शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बुलडाणा : सुबोध सावजींचा विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू; पाणीपुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 20:17 IST

डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल १४२० गावातील शासकीय नळपाणीपुरवठा योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी अधिकार्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, २४० गावांतील योजनांचे आॅडीट करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी १८ जानेवारीपासून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२४० गावांतील योजनांचे आॅडीट करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल १४२० गावातील शासकीय नळपाणीपुरवठा योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी अधिकार्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, २४० गावांतील योजनांचे आॅडीट करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १८ जानेवारीपासून विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू केला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सोनाटी-बोरी नळयोजनेच्या विहीरीत दुपारी चार वाजता बसून हे आंदोलन सुरू केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीअंतर्गत हे  विहीरीत बसून उपोषण करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना झाल्या आहेत. एका एका गावात चार-चार पाणीपुरवठा योजना झाल्या आहेत. पण गावांना प्यायला पाणी नाही, अशी वस्तुस्थिती आहे. असे असतानाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी प्रकरणी कारवाई करीत नसल्याने माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी विहीरीत बसून हे उपोषण सुरू केले आहे.१८ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता ७३ वर्षीय माजी राज्यमंत्री सुबोध सावजी हे विहीरीत बैलगाडीच्या पाळण्याद्वारे उतरले व त्यांच्या आंदोलनास सुरूवात झाली आहे. बोरी गावच्या चारही विहीरी पूर्ण होऊन पाणीपुरवठा योजनेवर एक कोटी रुपयांच्या जवळपास खर्च झाला आहे. पण गावाला पाणी नाही. ऐवढेच नाही तर नळयोजनेच्या विहीरींचे दानपत्रही नाही. विहीर आजही शेतकर्याच्या ताब्यात  आहे. जिल्ह्यातील या सर्वंकषस्तरावली पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचार प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिव तथा विभागीय आयुक्तांना भेटून त्याबाबत तक्रारही केली होती. जिल्ह्यातील १४२० गावातील  पाणीपुरवठा योजनामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावरून २४० गावांची चौकशी करून आॅटीच करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. मात्र जिल्ह्यातील अधिकार्यांनी आजपर्यंत कोणावरही कारवाई न केल्यामुळे सुबोध सावजी यांनी ही आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत नळयोजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई होत नाही तोवर आंदोलन चालू ठेवण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. विहीरीत बसूनच त्यांनी हे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

१९९७ मध्येही आंदोलनामुळे चर्चेतसुबोध सावजी यांनी १९९७ मध्येही बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील मातमळ गावातील विहीरीत बसून आंदोलन केले होते. सुबोध सावजींच्या  या आगळ््या वेगळ््या आंदोलनामुळे ते त्यावळी चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा २१ वर्षांनी ते याच पद्धतीने आंदोलन करीत आहेत. 

खून करण्याचाही इशारापाणीपुरवठा योजनांनमध्ये भ्रष्टाचार करणार्यांना पाठीशी घालणार्यांचा खून करण्याचा इशाराही त्यानी गेल्या वर्षी दिला होता. त्यासंदर्भात सुबोध सावजी यांची जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चौकशीही केली होती. 

टॅग्स :Subodh Savjiसुबोध सावजीbuldhanaबुलडाणाagitationआंदोलन