शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

दहावी, बारावीच्या पुनर्परीक्षाविषयी संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 12:07 IST

अमरावती विभागातील दहावीच्या ८ हजार १४२ तर तर बारावीच्या ११ हजार २९१ विद्यार्थ्यांना जीव टांगणीला लागला आहे.

- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दहावी, बारावीचे निकाल जाहीर करून महिनाभराचा अवधी झालेला असताना पुर्नपरीक्षाविषयी शासनाने कुठलीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे, अमरावती विभागातील दहावीच्या ८ हजार १४२ तर तर बारावीच्या ११ हजार २९१ विद्यार्थ्यांना जीव टांगणीला लागला आहे. दरवर्षी जून मध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर पुर्नपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. यावर्षी मात्र, वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. कोरोनामुळे  यंदा दहावी आणि बारावीच्या निकालाला बराच विलंब झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर पुर्नपरीक्षांचे वेळापत्रकाची घोषणा होणे अपेक्षीत होते. कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकार कुठलीही परीक्षा घेण्याच्या मनस्थितीत नाही. एमपीएससीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे, दहावी, बारावीच्या परीक्षा होणार किंवा नाही याविषयी विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अमरावती विभागातून इयत्ता बारावीच्या १ लाख ४२ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी एक लाख ३१ हजार ४३४ विद्यार्थी उत्तीर्ण तर ११ हजार २९१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तसेच इयत्ता दहावीच्या एक लाख ६७ हजार ४५५ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ५९ हजार ३१३ उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ८ हजार १४२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलैमध्ये परीक्षा घेण्यात येत होती. यावर्षी कोरोना संसर्गामुळे दहावी, बारावीचे निकालच उशीरा जाहीर करण्यात आले. त्यामुळे, अमरावती विभागातील विद्यार्थ्यांना पुर्नपरीक्षांची घोषण केव्हा होईल,याची प्रतीक्षा लागलेली आहे. राज्य सरकारने परीक्षांविषयी भुमिका स्पष्ट करण्याची मागणी पालकांनी केली आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना याच वर्षी प्रवेश मिळावा, यासाठी पुर्नपरीक्षा होणे आवश्यक आहे. त्यामुळे, शासनाने दहावी आणि बारावीच्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्याची मागणी होत आहे. 

कोरोनाचा फटका महाराष्ट राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचे निकाल दरवर्षी जून महिन्यात जाहीर करण्यात येतात. यावर्षी कोरोना संसर्गाचा फटका या परीक्षांनाही बसला आहे. दहावीचा एक पेपर रद्द करण्यात आला होता. पेपर तपासण्यातही विलंब झाल्याने अखेर निकाल जुलैमध्ये जाहीर करण्यात आले. मात्र, पुर्नपरीक्षा केव्हा होणार याविषयी निर्णयच झाला नाही. पुर्नपरीक्षा घेवून ताततडीने निकाल जाहीर करण्याची मागणी होत आहे. 

३३६० नापास विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रतीक्षा४जिल्ह्यातील ४० हजार २९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ३८ हजार ४६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तसेच १ हजार ५६० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता १२ वी चे जिल्ह्यातील ३१ हजार १६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ हजार ८०० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. 

अकरावी प्रवेशही संकटात यावर्षी पुर्नपरीक्षेविषयी निर्णय झाला नसल्याने साशंकता आहे. परीक्षा उत्तीर्ण करून ११ वीमध्ये प्रवेश मिळणे कठिण असल्याचे चित्र आहे. कारण ११ वी प्रवेशासाठी ३१ आॅगस्ट ही शेवटची मुदत होती. पुर्नपरीक्षेविषयी निर्णय न झाल्याने ११ प्रवेश संकटात सापडले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रssc examदहावी