शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

अनलॉकनंतर बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 11:00 IST

केवळ २४ दिवसांमध्ये १०० रूग्णांची वाढ झाली आहे.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असले तरी लॉकडाऊन काळात काही प्रमाणात आटोक्यात असलेल्या कोरोनाने लॉकडाऊन उघडताच डोके वर काढले आहे. ३० मार्च ते ३० मेपर्यंत तीन महिन्यात जिल्ह्यात ६९ रूग्ण होते. तर केवळ २४ दिवसांमध्ये १०० रूग्णांची वाढ झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यात २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली. तेव्हापासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद होते. तसेच नागरिकांमध्येही प्रचंड भीती होती. पोलिसांकडूनही चांगलाच ‘प्रसाद’ मिळत होता. त्यामुळे बाहेर गर्दी होत नव्हती. जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण नियंत्रणात होते. पहिल्या लॉकडाऊननंतर दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस जिल्ह्यात प्रशासन थोडे सैल झाले. मार्च महिन्यापासून तर ३० मेपर्यंत जिल्ह्यात ६९ रूग्ण होते. त्यानंतर लॉकडाऊन उघडण्यात आला. लॉकडाऊन उघडल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.केवळ २४ दिवसांमध्ये १०० रूग्ण वाढले असून, सध्या जिल्ह्यात १६९ रूग्ण आहेत. लॉकडाऊननंतर जिल्ह्यात घाटाखाली मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मलकापूर तालुक्यात ६३ रूग्ण आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मलकापूरात २७ मे पासून तर ३० मेपर्यंत १२ रूग्ण आढळले. त्यानंतर जून महिन्यामध्ये ५० रूग्ण आढळले. तसेच पातूर्डा गावात १७ रूग्ण आढळले आहेत.पातुर्ड्यामध्ये पहिला रूग्ण ९ जून रोजी आढळला होता. लॉकडाऊन काळात या गावात एकही रूग्ण नव्हता.जिल्ह्यात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होण्याकरिता बाहेर राज्यातून तसेच बाहेर जिल्ह्यात आलेल्या स्थलांतरीत मजूर व नागरिकही कारणीभूत ठरले आहेत. जिल्ह्यात तब्बल १ लाख ३ हजार नागरिक बाहेरून आले.घाटावरील पाच तालुके कोरोनामुक्त तर घाटाखालील एकही नाहीजिल्ह्यातील सिंदखेड राजा, बुलडाणा, मोताळा, चिखली व देऊळगाव राजा हे पाच तालुके कोरोना मुक्त आहे. तर घाटाखालील एकही तालुका सध्या कोरोनामुक्त नाही. घाटाखालील खामगावमध्ये १, मलकापूरमध्ये ६३, जळगाव जामोदमध्ये २, नांदुरा २, शेगाव २ तर संग्रामपूर येथे सध्या तीन अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना संसगार्मुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण घाटाखालील आहेत.

अनलॉक झाल्यानंतर रूग्ण वाढले आहेत. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. फिजीकल डिस्टन्सींगचे काटेकोर पालन व्हायलाच हवे. तसेच मास्क वापरणे आवश्यक आहे. हात वारंवार धुतल्यास कोरोनाचा धोका कमी आहे.- डॉ. नीलेश टापरेनिवासी वैद्यकीय अधिकारी, खामगाव

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव