शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

CoronaVirus In Buldhana : सात वर्षीय मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह: जिल्ह्यात आता पाच कोरोनाबाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 11:38 IST

बुलडाणा : जिल्ह्यात स्वगृही परतणाºया नागरिकांची संख्या लाखाच्या जवळ येऊन ठेपलेली असतानाच कोरोना संसर्गाचा धोका जिल्ह्यात वाढला असून गेल्या ...

बुलडाणा: जिल्ह्यात स्वगृही परतणाºया नागरिकांची संख्या लाखाच्या जवळ येऊन ठेपलेली असतानाच कोरोना संसर्गाचा धोका जिल्ह्यात वाढला असून गेल्या १८ तासात जिल्ह्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह  रुग्ण जिल्ह्यात वाढले आहे. गत सहा दिवसाचा आढावा घेतला तर सहा दिवसात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली आहे.१६ मे रोजी सायंकाळी शेगाव पालिकेचा सफाई कामगार आणि खामगाव शहरात जिया कॉलनीमध्ये मुंबईवरून आलेली एक महिला पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर १७ मे रोजी सकाळीच मुंबईतून मलकापूर तालुक्यात नरवेल येथे परतलेल्या कुटुंबातील एक सात वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बुलडाणेकरांची पहाटच मुळी नव्या धक्क्याने झाली. मुंबईत मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबातील सहा जण मलकापूर तालुक्यातील नरवेल येथे गेल्या काही दिवसापूर्वी परतले होते. त्या कुटुंबातील ही मुलगी आहे.दुसरीकडे जळगाव जामोद येथील मृत्य पावलेल्या ७२ वर्षीय व्यक्तीच्या स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असून त्याचा नेमका अहवाल काय येतो याकडे सध्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे बुलडाण्यातील एका व्यक्तीचा २८ मार्च रोजी मृत्यू झालेला असून पाच संदिग्ध रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. पैकी चार जणांचे अहवाल हे निगेटीव्ह आलेले आहेत. आता फक्त जळगाव जामोद येथील मृत व्यक्तीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता २९ वर पोहोचली आहे. पैकी पाच रुग्णांवर सध्या बुलडाणा, खामगाव आणि शेगाव येथील आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहेत.सध्या कोरोना बाधीतांमध्ये बुलडाणा येथे मलकापूर पांग्रा येथील किडणीच्या आजाराने ग्रस्त असलेली आठ वर्षीय मुलगी, खामगाव येथे जळगाव जामोद येथील फळविक्रेता, खामगावातीलच जिया कॉलनीमध्ये मुंबईतून आलेली ६० वर्षीय महिला, नरवेल येथील सात वर्षाची मुलगी आणि शेगाव येथील आयसोलेशन कक्षामध्ये शेगाव पालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेला ३५ वर्षीय कर्मचारी असे पाच जण उपचार घेत आहेत.

नागरिकांना धास्तीसहा दिवसात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे व जिल्हयात सातत्याने पश्चिम महाराष्ट्र तथा मुंबईतून नागरिक स्वगृही परत आहे. त्यांची वाढती संख्या पाहता आता शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी धास्ती घेतली असून कोरोना संसर्गाचा धोक्याची जिल्ह्यात सध्या व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून स्व जिल्ह्यात येणाºया नागरिकांची संबंधीत जिल्ह्यात कितपत बारकाईने तपासणी होते, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जिल्हा प्रशासनानेही याबाबत संदिग्ध भूमिका न घेता जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रीत करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा औरंगाबाद, अकोला, जळगाव जिल्ह्याच्याच दिशेने बुलडाण्याची वाटचाल अटळ आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याMalkapurमलकापूर