. शासनाने कोट्यवधीचा खर्च करुनही जिल्ह्यातील सुमारे ९0 टक्के गावांमधील योजना बंद असल्याचे सावजी यांनी सांगितले.

गुड मॉर्निंग पथकाच्या धर्तीवर पथक स्थापन करावे यावेळी शासनाकडून सध्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदरीमुक्तीसाठी गुडमॉर्निंग पथक स्थापन करुन प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर पोलीस कारवाई केली जात आहे. याप्रमाणेच नळयोजनांमधील भ्रष्टाचार शोधण्यासाठी पथके स्थापन करुन कोणत्या गावात किती खर्च झाला ? नागरिकांना पिण्याचे पाणी नियमित मिळते का ? याची चौकशी या पथकांमार्फत करुन भ्रष्टाचार्‍यांना धडा शिकवावा, अशी मागणीही सावजी यांनी यावेळी केली.

१५ ऑगस्टपासून अधिकार्‍यांना जोड्यांचा अहेरनळयोजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याबाबत तक्रार करण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत; मात्र अनेक तक्रारकर्त्यांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप सुद्धा सावजी यांनी यावेळी केला, तसेच समितीच्या आंदोलनाच्या भूमिकेमुळे काही अधिकारी कामाला लागले असून, १५ ऑगस्टपर्यंत आपण ४५0 गावांमधील कामांची माहिती मागितली आहे. ही माहिती न दिल्यास १५ ते २२ ऑगस्ट दरम्यान जुन्या चपला-जोड्यांचा आहेर आपण अधिकार्‍यांना देणार आहोत, असेही सावजी यांनी सांगितले. तर २६ जानेवारी २0१८ पासून दुसर्‍या टप्प्यातील आंदोलन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सावजी यांनी दिली.

जीवन प्राधिकरण कार्यालयात आज ठिय्या जळगाव जामोद नगराला शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, यासाठी बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणीपुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या जळगाव जामोद कार्यालयात शुक्रवार, ११ ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन करणार आहेत. सकाळी ११ पासून सुरु होणार्‍या या ठिय्या आंदोलनात समिती सदस्य तथा काँग्रेस नेते रमेशचंद्र घोलप, न.प. चे काँग्रेस गटनेते अर्जुन घोलप व नगरसेवक श्रीकृष्ण केदार हे सुद्धा सहभागी होणार आहेत. पंधरा दिवसांपूर्वी सुबोध सावजी यांनी जळगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलाविली होती. त्यामध्ये जळगाव नगराला गोडाडा धरणातून होणारा पाणीपुरवठा हा अत्यंत दूषित असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी गोडाडा धरणावर जावून सुबोध सावजी यांनी पाणीपुरवठय़ाची पाहणीसुद्धा केली होती. संबंधित अधिकार्‍यांशी भ्रमणध्वनीवरुन संभाषण करुन याबाबत त्यांना अवगत केले होते. १0 ऑगस्टपासून जळगाव नगराला शुद्ध पाणीपुरवठा झाला नाही तर ११ ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशी तंबीही त्यांनी अधिकार्‍यांना दिली होती. त्यानुसार शुक्रवार, ११ ऑगस्टला ११ वाजेपासून जळगाव जामोद मजीप्रा कार्यालयात हे ठिय्या आंदोलन सुरु होत आहे.