शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

४५0 गावांमध्ये नळ योजनेत भ्रष्टाचार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:09 IST

खामगाव : जिल्ह्यातील १४२0 गावांपैकी सुमारे ४५0 गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आतापर्यंत आल्या असून, आणखी अनेक गावांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. याबाबत पाठपुरावा करुन भ्रष्ट अधिकार्‍यांना सळो की पळो करुन सोडण्याचा निर्धार शासकीय नळ पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केला आहे, अशी माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

ठळक मुद्देभ्रष्ट अधिकार्‍यांना वठणीवर आणणारसुबोध सावजी यांचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यातील १४२0 गावांपैकी सुमारे ४५0 गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आतापर्यंत आल्या असून, आणखी अनेक गावांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. याबाबत पाठपुरावा करुन भ्रष्ट अधिकार्‍यांना सळो की पळो करुन सोडण्याचा निर्धार शासकीय नळ पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केला आहे, अशी माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी लोकमतशी बोलताना दिली. बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक स्थानिक विश्रामगृहावर बुधवार ९ ऑगस्ट रोजी पार पडली. यावेळी लोकमतशी बोलताना सुबोध सावजी यांनी माहिती दिली की, जिल्ह्यात आतापर्यंत ४५0 गावांमधून नळ योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी समितीकडे आल्या असून, यात आणखी वाढ होणार आहे. शासनाने जनतेची मूलभूत गरज म्हणून नळ योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला; मात्र या योजनांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने नागरिकांना अजूनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या भ्रष्टाचाराची साखळी स्थानिक पातळीपासून मंत्रालयापर्यंत असून, या भ्रष्ट लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. याकरिता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन हा महत्त्वाचा मुद्दा हाती घ्यावा व नळ योजनांमध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा सावजी यांनी व्यक्त केली. शासनाने कोट्यवधीचा खर्च करुनही जिल्ह्यातील सुमारे ९0 टक्के गावांमधील योजना बंद असल्याचे सावजी यांनी सांगितले.

गुड मॉर्निंग पथकाच्या धर्तीवर पथक स्थापन करावे यावेळी शासनाकडून सध्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदरीमुक्तीसाठी गुडमॉर्निंग पथक स्थापन करुन प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर पोलीस कारवाई केली जात आहे. याप्रमाणेच नळयोजनांमधील भ्रष्टाचार शोधण्यासाठी पथके स्थापन करुन कोणत्या गावात किती खर्च झाला ? नागरिकांना पिण्याचे पाणी नियमित मिळते का ? याची चौकशी या पथकांमार्फत करुन भ्रष्टाचार्‍यांना धडा शिकवावा, अशी मागणीही सावजी यांनी यावेळी केली.

१५ ऑगस्टपासून अधिकार्‍यांना जोड्यांचा अहेरनळयोजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याबाबत तक्रार करण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत; मात्र अनेक तक्रारकर्त्यांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप सुद्धा सावजी यांनी यावेळी केला, तसेच समितीच्या आंदोलनाच्या भूमिकेमुळे काही अधिकारी कामाला लागले असून, १५ ऑगस्टपर्यंत आपण ४५0 गावांमधील कामांची माहिती मागितली आहे. ही माहिती न दिल्यास १५ ते २२ ऑगस्ट दरम्यान जुन्या चपला-जोड्यांचा आहेर आपण अधिकार्‍यांना देणार आहोत, असेही सावजी यांनी सांगितले. तर २६ जानेवारी २0१८ पासून दुसर्‍या टप्प्यातील आंदोलन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सावजी यांनी दिली.

जीवन प्राधिकरण कार्यालयात आज ठिय्या जळगाव जामोद नगराला शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, यासाठी बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणीपुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या जळगाव जामोद कार्यालयात शुक्रवार, ११ ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन करणार आहेत. सकाळी ११ पासून सुरु होणार्‍या या ठिय्या आंदोलनात समिती सदस्य तथा काँग्रेस नेते रमेशचंद्र घोलप, न.प. चे काँग्रेस गटनेते अर्जुन घोलप व नगरसेवक श्रीकृष्ण केदार हे सुद्धा सहभागी होणार आहेत. पंधरा दिवसांपूर्वी सुबोध सावजी यांनी जळगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलाविली होती. त्यामध्ये जळगाव नगराला गोडाडा धरणातून होणारा पाणीपुरवठा हा अत्यंत दूषित असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी गोडाडा धरणावर जावून सुबोध सावजी यांनी पाणीपुरवठय़ाची पाहणीसुद्धा केली होती. संबंधित अधिकार्‍यांशी भ्रमणध्वनीवरुन संभाषण करुन याबाबत त्यांना अवगत केले होते. १0 ऑगस्टपासून जळगाव नगराला शुद्ध पाणीपुरवठा झाला नाही तर ११ ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशी तंबीही त्यांनी अधिकार्‍यांना दिली होती. त्यानुसार शुक्रवार, ११ ऑगस्टला ११ वाजेपासून जळगाव जामोद मजीप्रा कार्यालयात हे ठिय्या आंदोलन सुरु होत आहे.