शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
4
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
5
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
6
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
7
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
8
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
9
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
10
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
11
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
12
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
13
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
14
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
15
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
16
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
17
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
18
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
19
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
20
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी

अनलॉकनंतर बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 11:00 IST

केवळ २४ दिवसांमध्ये १०० रूग्णांची वाढ झाली आहे.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असले तरी लॉकडाऊन काळात काही प्रमाणात आटोक्यात असलेल्या कोरोनाने लॉकडाऊन उघडताच डोके वर काढले आहे. ३० मार्च ते ३० मेपर्यंत तीन महिन्यात जिल्ह्यात ६९ रूग्ण होते. तर केवळ २४ दिवसांमध्ये १०० रूग्णांची वाढ झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यात २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली. तेव्हापासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद होते. तसेच नागरिकांमध्येही प्रचंड भीती होती. पोलिसांकडूनही चांगलाच ‘प्रसाद’ मिळत होता. त्यामुळे बाहेर गर्दी होत नव्हती. जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण नियंत्रणात होते. पहिल्या लॉकडाऊननंतर दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस जिल्ह्यात प्रशासन थोडे सैल झाले. मार्च महिन्यापासून तर ३० मेपर्यंत जिल्ह्यात ६९ रूग्ण होते. त्यानंतर लॉकडाऊन उघडण्यात आला. लॉकडाऊन उघडल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.केवळ २४ दिवसांमध्ये १०० रूग्ण वाढले असून, सध्या जिल्ह्यात १६९ रूग्ण आहेत. लॉकडाऊननंतर जिल्ह्यात घाटाखाली मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मलकापूर तालुक्यात ६३ रूग्ण आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मलकापूरात २७ मे पासून तर ३० मेपर्यंत १२ रूग्ण आढळले. त्यानंतर जून महिन्यामध्ये ५० रूग्ण आढळले. तसेच पातूर्डा गावात १७ रूग्ण आढळले आहेत.पातुर्ड्यामध्ये पहिला रूग्ण ९ जून रोजी आढळला होता. लॉकडाऊन काळात या गावात एकही रूग्ण नव्हता.जिल्ह्यात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होण्याकरिता बाहेर राज्यातून तसेच बाहेर जिल्ह्यात आलेल्या स्थलांतरीत मजूर व नागरिकही कारणीभूत ठरले आहेत. जिल्ह्यात तब्बल १ लाख ३ हजार नागरिक बाहेरून आले.घाटावरील पाच तालुके कोरोनामुक्त तर घाटाखालील एकही नाहीजिल्ह्यातील सिंदखेड राजा, बुलडाणा, मोताळा, चिखली व देऊळगाव राजा हे पाच तालुके कोरोना मुक्त आहे. तर घाटाखालील एकही तालुका सध्या कोरोनामुक्त नाही. घाटाखालील खामगावमध्ये १, मलकापूरमध्ये ६३, जळगाव जामोदमध्ये २, नांदुरा २, शेगाव २ तर संग्रामपूर येथे सध्या तीन अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना संसगार्मुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण घाटाखालील आहेत.

अनलॉक झाल्यानंतर रूग्ण वाढले आहेत. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. फिजीकल डिस्टन्सींगचे काटेकोर पालन व्हायलाच हवे. तसेच मास्क वापरणे आवश्यक आहे. हात वारंवार धुतल्यास कोरोनाचा धोका कमी आहे.- डॉ. नीलेश टापरेनिवासी वैद्यकीय अधिकारी, खामगाव

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव