शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून जास्त भाव; नाफेड केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:39 IST

हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्राकडे पाठ फिरवली आहे.

- ब्रह्मानंद जाधव

बुलडाणा: हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याची ओरड आजपर्यंत होती; मात्र जिल्ह्यात यावर्षी उलट चित्र आहे. हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्राकडे पाठ फिरवली आहे. नोंदणी करूनही मूग, उडीदाची खरेदी आजही शुन्यावर आहे. तर सोयाबीनचीही केवळ नोंदणीच झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी शासनाकडून शेतमालाचे हमीभाव ठरवून दिले जातात. परंतू नाफेड केंद्राकडे या हमीभावात शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी मोठी  कसरत करावी लागते. हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून कमी दरामध्ये शेतमालाची खरेदी केल्या जाते. त्याचा फटका शेतकऱ्यांना नेहमी बसतो. परंतू यंदा याउलट परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना नाफेड केंद्रापेक्षा खासगी व्यापाऱ्यांना शेतमाल विक्री करणे परवडत आहे. त्यामुळे हमीभाव केंद्राकडे सध्या शेतकरी फिरकतही नाहीत.

पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. मूग, उडीद घरतही आले नाही. हमीभाव कमी असल्याने शेतकरी नाफेडकडे येण्यास तयार नाही. हमीभाव वाढवणे आवश्यक आहे. -भागवत देशमुख, शेतकरी

हमीभावा पेक्षा व्यापाऱ्यांकडे जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांकडे माल विक्री करत आहेत. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी नाफेड केंद्र आहेत.       नोंदणी केलेल्यांना अद्याप माल आणला नाही.

-नंदकुमार खडके, अध्यक्ष, तालुका खरेदी विक्र संघ, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती