शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून जास्त भाव; नाफेड केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:39 IST

हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्राकडे पाठ फिरवली आहे.

- ब्रह्मानंद जाधव

बुलडाणा: हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याची ओरड आजपर्यंत होती; मात्र जिल्ह्यात यावर्षी उलट चित्र आहे. हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्राकडे पाठ फिरवली आहे. नोंदणी करूनही मूग, उडीदाची खरेदी आजही शुन्यावर आहे. तर सोयाबीनचीही केवळ नोंदणीच झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी शासनाकडून शेतमालाचे हमीभाव ठरवून दिले जातात. परंतू नाफेड केंद्राकडे या हमीभावात शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी मोठी  कसरत करावी लागते. हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून कमी दरामध्ये शेतमालाची खरेदी केल्या जाते. त्याचा फटका शेतकऱ्यांना नेहमी बसतो. परंतू यंदा याउलट परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना नाफेड केंद्रापेक्षा खासगी व्यापाऱ्यांना शेतमाल विक्री करणे परवडत आहे. त्यामुळे हमीभाव केंद्राकडे सध्या शेतकरी फिरकतही नाहीत.

पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. मूग, उडीद घरतही आले नाही. हमीभाव कमी असल्याने शेतकरी नाफेडकडे येण्यास तयार नाही. हमीभाव वाढवणे आवश्यक आहे. -भागवत देशमुख, शेतकरी

हमीभावा पेक्षा व्यापाऱ्यांकडे जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांकडे माल विक्री करत आहेत. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी नाफेड केंद्र आहेत.       नोंदणी केलेल्यांना अद्याप माल आणला नाही.

-नंदकुमार खडके, अध्यक्ष, तालुका खरेदी विक्र संघ, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती