शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेलाच ‘व्हायरल इन्फेक्शन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 18:08 IST

औषधांचा तुटवडा व आरोग्य कर्मचारी गावात फिरकत नसल्याने या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास आरोग्य यंत्रणेलाच ‘व्हायरल इन्फेक्शन’ जडल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांची ओपीडी ५ हजार २०० च्यावर जात आहे.आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधी साठा उपलब्ध नाही, त्यात खोकल्याच्या औषधींचा तुटवडा असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये ताप, सर्दी, खोकल्यासह श्वसनविकाराचा त्रास होणारे रुग्ण अधिक आहेत. एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिवसाला १०० ते १५० रुग्ण तपासणीसाठी येत असल्याने जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांची ओपीडी ५ हजार २०० च्यावर जात आहे. परंतू औषधांचा तुटवडा व आरोग्य कर्मचारी गावात फिरकत नसल्याने या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास आरोग्य यंत्रणेलाच ‘व्हायरल इन्फेक्शन’ जडल्याचे दिसून येत आहे.गोरगरीब रुग्णांना वेळीच उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयापेक्षाही प्राथमिक अरोग्य केंद्र व उपकेंद्र जवळचे वाटतात. ग्रामीण भागातील  सर्वसामान्य रुग्णांची आजही प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरच मदार आहे. प्रत्येक उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) व (स्त्री) तसेच एक अंशकालीन स्त्री परिचर अशा तीन पदांना शासनाने मान्यता दिली आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रांमध्ये १५ कर्मचारी कार्यरत असतात. जिल्ह्यात एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र ५२ असून उपकेंद्र २८० आहेत. परंतू सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’ झपाट्याने पसरसत असून रुग्णांची गर्दी वाढली आहे. बदलते हवामान, त्यातच तापाची साथ सर्दी, खोकला यांसारख्या आजारांनी थैमान घातले आहे.  ढगाळ वातावरणामुळे दमा व त्वचा  विकाराचा त्रास वाढला आहे. सध्याचे वातावरण जलजन्य आजाराच्या वाढीसाठी पोषक असल्याने रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिवसाची ओपीेडी १०० ते १५० पर्यंत जात असल्याचे दिसून येत आहे.  शासकीय रुग्णालयांबरोबर खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी आहे. परंतू अशा परिस्थितीतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी गावोगावी फिरकत नसल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी सुद्धा गावांना भेटी देत नाहीत. आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधी साठा उपलब्ध नाही, त्यात खोकल्याच्या औषधींचा तुटवडा असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाºयांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

आरोग्य केंद्राचा कारभार उपकेंद्राच्या भरवश्यावरएका प्राथमिक आरोग्य केंद्रावर दोन वैद्यकीय अधिकारी असल्यास एकाला ओपीडी बघावी लागते. तर दुसरा अधिकारी मिटींग किंवा गावांना भेटी देणे व इतर कामे करतो. परंतू जिल्ह्यातील काही आरोग्य केंद्रावरील प्रभारी वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदीक दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाºयांना केंद्राच्या ठिकाणी बसण्यास सांगतात. अनेक वैद्यकीय अधिकारी आपल्या वैयक्तीक कामांसाठी उपकेंद्रावरील अधिकाºयांना बालावून त्यांच्यावर कामाचा डोलारा सोपवितात. 

अ‍ॅन्टी बायोटीकचा तुटवडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर औषधांची कमतरता वारंवर जाणवते. सध्या रुग्णांची संख्या वाढलेली असताना काही ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरून माहिती घेतली असता अ‍ॅन्टी बायोटीक व खोकल्याच्या औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचा प्रकार समोर आला. सध्या अ‍ॅन्टी बायोटीक औषधांची गरज असताना रुग्णांना ते वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्यात जावे लागते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य