शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

धान्य वाहतूक कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करा -  जिल्हाधिकाऱ्यांचा शासनाकडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 18:14 IST

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील रेशन धान्य वाहतूक घोटाळा आणि अनियमितेप्रकरणी कंत्राटदाराचा वाहतूक कंत्राट रद्द करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

- अनिल गवई

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील रेशन धान्य वाहतूक घोटाळा आणि अनियमितेप्रकरणी कंत्राटदाराचा वाहतूक कंत्राट रद्द करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी  ३५१ पुराव्याचा(सहपत्र) समावेश असलेला १० पानी प्रस्ताव शासनाकडे तात्काळ मंजुरीसाठी पाठविला आहे. या धक्कादायक प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांनी ११ डिसेंबर रोजी २०१८ रोजी स्वाक्षरी केल्याचे समजते.

राज्यातील गोरगरीब जनतेला त्यांच्या हक्काचे धान्य हमी स्वरुपात मिळावे. या धान्याची अफरातफर होऊ नये, यासाठी शासनाने पूर्वीची पध्दत बंद करून  सुधारीत धान्य वाहतुक व्यवस्था

अंमलात आणली. तथापि, खोटी माहीती व बनावट कागद पत्रांच्या आधारे अव्यवहारीक दरामध्ये बुलडाणा जिल्ह्यात धान्य वाहतुकीसाठी अमरावती येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीने कंत्राट मिळविला. मात्र, या कंपनीकडून सुरूवातीपासूनच शासनाच्या सुधारीत धान्य व्यवस्थेच्या सर्व महत्वाच्या अटी व शर्तीचा भंग करीत धान्याची मोठ्याप्रमाणात अनियमिता व अफरातफर करण्यात आली. या संदर्भात ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला. वाहतूक कंत्राटदाराच्या सर्व गैर व्यवहार पुराव्यानिशी उघडकीस आणले. 

वाहतूक कंत्राटदार श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीने केलेल्या शासकीय धान्याच्या अफरातफरीचे शेगाव, शेळूद, खामगाव(शहर), खामगाव(शिवाजी नगर) साखळी प्रकरणे नमूद करून वाहतूक कंत्राटदार श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीने शासकीय धान्य वाहतुकीसाठी मान्यता प्राप्त वाहनातून सदरचे धान्य निर्धारीत ठिकाणी वितरण करण्याऐवजी काळ्याबाजारात विक्रीसाठी नेले. तसेच ६ किलोमीटर अंतराच्या वाहतुकीमध्ये धान्य कमी भरणे, हेतूपुरस्परपणे भरलेल्या गाड्या उभ्या करून दुसºया दिवशी गोदामावर पाठविणे, आदी गोष्टीद्वारे अनियमितता करीत जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या तरतुदींचे तसेच शासन निर्णय २६-११-२०१२ व करारनाम्यातील अट क्रमांक१४(7) व २१ नुसार दोषी आढळून आल्याने कंत्राटदाराविरोधात गुन्हे दाखल करण्याची आणि साखळी बु. प्रकरणात वाहतूक कंत्राटदार श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनी अफरातफरीस जबाबदार आढळून आली. त्यामुळे याप्रकरणी उपायुक्त औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन स्तरावर चौकशी सुरू असल्याचेही याप्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले.

त्याच प्रमाणे नागपूर,गोंदीया, आमगाव येथुन आणण्यात आलेला तांदूळ अनेक जिल्ह्यात पोहोचलाच नाही. तो परस्पर विकण्यात येवून कागदोपत्री रेकॉर्ड तयार करण्यात आले. यासंदर्भात खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेल्या तक्रारींवर दीड वर्षांपासून चौकशी सुरू आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डांगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा