शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

बुलडाणा बनतोय ‘टँकर वाडा’; २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 15:25 IST

बुलडाणा: गेल्या पाच वर्षातील तिसरा तीव्र दुष्काळ अनुभवणार्या बुलडाणा जिल्ह्याची टँकरवाड्याकडे वाटचाल होत असून मे महिन्याच्या मध्यावरच २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे वास्तव आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या पाच वर्षातील तिसरा तीव्र दुष्काळ अनुभवणार्या बुलडाणा जिल्ह्याची टँकरवाड्याकडे वाटचाल होत असून मे महिन्याच्या मध्यावरच २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे वास्तव आहे. दरम्यान, भूजल पातळी दोन मिटरने खालावली असतानाच प्रकल्पांमधील जलसाठ्यातही अवघा चार टक्के पाणीसाठा शिल्लक राहला आहे. परिणामस्वरुप ‘पाणी हरपल; रान करपल’ अशी काहीसी स्थिती जिल्ह्याची झाली आहे.शनिवारी आॅडीओ ब्रीजच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील निवडक सरपंच आणि ग्रामसेवकांसह अधिकारी वर्गाशी टंचाईच्या मुद्द्यावर संवाद साधणार असल्याच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाईची माहिती घेतली असता ही बाब प्रकर्षाने समोर आली. अवघ्या ११ दिवसात टँकरची संख्या तब्बल ४५ ने वाढून २२१ वर पोहोचली आहे तर १७१ वरून तहाणेने व्याकूळ झालेल्या गावांची संघ्या २११ पोहोचली आहे. त्यावरून मे अखेर जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषणता कुठले स्वरुप धारण करेल याची कल्पना यावी.वर्तमान स्थितीतच जिल्ह्यातील १२७२ आबाद गावांपैकी १७ टक्के अर्थात २११ गावांची तहान ही टँकरवर भागविल्या जात असून ५७४ गावांची भिस्त ही विहीर अधिग्रहणावर आहे. जिल्ह्यातील तब्बल ४५ टक्के गावांमध्ये विहीर अधिग्रहीत कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे मे महिन्या अखेर जिल्ह्यातील तब्बल ७२ टक्के गावांची तहाण ही अधिग्रहीत विहीरीवर अवलंबून राहणार आहे. येत्या काळात ९१६ गावांमध्ये विहीर अधिग्रहण करून त्याद्वारे गावांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन यंत्रणेने केले असून टंचाई कृती आराखड्यात अनुषंगीक बाबी प्रस्तावीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या दीड दशकातील जिल्ह्यात पडलेला हा दुष्काळ तीव्र स्वरुपाचा असल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान, जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी एक हजार १२३ गावात दोन हजार ६१७ उपाययोजा प्रस्तावीत असून त्यापैकी प्रत्यक्षात ६८५ गावात एक हजार १०२ उपाययोजना पूर्णत्वास गेल्या आहेत. यावर १९ कोटी ७४ लाख २४ हजार रुपयांचा आतापर्यंत खर्च झालेला आहे.दुसरीकडे जिल्ह्याची भूजल पातळी ही जवळपास दोन मीटरने खालावली आहे. जिल्ह्याचा भूजल दुष्काळ निर्देशांकही उणे ११ च्या आसपास पोहोचला आहे. वरकरणी तो तुलनेने कमी असला तरी दहा वर्षाच्या सरासरीच्या आधारावर तो काढण्यात येत असतो. त्यामुळे मध्यंतरी अपघाव पद्धतीने पडलेल्या पावसामुळे हा निर्देशांक कमी दिसतो आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील टंचाईची स्थिती गंभीर बनत आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये प्रत्यक्षात दुष्काळ जाहीर झालेला आहे.५५ प्रकल्प कोरडेजिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांची संख्या एकूण ९१ आहे. या पैकी ५५ लघु प्रकल्प आजच कोरडे पडलेले आहे तर मोठे व मध्यम प्रकल्पापैकी चार प्रकल्प मृत जलसाठ्यात गेले आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये आजघडीला प्रत्यक्षात अवघा ४.४७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे हा जलसाठाही किती दिवस पुरेल हा प्रश्नच आहे. परिणामी यंदा मान्सून वेळेत न आल्यास जून अखेरच टंचाईची दाहकता जिल्ह्यात भीषण स्वरुप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई