शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आक्रमक; संग्रामपूर येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 12:13 IST

संग्रामपूर:- शासनाच्या उदासीन धोरणा विरोधात संग्रामपूर तालुक्यातील काँग्रेस आक्रमक झाली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी नऊ वाजता पासून संग्रामपूर येथे तालुका काँग्रेस कमिटी कडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर:- शासनाच्या उदासीन धोरणा विरोधात संग्रामपूर तालुक्यातील काँग्रेस आक्रमक झाली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी नऊ वाजता पासून संग्रामपूर येथे तालुका काँग्रेस कमिटी कडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविला. तामगाव पोलिसांनी रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून देण्यात आले. संग्रामपूर तालुक्यात गंभीर स्वरूपाचे दुष्काळ असल्याने बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई तसेच शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. यावर राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात न आल्याने येथील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. जमिनीतील पाण्याचे स्त्रोत आटल्याने येथील बागायत क्षेत्र तथा फळबाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने असंख्य शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. शासनाकडून करण्यात आलेल्या घोषणा हवेत विरल्याने येथील शेतकरी देशोधडीला टेकला. शेतकऱ्यांनी पीक विमा काढून सुद्धा त्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. शेतकर्‍यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध होत नाही. रासायनिक खते बियाणे यांचे भाव वधारल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढला. अशा विविध मागण्यांचे निवेदन १५ मे रोजी संग्रामपुर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार संग्रामपूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले होते. दुष्काळावर उपाययोजना करा तसेच तालुक्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी शासकीय योजना राबवून तालुक्याला दुष्काळ मुक्त करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. आजतागायत राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना मदत केली नाही. १४० गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत कोट्यवधीचा खर्च करण्यात आला परंतु बहुतांश गावांमध्ये येथील पाणी पोहोचलेच नाही. जल युक्त शिवार योजना नावापुरती उरली असून प्रत्यक्षात याचा फायदा झाला नाही. दुष्काळग्रस्त भागात उपाय योजना राबवून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती परंतु शासनाने याची दखल न घेतल्याने सोमवारी तालुका काँग्रेस कमिटी आक्रमक होत रस्त्यावर उतरली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धा तास रस्ता रोखून धरला त्यावेळी तामगाव पोलिसांनी आंदोलन करत असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांना अटक करून सोडून देण्यात आले. या आंदोलनात संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र वानखडे, मनोहरराव बोराखडे, संजय ढगे, संतोष राजनकर, सै आसिफ, हरिभाऊ राजनकार, सुरेश हागे, प्रकाश देशमुख, तेजराव मारोडे, प्रशांत गिरी, एकनाथ इलामे, अरुण निंबाेळकार , रमेश इलामे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरcongressकाँग्रेस