शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

टरबुजांचे भाव अर्ध्यावर, ६ रुपये किलाेने खरेदी, २५ रुपयांना विक्री; शेतकरी उद्ध्वस्त, व्यापारी मालामाल

By विवेक चांदुरकर | Updated: April 9, 2024 14:25 IST

Buldhana: गत पंधरा दिवसात आवक वाढल्याने टरबुजांचे भाव अर्ध्यावर आले आहेत. हजार ते बाराशे रूपये क्विंटल असलेले दर पाचशे ते सहाशे रूपये प्रतिक्विंटल झाले आहेत. दुसरीकडे बाजारात व्यापारी ६ रूपये किलोने खरेदी केलेले टरबूज २० ते २५ रूपये किलोने विक्री करीत आहेत.

- विवेक चांदूरकरखामगाव - गत पंधरा दिवसात आवक वाढल्याने टरबुजांचे भाव अर्ध्यावर आले आहेत. हजार ते बाराशे रूपये क्विंटल असलेले दर पाचशे ते सहाशे रूपये प्रतिक्विंटल झाले आहेत. दुसरीकडे बाजारात व्यापारी ६ रूपये किलोने खरेदी केलेले टरबूज २० ते २५ रूपये किलोने विक्री करीत आहेत. त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, व्यापारी मात्र मालामाल होत आहेत.

जिल्ह्यात सिंचनाची व्यवस`था असलेल्या अनेक शेतकर्यांनी टरबुजांची लागवड केली आहे. टरबुजाचे पीक दोन ते तीन महिन्यांचे असून, यातून शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेक शेतकरी आता टरबुजांची लागवड करण्याकडे वळले आहेत. यावर्षी सुरूवातीला टरबुजांना चांगला भाव मिळाला. शेतकर्यांना प्रतिक्विंटल ११०० ते १२०० रूपये दर मिळत होते. मात्र गत काही दिवसांत टरबुजाच्या किमतीत प्रचंड घट आली आहे. शेतकर्यांकडून ४०० ते ५०० रूपये क्विंटलप्रमाणे टरबुजांची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांना टरबुजाची शेती करणे परवडनासे झाले आहे. उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत दर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तीन महिने श्रम करून पेरणी, फवारणी व काढणीचा खर्च करून शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागत आहे तर व्यापार्यांना एक ते दोन दिवसातच लाखो रूपयांचा नफा होत आहे. १ लाख २७ हजार खर्च १ लाख १० हजारांचे उत्पादनसंग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील शेतकरी पवन बघे यांनी दोन एकरात टरबुजांची लागवड केली आहे. त्यांना दोन एकरात पेरणी, फवारणी व काढणीकरिता १ लाख २७ हजार रूपयांचा खर्च आला तर त्यांना केवळ १ लाख १० हजारांचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे दोन एकरात तीन महिने रात्रंदिवस श्रम करूनही १७ ते २० हजार रूपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. अवकाळीनंतर पडले भावजिल्ह्यात वातावरणातील बदलानंतर अवकाळी पाऊस झाला. तसेच दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण होते. अवकाळी पावसाने काही भागात टरबूज पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे टरबुजाचे भाव पडले. याचा फटका सर्वच शेतकर्यांना बसत आहे. काही भागात पाऊस झालाच नाही. मात्र, चांगल्या टरबुजांचीही ५०० ते ६०० रूपयांनीच खरेदी करावी लागत आहे.  ६ रूपये किलाेने खरेदी २५ रूपयांनी विक्री टरबुजाला सुरूवातीला चांगला भाव मिळाला. मात्र नंतर टरबुजांचे भाव गडगडले. वादळी वारा व पावसामुळे टरबुजांचे नुकसान झाले. त्यातच भाव पडल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. तीन महिन्यांची मेहनत करूनही नुकसान सहन करावे लागले आहे.- पवन बघे, टरबूज उत्पादक शेतकरी चांगला भाव मिळेल या आशेने टरबुजाची लागवड केली. सुरूवातीला ११०० ते १२०० रूपये भाव मिळाला. मात्र, त्यानंतर भाव पडले. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या ७०० ते ८०० रूपये भाव आहे. आगामी दिवसात भाव वाढण्याची शक्यता आहे.- ईश्वर पाचपोर (टरबूज उत्पादक शेतकरी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी