शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काॅंगेसचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 19:23 IST

Congress's demand for repeal of agricultural laws : तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साेमवारी धरणे आंदाेलन करण्यात आले़.

 बुलडाणा : राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी व बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या   तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साेमवारी धरणे आंदाेलन करण्यात आले़. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्टपतींना देण्यात आले़निवेदना म्हटले आहे की, केंद्र सरकार द्वारे शेतकरी कायदे २०२० अंमलात आले असून त्या कायद्यांविरोधात दिल्ली येथे शेतकरी मागील सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने लादलेल्या  कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तिव्र संताप असून या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे.  केंद्र सरकारचे हे शेतकरी कायदे अन्यायकारक असून या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील २०० दिवसांपेक्षा जास्त दिवस ठाण मांडून बसले आहे. या आंदोलन काळात आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहे. मोदी सरकारने सुरवातीला चर्चेचा देखावा केला, पण कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य केली नाही. शेतकरी कृषी कायदे पारित करतांना संसदेमधे कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. केंद्र शासनाचे हे शेतकरी अन्यायकारक कायदे रद्द करावेत व शेतकरी बांधवांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे निवेदनात म्हटले आहे़. निवेदनावर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, किसान काँग्रेसचे अध्यक्ष बालगजानन उर्फ राजू पाटील, माजी  आ. हर्षवर्धन सपकाळ, विजय अंभोरे, मनिषा पवार, ज्योती पडघान, स्वाती वाकेकर, काँग्रेस नेते रामविजय बुरंगले , लक्ष्मणराव घुमरे, अॅड जयश्री शेळके, सतिश महेंद्रे, दत्ता काकस, सुनिल सपकाळ , समाधान सुपेकर, गणेश पाटील, कलीम खान, अमेय देशमुख, अविनाश उमरकर, अर्जुन घोलप, डाॅ भुसारी, निलेश अंजनकर, डाॅ इसरार जमादार, वसीम कुरेशी, दिपक सलामपुरीया, नाना देशमुख, दिलीप जाधव, देवानंद पवार आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे़.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcongressकाँग्रेसagitationआंदोलन