शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
6
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
7
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
8
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
9
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
10
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
11
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
12
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
13
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
14
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
15
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
16
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
17
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
18
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
19
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
20
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता

बुलडाणा : सुबोध सावजींचा विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू; पाणीपुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 20:17 IST

डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल १४२० गावातील शासकीय नळपाणीपुरवठा योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी अधिकार्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, २४० गावांतील योजनांचे आॅडीट करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी १८ जानेवारीपासून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२४० गावांतील योजनांचे आॅडीट करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल १४२० गावातील शासकीय नळपाणीपुरवठा योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी अधिकार्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, २४० गावांतील योजनांचे आॅडीट करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १८ जानेवारीपासून विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू केला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सोनाटी-बोरी नळयोजनेच्या विहीरीत दुपारी चार वाजता बसून हे आंदोलन सुरू केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीअंतर्गत हे  विहीरीत बसून उपोषण करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना झाल्या आहेत. एका एका गावात चार-चार पाणीपुरवठा योजना झाल्या आहेत. पण गावांना प्यायला पाणी नाही, अशी वस्तुस्थिती आहे. असे असतानाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी प्रकरणी कारवाई करीत नसल्याने माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी विहीरीत बसून हे उपोषण सुरू केले आहे.१८ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता ७३ वर्षीय माजी राज्यमंत्री सुबोध सावजी हे विहीरीत बैलगाडीच्या पाळण्याद्वारे उतरले व त्यांच्या आंदोलनास सुरूवात झाली आहे. बोरी गावच्या चारही विहीरी पूर्ण होऊन पाणीपुरवठा योजनेवर एक कोटी रुपयांच्या जवळपास खर्च झाला आहे. पण गावाला पाणी नाही. ऐवढेच नाही तर नळयोजनेच्या विहीरींचे दानपत्रही नाही. विहीर आजही शेतकर्याच्या ताब्यात  आहे. जिल्ह्यातील या सर्वंकषस्तरावली पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचार प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिव तथा विभागीय आयुक्तांना भेटून त्याबाबत तक्रारही केली होती. जिल्ह्यातील १४२० गावातील  पाणीपुरवठा योजनामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावरून २४० गावांची चौकशी करून आॅटीच करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. मात्र जिल्ह्यातील अधिकार्यांनी आजपर्यंत कोणावरही कारवाई न केल्यामुळे सुबोध सावजी यांनी ही आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत नळयोजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई होत नाही तोवर आंदोलन चालू ठेवण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. विहीरीत बसूनच त्यांनी हे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

१९९७ मध्येही आंदोलनामुळे चर्चेतसुबोध सावजी यांनी १९९७ मध्येही बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील मातमळ गावातील विहीरीत बसून आंदोलन केले होते. सुबोध सावजींच्या  या आगळ््या वेगळ््या आंदोलनामुळे ते त्यावळी चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा २१ वर्षांनी ते याच पद्धतीने आंदोलन करीत आहेत. 

खून करण्याचाही इशारापाणीपुरवठा योजनांनमध्ये भ्रष्टाचार करणार्यांना पाठीशी घालणार्यांचा खून करण्याचा इशाराही त्यानी गेल्या वर्षी दिला होता. त्यासंदर्भात सुबोध सावजी यांची जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चौकशीही केली होती. 

टॅग्स :Subodh Savjiसुबोध सावजीbuldhanaबुलडाणाagitationआंदोलन