शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यात आग; २० हेक्टर वनसंपदा जळून खाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 19:38 IST

बुलडाणा : चार तालुक्यांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या आणि बुलडाणा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात २५ डिसेंबरला रात्री आग लागून सुमारे २० हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली.

ठळक मुद्दे२५ डिसेंबरला रात्री बुलडाणा रेंजमधील कक्ष क्र. २७६ च्या भागात लागली होती आग फायर लाईनच्या कामाला वन्यजीव विभागाने प्राधान्याने हाती घेणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : चार तालुक्यांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या आणि बुलडाणा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात २५ डिसेंबरला रात्री आग लागून सुमारे २० हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ज्ञानगंगा अभयारण्यात आग लागण्याच्या घटनांना प्रारंभ झाला असून फायर लाईनच्या कामाला वन्यजीव विभागाने आता प्राधान्याने हाती घेणे गरजेचे झाले आहे. वनविभागाला तीन गवत कापणी यंत्रही नुकतेच मिळाले आहेत. त्यामुळे पूर्वी केवळ मनुष्य बळावर होणारी फायर लाईनची कामे आता यंत्राद्वारेही करणे शक्य होणार आहे. प्रकरणी वन्यजीव विभागाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सोमवारी सायंकाळी लागलेली ही आग रात्री उशिरापर्यंत धुमसत होती. प्रामुख्याने बुलडाणा रेंजमधील कक्ष क्रम २७६ च्या भागात ही आग लागली होती. या आगीमध्ये जवळपास २० हेक्टर वनसंपदा नष्ट झाल्याचा दावा सुत्र करती असली तरी आरएफोंच्या म्हणण्यानुसार आठ ते दहा हेक्टर क्षेत्र या आगीत नष्ठ झाल्याचे ते सांगत आहेत. त्यामुळे नेमके किती क्षेत्र या आगीत नष्ट झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीची माहिती मिळताच वन्यजीव विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने ज्ञानगंगा अभयारण्यातील रेंज कक्ष क्रमांक २७६ कडे रवाना झाले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांनी मोठ्या प्रयत्नपूर्वक आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण तोवर आगीच्या भक्ष्यस्थानी मोठ्या प्रमाणावर वनसंपदा गेली होती. बुलडाणा, मोताळा, चिखली आणि खामगाव तालुक्यांच्या सीमावर्ती भागात हे ज्ञानगंगा अभयारण्य पसरलेले आहे. शेड्यूल एचमध्ये असलेल्या बिबट्यांसह राज्यात अस्वलांच्यासाठी प्रामुख्याने हे अभयारण्य ओळखले जाते. तेलीणीची गुहा ही वन पर्यटनासाठी एक चांगले स्थळ या अभयारण्यात आहे. दरम्यान, अमरावतीचे सीसीएफ एम. एस. रेड्डी यांच्या विशेष प्रयत्नामुळे पाळीव गुरे चारणार्यांना अभयारण्यात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. याची कठोरपणे अंलबजावणी होत आहे. त्यामुळे त्यामुळे जंगलामध्ये यावर्षी गवताचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. पवन्या गवत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आले असून गुरांसह हरीण, काळवीट हे गवत प्रामुख्याने खातात. -- फायर ब्लोअर घटनास्थळी-- आगीची सुचना मिळताच वनविभागाचे फायर ब्लोर रवाना करण्यात आले होते. मात्र रात्रीची वेळ आणि वारे यामुळे आगीची व्याप्ती वाढ गेली. त्यामुळे मोठ्या कष्टानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आल्याचे काही कर्मचार्यांचे म्हणणे आहे. तोवर जवळपास २० हेक्टर क्षेत्र या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. -- आठ ते १० हेक्टरचे नुकसान-- अभयारण्यातील ज्या भागाला आग लागली त्या भागात आग आटोक्यात आणण्यात आली आहे. जवळपास आठ ते दहा हेक्टरवरील वनसंपदेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच फायर ब्लोर घटनास्थळी रवाना केले होते. (बी. आर. पवार, आरएफओ, ज्ञानगंगा अभयारण्य (वन्यजीव)) --सतर्कतेची गरज-- अभयारण्यात पाळीव गुरांना यावर्षी पूर्णत: बंदी घालण्यात आली होती. त्याची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याने अभयारण्यात पवण्या गवतासह अन्य गवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे वनविभागाने फायर लाईनची कामे प्राधान्याने हाती घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीनेही सतर्क असणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यfireआग