शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

संगणक परिचालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 17:39 IST

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

बुलडाणा : राज्यातील सर्व संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात सामावून घेण्यासह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासुन संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक म्हणून हजारो संगणक परिचालक डिजीटल महाराष्ट्राचे काम करीत आहेत. ग्रामिण भागातील जनतेला रहिवासी, बांधकाम परवाना, पीटीआर नक्कल यासह २९ प्रकारचे दाखले, ग्रामपंचायत जमा, खर्चाची नोंद घेणे, ग्रामसभा, मासिक सभा, यांचे आॅनलाईन कामकाज, १४ व्या वित्त आयोगाचे गाव विकास आराखडे व इतर कामे संगणक परिचालक करतात. शेतकरी कर्जमाफी, प्रधानमंत्री पीकविमा योजना, अस्मिता योजना, जनगणना, प्रधानमंत्री आवास योजनेचा सर्व्हे आदी कामे गत ८ वर्षापासून करीत आहेत. असे असतांना त्यांना वर्षभर मानधन मिळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही महिन्याच्या निश्चित तारखेला मानधन मिळाले नाही. त्यामुळे परिचालकांनी प्रलंबित मागण्यांसाठी १९ आॅगस्ट पासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरुपी नियुक्ती देण्यात यावी, संगणक परिचालकांचे मानधन १४ व्या वित्त आयोगातून देण्याऐवजी शासनाच्या निधीतून दर महिन्याला किमान वेतन १५ हजार रुपये द्यावे, एप्रिल २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत मानधन देण्यात यावे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे मानधन देण्यात यावे, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामिणचे आॅनलाईन सर्व्हे केलेले मानधन मिळावे, नोटीस न देता कामावरुन कमी केलेल्या संगणक परिचालकांना परत कामावर घेण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी धरणे देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष धनंजय शेळके, योगेश रिंढे, निखील मिसाळ, जयश्री म्हस्के, अर्चना शेळके, उमेश तायडे, राम भुसारी, दिलीप बुलबुले, निवृत्ती तायडे, मंगेश भोंडे, विजय राऊत, अंकुश तायडे, गिरधारी जाधव, पंडीत हिवाळे, रितेश हिवाळे, योगेश नवले, सुनील वाघ यांच्यासह संगणक परिचालक हजर होते.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagitationआंदोलन