शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

बोगस सोयाबीन बियाण्यांची प्रकरणे न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 11:07 IST

बियाणे कंपन्यांना न्यायालयात खेचून शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : चालू खरिप हंगामात सोयाबिन बियाण्यांची पेरणी केल्यानंतर त्याची उगवणच झाली नसल्याच्या हजारो तक्रारी कृषी विभागाकडे झाल्यानंतर बियाणे उत्पादक कंपन्यांकडून त्याची भरपाईचा आदेश देण्यात आला. त्यानंतर शेती उगवण परिस्थितीचा पंचनामा केलेल्या समितीमधील कृषी विभागाचे निरिक्षकाने याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा आदेशही विभगीय कृषी सहसंचालकांनी पाचही जिल्ह्यातील अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे आता बियाणे कंपन्यांना न्यायालयात खेचून शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सोयाबिन उत्पादक पट्ट्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी झाल्या. वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलडाणा, अकोला जिल्ह्यातील शेतकºयांचा यात समावेश आहे. ब्महाबीजचे बियाणे न उगवलेल्या शेतकºयांना तातडीने बियाणे देण्याचा आदेश कृषी विभागाने राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना २३ जून रोजी दिला. त्यापैकी काहींना बियाणे देण्यात आले. तक्रारी मोठ्या प्रमाणात असल्याने नियुक्त केलेल्या समितीकडून पंचनामेही करण्यात आले. शेकडो शेतातील बियाणे सदोष असल्याचे तसेच बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे अहवालही देण्यात आले. सुरूवातीला त्या सदोष बियाण्यांबाबत शेतकºयांनी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला कृषी विभागाने दिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. बोगस बियाणे देणाºया कंपन्यांवरही कारवाईची मागणी झाली. त्यामुळे कृषी विभागाने आता निरिक्षकांना बोगस बियाणे प्रकरणात पंचनाम्यासह न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे, शेतकरी वैयक्तिकपणेही दाद मागू शकतो. तर कृषी विभागाचे निरिक्षकही उत्पादक कंपनीविरूद्ध दावा दाखल करणार आहेत. ही प्रक्रीया तातडीने करण्याचा आदेश विभागीय सहसंचालकांनी दिला आहे.

आता तक्रारी घेणे बंदपेरणीला एक महिना आटोपल्याने आता बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी स्वीकारता येणार नाहीत, याकडेही जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकाºयांचे आता लक्ष वेधल्या गेले आहे.

प्रत्येक निरिक्षक दाखल करणार प्रकरणसहसंचालकांच्या आदेशानुसार तालुकास्तरीय समितीमधील प्रत्येक निरिक्षक पंचनाम्यानुसार न्यायालयात प्रकरण दाखल करणार आहे. त्यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावFarmerशेतकरीCourtन्यायालयAgriculture Sectorशेती क्षेत्र