शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेलाच ‘व्हायरल इन्फेक्शन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 18:08 IST

औषधांचा तुटवडा व आरोग्य कर्मचारी गावात फिरकत नसल्याने या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास आरोग्य यंत्रणेलाच ‘व्हायरल इन्फेक्शन’ जडल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांची ओपीडी ५ हजार २०० च्यावर जात आहे.आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधी साठा उपलब्ध नाही, त्यात खोकल्याच्या औषधींचा तुटवडा असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये ताप, सर्दी, खोकल्यासह श्वसनविकाराचा त्रास होणारे रुग्ण अधिक आहेत. एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिवसाला १०० ते १५० रुग्ण तपासणीसाठी येत असल्याने जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांची ओपीडी ५ हजार २०० च्यावर जात आहे. परंतू औषधांचा तुटवडा व आरोग्य कर्मचारी गावात फिरकत नसल्याने या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास आरोग्य यंत्रणेलाच ‘व्हायरल इन्फेक्शन’ जडल्याचे दिसून येत आहे.गोरगरीब रुग्णांना वेळीच उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयापेक्षाही प्राथमिक अरोग्य केंद्र व उपकेंद्र जवळचे वाटतात. ग्रामीण भागातील  सर्वसामान्य रुग्णांची आजही प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरच मदार आहे. प्रत्येक उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) व (स्त्री) तसेच एक अंशकालीन स्त्री परिचर अशा तीन पदांना शासनाने मान्यता दिली आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रांमध्ये १५ कर्मचारी कार्यरत असतात. जिल्ह्यात एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र ५२ असून उपकेंद्र २८० आहेत. परंतू सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’ झपाट्याने पसरसत असून रुग्णांची गर्दी वाढली आहे. बदलते हवामान, त्यातच तापाची साथ सर्दी, खोकला यांसारख्या आजारांनी थैमान घातले आहे.  ढगाळ वातावरणामुळे दमा व त्वचा  विकाराचा त्रास वाढला आहे. सध्याचे वातावरण जलजन्य आजाराच्या वाढीसाठी पोषक असल्याने रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिवसाची ओपीेडी १०० ते १५० पर्यंत जात असल्याचे दिसून येत आहे.  शासकीय रुग्णालयांबरोबर खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी आहे. परंतू अशा परिस्थितीतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी गावोगावी फिरकत नसल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी सुद्धा गावांना भेटी देत नाहीत. आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधी साठा उपलब्ध नाही, त्यात खोकल्याच्या औषधींचा तुटवडा असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाºयांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

आरोग्य केंद्राचा कारभार उपकेंद्राच्या भरवश्यावरएका प्राथमिक आरोग्य केंद्रावर दोन वैद्यकीय अधिकारी असल्यास एकाला ओपीडी बघावी लागते. तर दुसरा अधिकारी मिटींग किंवा गावांना भेटी देणे व इतर कामे करतो. परंतू जिल्ह्यातील काही आरोग्य केंद्रावरील प्रभारी वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदीक दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाºयांना केंद्राच्या ठिकाणी बसण्यास सांगतात. अनेक वैद्यकीय अधिकारी आपल्या वैयक्तीक कामांसाठी उपकेंद्रावरील अधिकाºयांना बालावून त्यांच्यावर कामाचा डोलारा सोपवितात. 

अ‍ॅन्टी बायोटीकचा तुटवडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर औषधांची कमतरता वारंवर जाणवते. सध्या रुग्णांची संख्या वाढलेली असताना काही ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरून माहिती घेतली असता अ‍ॅन्टी बायोटीक व खोकल्याच्या औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचा प्रकार समोर आला. सध्या अ‍ॅन्टी बायोटीक औषधांची गरज असताना रुग्णांना ते वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्यात जावे लागते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य