शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

महावितरणमधील सरळसेवा भरतीमुळे कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 12:31 IST

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने भरतीप्रक्रियेस विरोध करीत न्यायालयाची दारे ठोठावण्याची भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देमहावितरण कंपनीने विद्युत सहाय्यक पदांसाठी ५ हजार आणि उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता २ हजार जागा जागांची भरती काढली आहेया भरतीत वयात सूट मिळावी, ३० टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची २०१२ पासून मागणी आहे.महावितरण कंपनीत जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांवर जवळपास २५० कंत्राटी कामगार काम करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महावितरण कंपनीमधील रिक्त पदांसाठी होऊ घातलेल्या सरळसेवा भरतीमुळे गेल्या १० ते १५ वर्षांपासून काम करणारे कंत्राटी कामगार दुखावले आहेत. भरतीमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याची भावना त्यांच्यामधून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने भरतीप्रक्रियेस विरोध करीत न्यायालयाची दारे ठोठावण्याची भूमिका घेतली आहे.महावितरण कंपनीने विद्युत सहाय्यक पदांसाठी ५ हजार आणि उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता २ हजार जागा जागांची भरती काढली आहे. या रिक्त पदांवर राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांची नेमणूक ऊर्जा खात्याने केली होती. गेली १० ते १५ वर्षे अत्यंत कमी वेतनात हे कामगार काम करीत आहेत. कमी मोबदल्यात काम करुन कंत्राटी कामगारांनी वीज कंपन्यांचे अब्जावधी रुपये वाचवले आहेत. कंत्राटी कामगारांच्या अनुभवाचा विचार न करता महावितरण कंपनीने शासनाने निर्धारित केलेल्या वयाच्या विरोधात जाऊन अर्ज करण्यासाठी ३२ वर्षापर्यंतच पात्रता ठेवली आहे. रिक्त पदांवर गेल्या १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे अनेकजण वयाच्या अटीत अपात्र ठरले आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगारांना या पदांवर आधी सामावून घ्यावे, त्यांना या भरतीत वयात सूट मिळावी, विशेष बाब म्हणून ३० टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची २०१२ पासून मागणी आहे. मात्र शासनाने याकडे लक्ष दिले नाही.जिल्ह्यात २५० कंत्राटी कामगारमहावितरण कंपनीत जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांवर जवळपास २५० कंत्राटी कामगार काम करीत आहे. जीव धोक्यात घालून १० ते १५ वर्षांपासून ते सेवा देत आहेत. अत्यंत कमी वेतनावर काम करुन कुटूंबाचा गाडा चालवित आहेत. महावितरण कंपनीच्या सरळसेवा भरतीमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्यास त्यांचे कुटूंब रस्त्यावर येईल. कंत्राटी कामगारांना भरतीत सवलतीसह प्राधान्य देण्याची गरज आहे.महावितरणची सरळसेवा भरती कंपनीच्या मुख्य कार्यालयातून राबविली जाणार आहे. रिक्त पदांची भरती, आरक्षण, निवड प्रक्रिया सर्व काम तेथूनच होणार आहे.- दीपक देवहातेअधीक्षक अभियंता, महावितरण, बुलडाणामहाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने १० जुलै ऊर्जामंत्र्यांना पत्र देऊन भरतीप्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे. त्यावर महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना तातडीने संघटनेसोबत बैठक आयोजित करण्यास सांगितले आहे. या बैठकीतून न्याय मिळाला नाही तर संघटना रस्त्यावर उतरणार आहे.- नीलेश खरातप्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण