शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

कोरोनाचा फटका : आवास योजनेंतर्गतची १० टक्केच घरे पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST

गुरुवारी झालेल्या जिल्हा विकास समन्वयन आणि सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीदरम्यान ही बाब स्पष्ट झाली आहे. गेल्या वर्षी लावण्यात आलेले ...

गुरुवारी झालेल्या जिल्हा विकास समन्वयन आणि सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीदरम्यान ही बाब स्पष्ट झाली आहे. गेल्या वर्षी लावण्यात आलेले लॉकडाऊन आणि त्यामुळे कामांसाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले होते. सोबतच बाजारपेठच ठप्प असल्याने त्याचा आपसूकच घरकूल योजनांच्या कामांवर विपरीत परिणाम झाला असल्याचे दिशा समितीच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (ग्रामीण) २०२०-२१ या वर्षात ७ हजार ६१९ घरकुलांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ७२ टक्के घरांच्या कामांना मान्यताही दिल्या गेली होती. मात्र, वार्षिक वर्षाअखेर केवळ ५४६ घरकुलांचे काम पूर्णत्वास गेले. एकूण उद्दिष्टाच्या ते अवघे १० टक्के आहे. त्यामुळे आता चालू आर्थिक वर्षात या योजनेवर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत गांभीर्याने काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच गेल्या वर्षी वित्त विभागाच्या ४ मे २०२० रोजीच्या निर्णयाचाही या कामांना फटका बसला.

--चिखलीमध्ये एकच घरकूल--

चिखली तालुक्यातील १८८ घरकुलांचे काम करण्याचे नियोजन होते. त्यापैकी १४४ घरांना मान्यता मिळाली होती. मात्र, प्रत्यक्षात गेल्या आर्थिक वर्षात तालुक्यात अवघ्या एका घराचे काम पूर्णत्वास गेले आहे. अशी स्थिती शेगाव तालुक्यात असून तेथे अवघी पाच घरे, लोणारमध्ये दोन घरे पूर्णत्वास गेलेली आहेत.

--जॉबकार्ड मॅपिंगला प्राधान्य--

नव्याने जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जवळपास २ लाख ५० हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. संबंधितांनी त्यांचे आधर कार्डचे लिंकिंग आणि जॉबकार्ड मॅपिंग हे संबंधित ग्रामपंचायस्तरावर किंवा पंचायत समिती स्तरावर करणे गरजेचे आहे. ते झाल्याशिवाय या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या यादीत संबंधितांचे नाव येणार असल्याचे जिल्हा परिषदेमधील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनेही एका बैठकीमध्ये अनुषंगिक निर्देश दिलेले आहेत.

-- पाच वर्षात १५,७३९ घरे--

या योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षांत १५ हजार ७३९ घरे पूर्णत्वास गेली आहे. बेसलाइन सर्वेक्षणाच्या आधारावर २७ हजार १२३ घरकुले उभारण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ८८ टक्के अर्थात २३ हजार ८०२ घरकुलांच्या कामांना मान्यता देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ६६.१२ टक्केच घरकुलांचे काम पाच वर्षांत पूर्ण झालेले आहे.