शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

टरबुजांचे भाव अर्ध्यावर, ६ रुपये किलाेने खरेदी, २५ रुपयांना विक्री; शेतकरी उद्ध्वस्त, व्यापारी मालामाल

By विवेक चांदुरकर | Updated: April 9, 2024 14:25 IST

Buldhana: गत पंधरा दिवसात आवक वाढल्याने टरबुजांचे भाव अर्ध्यावर आले आहेत. हजार ते बाराशे रूपये क्विंटल असलेले दर पाचशे ते सहाशे रूपये प्रतिक्विंटल झाले आहेत. दुसरीकडे बाजारात व्यापारी ६ रूपये किलोने खरेदी केलेले टरबूज २० ते २५ रूपये किलोने विक्री करीत आहेत.

- विवेक चांदूरकरखामगाव - गत पंधरा दिवसात आवक वाढल्याने टरबुजांचे भाव अर्ध्यावर आले आहेत. हजार ते बाराशे रूपये क्विंटल असलेले दर पाचशे ते सहाशे रूपये प्रतिक्विंटल झाले आहेत. दुसरीकडे बाजारात व्यापारी ६ रूपये किलोने खरेदी केलेले टरबूज २० ते २५ रूपये किलोने विक्री करीत आहेत. त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, व्यापारी मात्र मालामाल होत आहेत.

जिल्ह्यात सिंचनाची व्यवस`था असलेल्या अनेक शेतकर्यांनी टरबुजांची लागवड केली आहे. टरबुजाचे पीक दोन ते तीन महिन्यांचे असून, यातून शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेक शेतकरी आता टरबुजांची लागवड करण्याकडे वळले आहेत. यावर्षी सुरूवातीला टरबुजांना चांगला भाव मिळाला. शेतकर्यांना प्रतिक्विंटल ११०० ते १२०० रूपये दर मिळत होते. मात्र गत काही दिवसांत टरबुजाच्या किमतीत प्रचंड घट आली आहे. शेतकर्यांकडून ४०० ते ५०० रूपये क्विंटलप्रमाणे टरबुजांची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांना टरबुजाची शेती करणे परवडनासे झाले आहे. उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत दर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तीन महिने श्रम करून पेरणी, फवारणी व काढणीचा खर्च करून शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागत आहे तर व्यापार्यांना एक ते दोन दिवसातच लाखो रूपयांचा नफा होत आहे. १ लाख २७ हजार खर्च १ लाख १० हजारांचे उत्पादनसंग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील शेतकरी पवन बघे यांनी दोन एकरात टरबुजांची लागवड केली आहे. त्यांना दोन एकरात पेरणी, फवारणी व काढणीकरिता १ लाख २७ हजार रूपयांचा खर्च आला तर त्यांना केवळ १ लाख १० हजारांचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे दोन एकरात तीन महिने रात्रंदिवस श्रम करूनही १७ ते २० हजार रूपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. अवकाळीनंतर पडले भावजिल्ह्यात वातावरणातील बदलानंतर अवकाळी पाऊस झाला. तसेच दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण होते. अवकाळी पावसाने काही भागात टरबूज पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे टरबुजाचे भाव पडले. याचा फटका सर्वच शेतकर्यांना बसत आहे. काही भागात पाऊस झालाच नाही. मात्र, चांगल्या टरबुजांचीही ५०० ते ६०० रूपयांनीच खरेदी करावी लागत आहे.  ६ रूपये किलाेने खरेदी २५ रूपयांनी विक्री टरबुजाला सुरूवातीला चांगला भाव मिळाला. मात्र नंतर टरबुजांचे भाव गडगडले. वादळी वारा व पावसामुळे टरबुजांचे नुकसान झाले. त्यातच भाव पडल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. तीन महिन्यांची मेहनत करूनही नुकसान सहन करावे लागले आहे.- पवन बघे, टरबूज उत्पादक शेतकरी चांगला भाव मिळेल या आशेने टरबुजाची लागवड केली. सुरूवातीला ११०० ते १२०० रूपये भाव मिळाला. मात्र, त्यानंतर भाव पडले. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या ७०० ते ८०० रूपये भाव आहे. आगामी दिवसात भाव वाढण्याची शक्यता आहे.- ईश्वर पाचपोर (टरबूज उत्पादक शेतकरी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी