शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
5
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
6
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
8
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
9
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
10
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
11
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
12
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
13
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
14
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
15
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
16
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
17
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
18
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
19
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
20
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

बच्चू कडूंची भूमिका योग्य; उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी- शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 19:23 IST

अशा उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

बुलडाणा: महाविकासआघाडी सरकारने केलेल्या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीसंदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा सल्ला देणा-या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांमध्ये जाऊन ते काय म्हणतात हे जाणून घ्यावे. सोबतच अशा उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला आहे.दुस-या टप्प्यातील स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिका-यांची बैठक बुलडाणा येथे आठ फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी उपरोक्त टोला लगावला. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आळंदी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर टीका करत भाष्य केले होते. त्याला सत्तारांनी उत्तर देत राज्यमंत्री कडू यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेत असताना माजी खा. राजू शेट्टी यांनी उपरोक्त विधान केले.यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, राज्यमंत्री बच्चू कडू यांची भूमिका योग्य आहे. घोषित कर्जमाफी योजनेत केवळ १५ ते २० टक्के शेतक-यांचा लाभ होत असून सप्टेंबर २०१९ नंतरचे शेतकरी त्यास पात्र नाहीत. वास्तविक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. चालू हंगामात शेतक-यांनी घेतलेले पीक कर्ज हे जूनमध्ये थकित होईल. आपत्तीमुळे शेतक-यांचे पीकच अस्तित्वात नाही. त्यामुळे या शेतक-यांची कर्जमाफी झाल्यास त्यांना दिलासा मिळले. पीक कर्ज एक वर्षासाठी सहा टक्के सवलतीच्या दरात मिळते. त्यानंतर त्यावर १२ टक्के व्याज लागते. त्यामुळे मुद्दलापेक्षा शेतक-यांचे व्याज अधिक होत असल्याने शेतक-यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांची भूमिका योग्य असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी सातबारा कोरा करण्याचे सांगितले होते. नंतर राज्यावर कर्ज असल्यामुळे दोन टप्प्यात कर्जमाफी करणार असल्याचे सांगितले. मर्यादीत शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ होत आहे त्यामळे शेतकरी कसा कर्जमुक्त होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या योजनेत बदल करून सरकार सरसगट शेतक-यांना कर्जमुक्त करणार आहे, असे जाहीर करावे, असे ते म्हणाले.

आमचे ‘तण नाशक’ ऑपरेशनभाजप राज्यात ऑपरेशन ‘लोटस्’ सुरू करणार असल्याबाबत त्यांना छेडले असता गत वर्षभरापासून आमचे ऑपरेशन ‘तण नाशक’ सुरू आहे. त्याचा परिणाम झालेला आहे मिश्कीलपणे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा हा भाजपासारख्या सांप्रदायिक पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही दिला आहे. याचा अर्थ शेतकरी हिताला बाधा पोहोचल्यानंतरही आम्ही गप्प बसावे असा नसून शेतकरी हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी