शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भरधाव कारने दुचाकीला उडविले; पिता-पूत्र जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 17:34 IST

अंबादास सुभाष रिंढे (४१) हे पत्नी दीपाली (३५) व मुलगा कार्तिक (५) असे तिघेजण सोमवारी रात्री सासरवाडी बोरगाव काकडे येथे गेले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर/शेलसूर : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाली. चिखली- अमडापूर मार्गावरील दहीगाव फाट्याजवळ १२ मे रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. कारचालक घटनास्थळावरुन फरार झाला असून त्याच्याविरुद्ध अमडापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेलसूर येथील अंबादास सुभाष रिंढे (४१) हे पत्नी दीपाली (३५) व मुलगा कार्तिक (५) असे तिघेजण सोमवारी रात्री सासरवाडी बोरगाव काकडे येथे गेले होते. सासरवाडीत मुक्काम करुन सकाळी एम-एच-२८-एम-६३०० क्रमांकाच्या दुचाकीने उंद्री येथे जात होते. दरम्यान दहिगाव फाट्याजवळ एम-एच-२८-ए-झेड-३९२६ क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये अंबादास रिंढे व मुलगा कार्तिक ठार झाले. तर पत्नी दीपाली गंभीर जखमी झाली.अपघाताची माहिती मिळताच अमडापूर ठाणेदार अमित वानखडे यांच्या मार्गदर्शनात एएसआय लक्ष्मण टेकाळे, वैद्य घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमीवर चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुचाकीला धडक देणाऱ्या कारचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला असून त्याच्याविरुद्ध अमडापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतक सहकार विद्या मंदिरवर होते लिपीकअपघातातील मृतक अंबादास रिंढे हे मूळचे शेलसूर येथील रहिवासी आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते उंद्री येथील सहकार विद्या मंदिरवरमध्ये लिपीक म्हणून कार्यरत होते. तसेच उंद्री येथे त्यांचे टायपिंग इन्स्टिट्यूट होते. पत्नी, मुलगी व मुलासह ते उंद्री येथे राहत होते. मंगळवारी झालेल्या अपघातात ते व त्यांच्या मुलावर काळाने झडप घातली. मृतांवर शेलसूर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अपघाती निधनाने रिंढे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात