शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बुलडाणा जिल्ह्यातील जनजीवन होतेय सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:46 IST

मिशन बिगीन अंतर्गत तिसऱ्या टप्प्यास आठ जून पासून प्रारंभ झाल्यांनंतर बुलडाणा जिल्ह्यात जनजीवन सुरळीततेच्या दिशने जात असल्याचे चित्र दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मिशन बिगीन अंतर्गत तिसऱ्या टप्प्यास आठ जून पासून प्रारंभ झाल्यांनंतर बुलडाणा जिल्ह्यात जनजीवन सुरळीततेच्या दिशने जात असल्याचे चित्र दिसून आले.सोमवारी जिल्ह्यातील बहुतांश बाजारपेठा उघडलेल्या दिसल्या. बुलडाणा, लोणार, मेहकर, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, खामगावसह ग्रामीण भागातही बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे जिल्ह्याचे अर्थचक्र गतीमान होण्यास प्रारंभ झाला आहे.अस्थायी विक्रेते, छोटे व्यवसाय करणारे, सराफा दुकानांसमोर पोत ओवून देणाºया आणि अगदी पावसाळयाच्या तोंडावर लोणचे घालण्यासाठी घाईगडबड करणाºया महिलांना दहा रुपये किलो प्रमाणे कैºया फोडून देणारेही बाजारात दिसून आले. त्यामुळे हातावर पोट असलेल्या अनेकांना जवळपास अडीच महिन्यांतर काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून येत होते. कपड्याची, भांड्याची, मोबाईल शॉपीसह कटलरीची दुकाने बुलडाणा शहरात उघडलेली दिसून आली. बुलडाण्यातील कपडा मार्केट हे प्रसिद्ध आहे. त्यादृष्टीने कोर्ट रोडवर अस्थायी विक्रेत्यांनी तंबूत त्यांची दुकानेही थाटली होती.कोरोनाची धास्ती असली तरी त्याच्या पासून बचावासाठी काय उपाययोजना व्यक्तीगत स्तरावर कराव्यात, याची जाणीवर आता सामान्य व्यक्तीला झाली आहे. त्यामुळे त्याचे पालन करतच अनेकांनी आपले व्यवहार सोमवारी केले. वास्तविक सोमवारी बुलडाण्यातील बहुतांश दुकाने बंद असतात. मात्र प्रदीर्घ कालावधीनंतर आता दुकाने सुरू झाल्याचे चित्र शहरात होते.

व्यापारीही घेताहेत काळजीबाजारपेठांमध्ये आता काही प्रमाणात ग्राहकांचा गलबलाट सुरू झाला आहे. पूर्वीसारखी स्थिती नसली तरी त्या दिशेने आता पावले पडत असल्याचे दिसून आले. सराफा बाजारातही पोथ, मणी ओवणाऱ्यांनी सोन्या, चांदीच्या दुकानासमोर आपली दुकाने थाटली असल्याचे दिसून आले.

धार्मिक स्थळे मात्र अद्यापही बंदजिल्ह्यातील बहुतांश व्यवहार सुरळीत होत असल्याचे दिसून आले तरी बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील धार्मिक स्थळे अद्याप उघडण्यात आली नाहीत. नॉन रेड झोनमधील बुलडाणा जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासूनच अनेक व्यवसाय सुरू झाले होते.

सुरक्षीत शारीरिक अंतर, निर्जंतुकीकरण केल्यानंतरच ग्राहकांना दुकानात घेण्यात येत आहे. पाच पेक्षा अधिक ग्राहक ऐका वेळी दुकानात घेतले जात नाहीत. सोबतच सध्याची सकाळी नऊ ते सायंकाळी पाचची वेळ व्यवसायासाठी पुरेशी आहे. प्रसंगी ती एक तासाने कमी केली तरी चालेले, असे बुलडाणा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय बाफना यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक