शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बोगस सोयाबीन बियाण्यांची प्रकरणे न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 11:07 IST

बियाणे कंपन्यांना न्यायालयात खेचून शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : चालू खरिप हंगामात सोयाबिन बियाण्यांची पेरणी केल्यानंतर त्याची उगवणच झाली नसल्याच्या हजारो तक्रारी कृषी विभागाकडे झाल्यानंतर बियाणे उत्पादक कंपन्यांकडून त्याची भरपाईचा आदेश देण्यात आला. त्यानंतर शेती उगवण परिस्थितीचा पंचनामा केलेल्या समितीमधील कृषी विभागाचे निरिक्षकाने याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा आदेशही विभगीय कृषी सहसंचालकांनी पाचही जिल्ह्यातील अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे आता बियाणे कंपन्यांना न्यायालयात खेचून शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सोयाबिन उत्पादक पट्ट्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी झाल्या. वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलडाणा, अकोला जिल्ह्यातील शेतकºयांचा यात समावेश आहे. ब्महाबीजचे बियाणे न उगवलेल्या शेतकºयांना तातडीने बियाणे देण्याचा आदेश कृषी विभागाने राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना २३ जून रोजी दिला. त्यापैकी काहींना बियाणे देण्यात आले. तक्रारी मोठ्या प्रमाणात असल्याने नियुक्त केलेल्या समितीकडून पंचनामेही करण्यात आले. शेकडो शेतातील बियाणे सदोष असल्याचे तसेच बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे अहवालही देण्यात आले. सुरूवातीला त्या सदोष बियाण्यांबाबत शेतकºयांनी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला कृषी विभागाने दिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. बोगस बियाणे देणाºया कंपन्यांवरही कारवाईची मागणी झाली. त्यामुळे कृषी विभागाने आता निरिक्षकांना बोगस बियाणे प्रकरणात पंचनाम्यासह न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे, शेतकरी वैयक्तिकपणेही दाद मागू शकतो. तर कृषी विभागाचे निरिक्षकही उत्पादक कंपनीविरूद्ध दावा दाखल करणार आहेत. ही प्रक्रीया तातडीने करण्याचा आदेश विभागीय सहसंचालकांनी दिला आहे.

आता तक्रारी घेणे बंदपेरणीला एक महिना आटोपल्याने आता बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी स्वीकारता येणार नाहीत, याकडेही जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकाºयांचे आता लक्ष वेधल्या गेले आहे.

प्रत्येक निरिक्षक दाखल करणार प्रकरणसहसंचालकांच्या आदेशानुसार तालुकास्तरीय समितीमधील प्रत्येक निरिक्षक पंचनाम्यानुसार न्यायालयात प्रकरण दाखल करणार आहे. त्यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावFarmerशेतकरीCourtन्यायालयAgriculture Sectorशेती क्षेत्र