शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बुलडाणा बनतोय ‘टँकर वाडा’; २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 15:25 IST

बुलडाणा: गेल्या पाच वर्षातील तिसरा तीव्र दुष्काळ अनुभवणार्या बुलडाणा जिल्ह्याची टँकरवाड्याकडे वाटचाल होत असून मे महिन्याच्या मध्यावरच २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे वास्तव आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या पाच वर्षातील तिसरा तीव्र दुष्काळ अनुभवणार्या बुलडाणा जिल्ह्याची टँकरवाड्याकडे वाटचाल होत असून मे महिन्याच्या मध्यावरच २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे वास्तव आहे. दरम्यान, भूजल पातळी दोन मिटरने खालावली असतानाच प्रकल्पांमधील जलसाठ्यातही अवघा चार टक्के पाणीसाठा शिल्लक राहला आहे. परिणामस्वरुप ‘पाणी हरपल; रान करपल’ अशी काहीसी स्थिती जिल्ह्याची झाली आहे.शनिवारी आॅडीओ ब्रीजच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील निवडक सरपंच आणि ग्रामसेवकांसह अधिकारी वर्गाशी टंचाईच्या मुद्द्यावर संवाद साधणार असल्याच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाईची माहिती घेतली असता ही बाब प्रकर्षाने समोर आली. अवघ्या ११ दिवसात टँकरची संख्या तब्बल ४५ ने वाढून २२१ वर पोहोचली आहे तर १७१ वरून तहाणेने व्याकूळ झालेल्या गावांची संघ्या २११ पोहोचली आहे. त्यावरून मे अखेर जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषणता कुठले स्वरुप धारण करेल याची कल्पना यावी.वर्तमान स्थितीतच जिल्ह्यातील १२७२ आबाद गावांपैकी १७ टक्के अर्थात २११ गावांची तहान ही टँकरवर भागविल्या जात असून ५७४ गावांची भिस्त ही विहीर अधिग्रहणावर आहे. जिल्ह्यातील तब्बल ४५ टक्के गावांमध्ये विहीर अधिग्रहीत कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे मे महिन्या अखेर जिल्ह्यातील तब्बल ७२ टक्के गावांची तहाण ही अधिग्रहीत विहीरीवर अवलंबून राहणार आहे. येत्या काळात ९१६ गावांमध्ये विहीर अधिग्रहण करून त्याद्वारे गावांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन यंत्रणेने केले असून टंचाई कृती आराखड्यात अनुषंगीक बाबी प्रस्तावीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या दीड दशकातील जिल्ह्यात पडलेला हा दुष्काळ तीव्र स्वरुपाचा असल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान, जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी एक हजार १२३ गावात दोन हजार ६१७ उपाययोजा प्रस्तावीत असून त्यापैकी प्रत्यक्षात ६८५ गावात एक हजार १०२ उपाययोजना पूर्णत्वास गेल्या आहेत. यावर १९ कोटी ७४ लाख २४ हजार रुपयांचा आतापर्यंत खर्च झालेला आहे.दुसरीकडे जिल्ह्याची भूजल पातळी ही जवळपास दोन मीटरने खालावली आहे. जिल्ह्याचा भूजल दुष्काळ निर्देशांकही उणे ११ च्या आसपास पोहोचला आहे. वरकरणी तो तुलनेने कमी असला तरी दहा वर्षाच्या सरासरीच्या आधारावर तो काढण्यात येत असतो. त्यामुळे मध्यंतरी अपघाव पद्धतीने पडलेल्या पावसामुळे हा निर्देशांक कमी दिसतो आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील टंचाईची स्थिती गंभीर बनत आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये प्रत्यक्षात दुष्काळ जाहीर झालेला आहे.५५ प्रकल्प कोरडेजिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांची संख्या एकूण ९१ आहे. या पैकी ५५ लघु प्रकल्प आजच कोरडे पडलेले आहे तर मोठे व मध्यम प्रकल्पापैकी चार प्रकल्प मृत जलसाठ्यात गेले आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये आजघडीला प्रत्यक्षात अवघा ४.४७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे हा जलसाठाही किती दिवस पुरेल हा प्रश्नच आहे. परिणामी यंदा मान्सून वेळेत न आल्यास जून अखेरच टंचाईची दाहकता जिल्ह्यात भीषण स्वरुप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई