शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंची भूमिका योग्य; उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी- शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 19:23 IST

अशा उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

बुलडाणा: महाविकासआघाडी सरकारने केलेल्या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीसंदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा सल्ला देणा-या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांमध्ये जाऊन ते काय म्हणतात हे जाणून घ्यावे. सोबतच अशा उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला आहे.दुस-या टप्प्यातील स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिका-यांची बैठक बुलडाणा येथे आठ फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी उपरोक्त टोला लगावला. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आळंदी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर टीका करत भाष्य केले होते. त्याला सत्तारांनी उत्तर देत राज्यमंत्री कडू यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेत असताना माजी खा. राजू शेट्टी यांनी उपरोक्त विधान केले.यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, राज्यमंत्री बच्चू कडू यांची भूमिका योग्य आहे. घोषित कर्जमाफी योजनेत केवळ १५ ते २० टक्के शेतक-यांचा लाभ होत असून सप्टेंबर २०१९ नंतरचे शेतकरी त्यास पात्र नाहीत. वास्तविक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. चालू हंगामात शेतक-यांनी घेतलेले पीक कर्ज हे जूनमध्ये थकित होईल. आपत्तीमुळे शेतक-यांचे पीकच अस्तित्वात नाही. त्यामुळे या शेतक-यांची कर्जमाफी झाल्यास त्यांना दिलासा मिळले. पीक कर्ज एक वर्षासाठी सहा टक्के सवलतीच्या दरात मिळते. त्यानंतर त्यावर १२ टक्के व्याज लागते. त्यामुळे मुद्दलापेक्षा शेतक-यांचे व्याज अधिक होत असल्याने शेतक-यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांची भूमिका योग्य असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी सातबारा कोरा करण्याचे सांगितले होते. नंतर राज्यावर कर्ज असल्यामुळे दोन टप्प्यात कर्जमाफी करणार असल्याचे सांगितले. मर्यादीत शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ होत आहे त्यामळे शेतकरी कसा कर्जमुक्त होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या योजनेत बदल करून सरकार सरसगट शेतक-यांना कर्जमुक्त करणार आहे, असे जाहीर करावे, असे ते म्हणाले.

आमचे ‘तण नाशक’ ऑपरेशनभाजप राज्यात ऑपरेशन ‘लोटस्’ सुरू करणार असल्याबाबत त्यांना छेडले असता गत वर्षभरापासून आमचे ऑपरेशन ‘तण नाशक’ सुरू आहे. त्याचा परिणाम झालेला आहे मिश्कीलपणे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा हा भाजपासारख्या सांप्रदायिक पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही दिला आहे. याचा अर्थ शेतकरी हिताला बाधा पोहोचल्यानंतरही आम्ही गप्प बसावे असा नसून शेतकरी हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी